शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

भाजप सहकारी पक्षांना कमकुवत करतो; २०२४ मध्ये बहुमताने जिंकण्याचा नितीशकुमार यांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 10:42 IST

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही मोठ्या बहुमताने जिंकू, असा विश्वासही नितीशकुमार यांनी येथे जदयूच्या अधिवेशनात व्यक्त केला. 

- एस. पी. सिन्हा लोकमत न्यूज नेटवर्क पाटणा : भाजप सहकारी पक्षांना कमकुवत करतो. २०२० च्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने जदयूविरुद्ध कारस्थान केले, असा आरोप करतानाच याच कारणामुळे आम्ही भाजपची साथ सोडत सात पक्षांच्या महाआघाडीत सहभागी झालो, असे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी रविवारी स्पष्ट केले. 

  २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही मोठ्या बहुमताने जिंकू, असा विश्वासही नितीशकुमार यांनी येथे जदयूच्या अधिवेशनात व्यक्त केला. नितीशकुमार म्हणाले की, बिहारनंतर देशभरातील बिगरभाजप पक्षांना एकजूट करून केंद्रातील सत्तेतून भाजपला हटविले जाईल.  ते म्हणाले की, कुढनीमधील विजयामुळे भाजप खुश होत आहे. पण, हिमाचल आणि अन्य ठिकाणी झालेल्या पराभवाबद्दल ते चर्चा करत नाहीत. मोदी सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, आपण ७० वर्षांचा हिशेब मागता, तर आपलाही हिशेब द्या. स्वातंत्र्याच्या लढाईत लढणाऱ्यांबद्दल सवाल उपस्थित करता आणि ज्यांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनात काहीही केले नाही ते आज स्वत:ला सर्वांत मोठे देशभक्त असल्याचे सांगत आहेत. 

बिहारमधील सर्व जागा जिंकणार : ललन सिंह २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाआघाडी सर्व ४० जागा जिंकेल, असा दावा जदयूचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांनी केला.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपा