शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

उत्तर प्रदेशात महाआघाडी झाल्यास भाजपाची उडणार दाणादाण, सर्वे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2018 21:44 IST

लोकसभेची सेमीफायनल मानल्या गेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल येत्या 11 डिसेंबर रोजी लागणार आहेत. या निकालांपूर्वी केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपाला धक्का देणारा सर्वे समोर आला आहे.

ठळक मुद्देलोकसभेची सेमीफायनल मानल्या गेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल येत्या 11 डिसेंबर रोजी लागणार आहेत. या निकालांपूर्वी केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपाला धक्का देणारा सर्वे समोर आला आहे. उत्तर प्रदेशात भाजपाविरोधात सर्वपक्षीयांची एकजुट झाल्यास लोकसभा निवडणुकीत भाजपाला जबरदस्त नुकसान होणार आहे.सर्वपक्षीय एकजूट झाल्यास भाजपाला तब्बल 42 जागांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. महाआघाडी झाल्यास सर्व पक्षांना मिळून 49 जागा मिळतील, तर भाजपा आणि त्याच्या मित्रपक्षांना केवळ 31 जागा मिळतील.

नवी दिल्ली - लोकसभेची सेमीफायनल मानल्या गेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल येत्या 11 डिसेंबर रोजी लागणार आहेत. या निकालांनंतर सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची दिशा ठरणार आहे. मात्र या निकालांपूर्वी केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपाला धक्का देणारा सर्वे समोर आला आहे. उत्तर प्रदेशात भाजपाविरोधात सर्वपक्षीयांची एकजुट झाल्यास लोकसभा निवडणुकीत भाजपाला जबरदस्त नुकसान होणार आहे. सर्वपक्षीय एकजूट झाल्यास भाजपाला तब्बल 42 जागांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. महाआघाडी झाल्यास सर्व पक्षांना मिळून 49 जागा मिळतील, तर भाजपा आणि त्याच्या मित्रपक्षांना केवळ 31 जागा मिळतील.टाइम्स नाऊ  आणि सीएनएक्सने आज लोकसभा निवडणूक झाली तर देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये मतदारांचा काय कल असेल याचा सर्वे करून अंदाज घेतला आहे. या सर्वेमध्ये सपा, बसपा, काँग्रेस आणि रालोद या पक्षांची महाआघाडी झाल्यास त्याचा या पक्षांना स्पष्टपणे फायदा होईल, असे या सर्वेत म्हटले आहे. अशा स्थितीत महाआघाडीला 49 जागा मिळतील. तर भाजपाला 31 जागा मिळतील. सपा बसपा यांची महाआघाडी झाल्यास  भाजपाला 16 जागांचे नुकसान होऊन त्यांच्या जागा 55 पर्यंत खाली येतील, तर सपा आणि बसपाला प्रत्येकी नऊ आणि काँग्रेसला पाच जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना दोन जागा मिळतील. सपा, बसपा आणि रालोद यांच्या महाआघाडीत काँग्रेस सहभागी न झाल्यास भाजपाला 45 आणि महाआघाडीला 33 जागा मिळतील, तर काँग्रेसला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागेल. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी अद्यापही लोकप्रिय आहेत. मोदींना 42 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर 20 टक्के लोकांनी राहुल गांधी यांना पसंती दिली आहे. तसेच राफेल घोटाळा आणि राम मंदिरापेक्षा स्थानिक मुद्दे मतदारांना अधिक प्रभावी वाटतात. असेही सर्वेमधून समोर आले आहे. 

टॅग्स :BJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliticsराजकारण