शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशात महाआघाडी झाल्यास भाजपाची उडणार दाणादाण, सर्वे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2018 21:44 IST

लोकसभेची सेमीफायनल मानल्या गेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल येत्या 11 डिसेंबर रोजी लागणार आहेत. या निकालांपूर्वी केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपाला धक्का देणारा सर्वे समोर आला आहे.

ठळक मुद्देलोकसभेची सेमीफायनल मानल्या गेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल येत्या 11 डिसेंबर रोजी लागणार आहेत. या निकालांपूर्वी केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपाला धक्का देणारा सर्वे समोर आला आहे. उत्तर प्रदेशात भाजपाविरोधात सर्वपक्षीयांची एकजुट झाल्यास लोकसभा निवडणुकीत भाजपाला जबरदस्त नुकसान होणार आहे.सर्वपक्षीय एकजूट झाल्यास भाजपाला तब्बल 42 जागांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. महाआघाडी झाल्यास सर्व पक्षांना मिळून 49 जागा मिळतील, तर भाजपा आणि त्याच्या मित्रपक्षांना केवळ 31 जागा मिळतील.

नवी दिल्ली - लोकसभेची सेमीफायनल मानल्या गेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल येत्या 11 डिसेंबर रोजी लागणार आहेत. या निकालांनंतर सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची दिशा ठरणार आहे. मात्र या निकालांपूर्वी केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपाला धक्का देणारा सर्वे समोर आला आहे. उत्तर प्रदेशात भाजपाविरोधात सर्वपक्षीयांची एकजुट झाल्यास लोकसभा निवडणुकीत भाजपाला जबरदस्त नुकसान होणार आहे. सर्वपक्षीय एकजूट झाल्यास भाजपाला तब्बल 42 जागांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. महाआघाडी झाल्यास सर्व पक्षांना मिळून 49 जागा मिळतील, तर भाजपा आणि त्याच्या मित्रपक्षांना केवळ 31 जागा मिळतील.टाइम्स नाऊ  आणि सीएनएक्सने आज लोकसभा निवडणूक झाली तर देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये मतदारांचा काय कल असेल याचा सर्वे करून अंदाज घेतला आहे. या सर्वेमध्ये सपा, बसपा, काँग्रेस आणि रालोद या पक्षांची महाआघाडी झाल्यास त्याचा या पक्षांना स्पष्टपणे फायदा होईल, असे या सर्वेत म्हटले आहे. अशा स्थितीत महाआघाडीला 49 जागा मिळतील. तर भाजपाला 31 जागा मिळतील. सपा बसपा यांची महाआघाडी झाल्यास  भाजपाला 16 जागांचे नुकसान होऊन त्यांच्या जागा 55 पर्यंत खाली येतील, तर सपा आणि बसपाला प्रत्येकी नऊ आणि काँग्रेसला पाच जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना दोन जागा मिळतील. सपा, बसपा आणि रालोद यांच्या महाआघाडीत काँग्रेस सहभागी न झाल्यास भाजपाला 45 आणि महाआघाडीला 33 जागा मिळतील, तर काँग्रेसला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागेल. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी अद्यापही लोकप्रिय आहेत. मोदींना 42 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर 20 टक्के लोकांनी राहुल गांधी यांना पसंती दिली आहे. तसेच राफेल घोटाळा आणि राम मंदिरापेक्षा स्थानिक मुद्दे मतदारांना अधिक प्रभावी वाटतात. असेही सर्वेमधून समोर आले आहे. 

टॅग्स :BJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliticsराजकारण