शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

BJP vs Congress : 'शेम ऑन...शेम ऑन...' राहुल गांधी संसदेत येताच भाजप नेत्यांची घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 17:59 IST

संसदेत अधिवेशनाच्या पाचव्या दिवशीही गदारोळ झाला. सरकार राहुल गांधींच्या माफीची मागणी करत आहे तर विरोधक जेपीसीची मागणी करत आहेत.

Parliament Budget Session : लंडनमधील भाषणामुळे राहुल गांधी यांनी माफी मागावी आणि अदानी प्रकरणी जेपीसीची स्थापना करावी, या मागणीवरुन सरकार आणि विरोधकांमध्ये झालेल्या गोंधळामुळे शुक्रवारी (17 मार्च) संसदेचे कामकाज होऊ शकले नाही. लोकसभा आणि राज्यसभेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू होताच सरकार आणि विरोधकांमध्ये गदारोळ आणि घोषणाबाजी सुरू झाली. त्यामुळे देशातील दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब करावे लागले.

जेपी नड्डांची टीकाराहुल गांधींच्या लंडनमध्ये केलेल्या वक्तव्यावरुन भाजप त्यांच्या माफीची मागणी करत आहे. भाजपचे प्रमुख जेपी नड्डा यांनी सकाळी 9:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पक्षाची भूमिका स्पष्ट केली आणि राहुल यांना माफी मागावी लागेल असे सांगितले. 'राहुल गांधी कायमच देशविरोधी टूलकिटचा भाग बनले आहेत. त्यांनी देशातील 130 कोटी नागरिकांचा आणि संसदेचा अपमान केला आहे,' अशी टीका त्यांनी केली.

मल्लिकार्जुन खर्गेंचा पलटवारभाजप प्रमुखांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सनंतर लगेचच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या विधानावर पलटवार केला. 'स्वतः नड्डा देशद्रोही आहेत, म्हणूनच ते इतरांना देशद्रोही म्हणत आहेत. त्यांच्याकडे दुसरा कोणताही मुद्दा नाही. सरकारने राहुल गांधींना संसदेत बोलू दिले, तर ते नक्कीच स्पष्टीकरण देतील,' असे खर्गे म्हणाले. 

विरोधकांची गांधी पुतळ्याजवळ निदर्शनेसंसदेचे कामकाज सुरू होताच काँग्रेस नेते राहुल गांधी संसदेत पोहोचले. राहुल गांधी संसदेत पोहोचताच भाजप खासदारांनी शेम-ऑन शेम-ऑन घोषणा देण्यास सुरुवात केली. प्रचंड गदारोळामुळे संसदेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले. संसदेचे कामकाज थांबताच विरोधी पक्षाच्या सर्व खासदारांनी गांधी पुतळ्यासमोर जमिनीवर बसून विरोध करण्यास सुरुवात केली. या निदर्शनात विरोधी खासदारांसोबत काँग्रेस नेत्या सोनिया गांधीही आल्या आणि त्यांनी अदानी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जेपीसी स्थापन करण्याच्या मागणीला पाठिंबा दिला. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा