शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

उत्तर प्रदेशात महाआघाडी झाल्यास भाजपाची उडणार दाणादाण, सर्वे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2018 21:44 IST

लोकसभेची सेमीफायनल मानल्या गेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल येत्या 11 डिसेंबर रोजी लागणार आहेत. या निकालांपूर्वी केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपाला धक्का देणारा सर्वे समोर आला आहे.

ठळक मुद्देलोकसभेची सेमीफायनल मानल्या गेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल येत्या 11 डिसेंबर रोजी लागणार आहेत. या निकालांपूर्वी केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपाला धक्का देणारा सर्वे समोर आला आहे. उत्तर प्रदेशात भाजपाविरोधात सर्वपक्षीयांची एकजुट झाल्यास लोकसभा निवडणुकीत भाजपाला जबरदस्त नुकसान होणार आहे.सर्वपक्षीय एकजूट झाल्यास भाजपाला तब्बल 42 जागांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. महाआघाडी झाल्यास सर्व पक्षांना मिळून 49 जागा मिळतील, तर भाजपा आणि त्याच्या मित्रपक्षांना केवळ 31 जागा मिळतील.

नवी दिल्ली - लोकसभेची सेमीफायनल मानल्या गेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल येत्या 11 डिसेंबर रोजी लागणार आहेत. या निकालांनंतर सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची दिशा ठरणार आहे. मात्र या निकालांपूर्वी केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपाला धक्का देणारा सर्वे समोर आला आहे. उत्तर प्रदेशात भाजपाविरोधात सर्वपक्षीयांची एकजुट झाल्यास लोकसभा निवडणुकीत भाजपाला जबरदस्त नुकसान होणार आहे. सर्वपक्षीय एकजूट झाल्यास भाजपाला तब्बल 42 जागांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. महाआघाडी झाल्यास सर्व पक्षांना मिळून 49 जागा मिळतील, तर भाजपा आणि त्याच्या मित्रपक्षांना केवळ 31 जागा मिळतील.टाइम्स नाऊ  आणि सीएनएक्सने आज लोकसभा निवडणूक झाली तर देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये मतदारांचा काय कल असेल याचा सर्वे करून अंदाज घेतला आहे. या सर्वेमध्ये सपा, बसपा, काँग्रेस आणि रालोद या पक्षांची महाआघाडी झाल्यास त्याचा या पक्षांना स्पष्टपणे फायदा होईल, असे या सर्वेत म्हटले आहे. अशा स्थितीत महाआघाडीला 49 जागा मिळतील. तर भाजपाला 31 जागा मिळतील. सपा बसपा यांची महाआघाडी झाल्यास  भाजपाला 16 जागांचे नुकसान होऊन त्यांच्या जागा 55 पर्यंत खाली येतील, तर सपा आणि बसपाला प्रत्येकी नऊ आणि काँग्रेसला पाच जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना दोन जागा मिळतील. सपा, बसपा आणि रालोद यांच्या महाआघाडीत काँग्रेस सहभागी न झाल्यास भाजपाला 45 आणि महाआघाडीला 33 जागा मिळतील, तर काँग्रेसला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागेल. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी अद्यापही लोकप्रिय आहेत. मोदींना 42 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर 20 टक्के लोकांनी राहुल गांधी यांना पसंती दिली आहे. तसेच राफेल घोटाळा आणि राम मंदिरापेक्षा स्थानिक मुद्दे मतदारांना अधिक प्रभावी वाटतात. असेही सर्वेमधून समोर आले आहे. 

टॅग्स :BJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliticsराजकारण