शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

केजरीवालांनी ज्या आमदारांचे तिकीट कापले, त्यांनीच इंगा दाखवला? २८ नव्या उमेदवारांचे काय झाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 15:40 IST

BJP vs AAP Delhi Election Results 2025 news: केजरीवाल यांच्या पक्षाच्या पराभवाला अनेक कारणे आहेत. यापैकीच एक कारण म्हणजे त्या २८ पैकी बहुतांश जागांवर दगाफटका झाला आहे.

केजरीवाल आणि आपच्या एवढ्या दारुण पराभवामागे काँग्रेस असल्याचे म्हटले जात आहे. केजरीवाल, सिसोदिया, सत्येंद्र जैन तर हरले आहेतच परंतू केजरीवालांनी ज्या विद्यमान आमदारांचे तिकीट कापले त्यांच्या जागी दिलेल्या २८ उमेदवारांचे काय झाले, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

केजरीवालांनीच केजरीवालांना हरविले! आपच्या पराभवाची ही कारणे, त्यांचे वागणे, त्यांचे बोलणे...

केजरीवाल यांच्या पक्षाच्या पराभवाला अनेक कारणे आहेत. यापैकीच एक कारण म्हणजे त्या २८ पैकी बहुतांश जागांवर दगाफटका झाला आहे. पक्षाच्याच लोकांनी बंडाचे निशान रोवले असावे असे सांगितले जात आहे. 

आपने ७० जागांपैकी २८ जागांवर नवीन चेहरे दिले होते. या जागांवरील विद्यमान आमदारांना तिकीट नाकारले होते. यापैकी ७ उमेदवारच जिंकू शकले आहेत. उर्वरित २१ उमेदवार हे मोठ्या मतफरकाने हरले आहेत. या जागांवरील पराभवाला तिकीट कापल्या गेलेल्या आमदारांचे मोठे योगदान असल्याचे राजकीय विश्लेषकांमध्ये बोलले जात आहे. 

आपच्या ज्या आमदारांची तिकिटे केजरीवालांनी कापली होती, ते एकतर भाजपात सहभागी झाले होते किंवा काँग्रेसकडून आणि अपक्ष म्हणून देखील उभे ठाकले होते. या तिकीट कापण्याचा फटका आपला बसला असल्याचे सांगितले जात आहे. 

भाजप २७ वर्षांनी राजधानीत सरकार स्थापन करणार आहे. भाजप ४७ जागांवर आघाडीवर आहे आणि आम आदमी पक्ष २३ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसचे खातेही उघडलेले नाही. अशा परिस्थितीत आपला आता पाच वर्षे सरकार नसताना पक्ष टिकविण्याची कसरत करावी लागणार आहे. कोणतेही कार्यकर्त्यांचे बळ नसताना केवळ आंदोलनाच्या जिवावर उदयास आलेल्या पक्षाला आता अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी झगडावे लागणार असल्याचे मत राजकीय तज्ञांनी व्यक्त केले आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपdelhi electionदिल्ली निवडणूकBJPभाजपा