शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

Jairam Thakur : "आता परिस्थिती बदलली, देशातील काँग्रेसचं अस्तित्व समाप्त झालं"; जयराम ठाकूरांचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 08:44 IST

Jairam Thakur And Congress : हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करत खोचक शब्दांत टीका केली आहे.

नवी दिल्ली - हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक होणार असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. राजकीय वातावरण तापलं आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. याच दरम्यान हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर (Jairam Thakur) यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करत खोचक शब्दांत टीका केली आहे. सर्वात जुना पक्ष असलेला काँग्रेस गायब झाला आहे आणि देशभरात त्यांच्या फेयरवेल साँगचा आवाज येत असल्याचं म्हटलं आहे. जालोगमध्ये एका जनसभेला संबोधित करताना त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. 

"एकेकाळी काँग्रेसचा काळ होता. आता मात्र परिस्थिती बदललेली आहे. देशातील काँग्रेसचं अस्तित्व समाप्त झालं आहे. सध्या त्यांचे राष्ट्रीय नेते जामिनावर आहेत. निरोपाचं गाणं देशभर पोहोचलं आहे' अशा शब्दांत जयराम ठाकूर यांनी टोला लगावला आहे. तसेच "हिमाचल प्रदेशमध्ये प्रत्येक पाच वर्षात सत्ताबदल होतो. मात्र यावेळी येथे सत्ताबदल होणार नाही. यावेळी राज्यात पुन्हा एकदा भाजपाची सत्ता येणार आहे. नुकत्याच पाच राज्यांत विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये त्यांचीच सत्ता येईल असा दावा काँग्रेसचे नेते करत होते. मात्र निकाल वेगळा लागला."

"पंजाबमध्ये तर माजी मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी दोन्ही ठिकाणांमधून पराभूत झाले. काँग्रेसजवळ फक्त एकच राज्य होते. तेही राज्य काँग्रेसच्या हातातून गेले. तर चारही राज्यांमध्ये पुन्हा एकदा भाजपाची सत्ता आली" असं देखील जयराम ठाकूर यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काँग्रेसने राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यानंतर काँग्रेसमधील काही इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली. काँग्रेसच्या नेत्या आणि अभिनेत्री नगमा यांनीही ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट करत आपला संताप व्यक्त केला. सोनिया गांधी यांनी राज्यसभेचं वचन दिलं. मात्र आता 18 वर्षांनंतरही या वचनाची पूर्तता झालेली नाही म्हणत नगमा यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं.

"18 वर्षांची तपस्या इमरान भाईंसमोर कमी पडली, मी पात्र नाही का?"; नगमा यांचा खोचक सवाल

नगमा यांनी दोन ट्वीट केले आहेत. यातील पहिल्या ट्वीटमध्ये त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांचं ट्वीट रिट्विट करत आपली 18 वर्षांची तपस्या इमरान भाईंसमोर कमी पडल्याचं मत व्यक्त केलं. पवन खेरा यांनी काँग्रेसची यादी जाहीर झाल्यानंतर केलेल्या ट्वीटमध्ये कदाचित माझी तपस्या काहीशी कमी पडल्याचं म्हटलं आहे. "काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सांगण्यावरून मी 2003-04 काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. तेव्हा सोनिया गांधी यांनी स्वतः मला राज्यसभेचं आश्वासन दिलं होतं. त्यावेळी काँग्रेस पक्ष सत्तेतही नव्हता. आता या गोष्टीला 18 वर्षे झालेत मात्र त्यांना अद्याप एकही संधी सापडलेली नाही. इमरान यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर घेण्यात आलं. मी पात्र नाही का? असा माझा प्रश्न आहे" असं नगमा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.  

टॅग्स :Jairam Thakurजयराम ठाकूरcongressकाँग्रेसPoliticsराजकारणHimachal Pradeshहिमाचल प्रदेश