शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

“गांधी जयंतीच्या दिवशी गोडसेचा जयघोष करणाऱ्यांना फाशी दिली पाहिजे”: वरुण गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 13:12 IST

आता जय श्रीराम नाही, तर जय हिंद म्हणायची वेळी आली आहे, असे वरुण गांधी यांनी म्हटले आहे.

पिलिभीत: गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते वरुण गांधी (Varun Gandhi) केंद्रातील मोदी सरकार आणि आपल्याच पक्षावर सातत्याने टीका करताना पाहायला मिळत आहेत. वरुण गांधी कधीही भाजपला रामराम करू शकतात, अशा चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे सांगितले जात आहे. यातच आता महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) जयंतीच्या दिवशी गोडसे (Nathuram Godse) जिंदाबाद बोलणाऱ्या लोकांना फाशी दिली पाहिजे, असे टीकास्त्र वरुण गांधी यांनी सोडले.

आपल्या पिलिभीत मतदारसंघात अंगणवाडी सेविका आणि अन्य महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना वरुण गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला. वेतन, कामाबाबतच निश्चिती अशा काही मूलभूत मागण्यांसाठी या महिला कर्मचारी आंदोलन करत आहेत. आता जय हिंद म्हणण्याची वेळ आली आहे. आपल्याला एक हिंदुस्थान करायचा आहे. सरकार कुणाचे आहे, याची मला फिकीर नाही. मी तुमच्यासोबत आहे, असे वरुण गांधी म्हणाले. 

आता जय श्रीराम नाही, जय हिंद म्हणायची वेळ आलीय

मी इथे काही मुख्यमंत्र्यांना किंवा पंतप्रधानांना निवेदन देण्यासाठी आलेलो नाही, मी देशाचे राजकारण करायला आलो आहे. आज माझ्यासमोर आख्खा देश बसला आहे. माझ्यासमोर ना कुणी हिंदू आहे ना कुणी मुसलमान, ना कुणी पुढारलेला आहे, ना कुणी मागास. असा भेद करून आपण हिंदुस्थानला कमकुवत करत आहोत. आता जय श्रीराम नाही, तर जय हिंद म्हणायची वेळी आली आहे, असेही वरुण गांधी यांनी म्हटले आहे. 

गोडसेंचा जयघोष करणाऱ्यांना फाशी दिली पाहिजे

महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिवशी गोडसे जिंदाबाद बोलणाऱ्या लोकांना फाशी दिले पाहिजे. भगवान राम मर्यादा पुरुषोत्तम होते. ज्यांनी लोकांना जोडण्याचे काम केले. गांधीजींच्या जयंतीच्या दिवशी सोशल मीडियावर गोडसे जिंदाबाद ट्रेंड होत होता, असेही ते म्हणाले.  

टॅग्स :Varun Gandhiवरूण गांधीMahatma Gandhiमहात्मा गांधीBJPभाजपाNathuram Godseनथुराम गोडसे