शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅपिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
2
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
3
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
4
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
5
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
6
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
7
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
8
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
9
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
10
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
11
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
12
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
13
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
14
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
15
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
16
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
17
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
18
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
19
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
20
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट

Assembly Election 2018 Results : भाजपाला पराभूत करु, पण भाजपामुक्त करणार नाही - राहुल गांधी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 20:24 IST

Assembly Election 2018 Results : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. त्यामुळे लोकांमध्ये नरेंद्र मोदींबद्दल नाराजी आहे, असे सांगत राहुल गांधी यांनी नरेद्र मोदींवर निशाणा साधला. 

नवी दिल्ली : लोकसभेची सेमीफायन समजल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले होते. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मिझोरम आणि तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. यामध्ये तीन राज्यांत काँग्रेसला बहुमत स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राहुल गांधी यांनी मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार आणि विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल चढविला. 

विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाचा अहंकारामुळे पराभव झाला आहे. भाजपाने जरी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा केली असली तरीही आम्ही भाजपाला पराभूत करु, मात्र भाजपामुक्त करणार नाही. कारण, त्यांच्यासारखी भाषा आम्ही वापरु शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. त्यामुळे लोकांमध्ये नरेंद्र मोदींबद्दल नाराजी आहे, असे सांगत राहुल गांधी यांनी नरेद्र मोदींवर निशाणा साधला.

विधानसभा निवडणुकांमध्ये झालेला विजय हा शेतकरी, व्यापारी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा आहे. त्यामुळे मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानतो. ही परिवर्तणाची सुरुवात असून जनमताचा आवाज ऐकून कामे करणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. 

देशासमोर आत्ता सगळ्यात मोठे तीन मुद्दे आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि इतर समस्या, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हे तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत. केंद्रात विरोधकांची एकजूट आहे. सपा, बसपा आणि काँग्रेसची विचारधारा एक आहे, त्यामुळे भाजपाविरोधात आम्ही एकत्र लढू असे राहुल गांधी म्हणाले. 

लोकांशी समरस कसे व्हायचे त्यांच्या मनात काय आहे हे कसे ओळखायचे हे मी नरेंद्र मोदींकडून शिकलो. त्या निवडणुकांमध्ये आमचा पराभव झाला. मोदींना देशाच्या जनतेने, उद्योजकांनी, शेतकऱ्यांनी युवा वर्गाने निवडले आणि त्यांना एक मोठी संधी दिली. 

 

शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हे तिन्ही प्रश्न सोडवण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. तसेच नोटाबंदी, जीएसटी या संदर्भातले निर्णय जनतेला पटलेले नाहीत. जनतेचा रोषच मतपेटीतून व्यक्त झाला आहे असेही राहुल गांधी यांन्ही म्हटले आहे. 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकMadhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018Chhattisgarh Assembly Election 2018छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018