शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
3
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
4
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
5
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
6
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
7
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
8
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
9
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
10
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
11
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
12
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
13
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
14
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
15
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
16
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
17
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
18
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
19
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
20
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
Daily Top 2Weekly Top 5

Assembly Election 2018 Results : भाजपाला पराभूत करु, पण भाजपामुक्त करणार नाही - राहुल गांधी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 20:24 IST

Assembly Election 2018 Results : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. त्यामुळे लोकांमध्ये नरेंद्र मोदींबद्दल नाराजी आहे, असे सांगत राहुल गांधी यांनी नरेद्र मोदींवर निशाणा साधला. 

नवी दिल्ली : लोकसभेची सेमीफायन समजल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले होते. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मिझोरम आणि तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. यामध्ये तीन राज्यांत काँग्रेसला बहुमत स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राहुल गांधी यांनी मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार आणि विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल चढविला. 

विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाचा अहंकारामुळे पराभव झाला आहे. भाजपाने जरी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा केली असली तरीही आम्ही भाजपाला पराभूत करु, मात्र भाजपामुक्त करणार नाही. कारण, त्यांच्यासारखी भाषा आम्ही वापरु शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. त्यामुळे लोकांमध्ये नरेंद्र मोदींबद्दल नाराजी आहे, असे सांगत राहुल गांधी यांनी नरेद्र मोदींवर निशाणा साधला.

विधानसभा निवडणुकांमध्ये झालेला विजय हा शेतकरी, व्यापारी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा आहे. त्यामुळे मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानतो. ही परिवर्तणाची सुरुवात असून जनमताचा आवाज ऐकून कामे करणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. 

देशासमोर आत्ता सगळ्यात मोठे तीन मुद्दे आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि इतर समस्या, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हे तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत. केंद्रात विरोधकांची एकजूट आहे. सपा, बसपा आणि काँग्रेसची विचारधारा एक आहे, त्यामुळे भाजपाविरोधात आम्ही एकत्र लढू असे राहुल गांधी म्हणाले. 

लोकांशी समरस कसे व्हायचे त्यांच्या मनात काय आहे हे कसे ओळखायचे हे मी नरेंद्र मोदींकडून शिकलो. त्या निवडणुकांमध्ये आमचा पराभव झाला. मोदींना देशाच्या जनतेने, उद्योजकांनी, शेतकऱ्यांनी युवा वर्गाने निवडले आणि त्यांना एक मोठी संधी दिली. 

 

शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हे तिन्ही प्रश्न सोडवण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. तसेच नोटाबंदी, जीएसटी या संदर्भातले निर्णय जनतेला पटलेले नाहीत. जनतेचा रोषच मतपेटीतून व्यक्त झाला आहे असेही राहुल गांधी यांन्ही म्हटले आहे. 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकMadhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018Chhattisgarh Assembly Election 2018छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018