शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

“गांधी जयंतीच्या दिवशी गोडसेचा जयघोष करणाऱ्यांना फाशी दिली पाहिजे”: वरुण गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 13:12 IST

आता जय श्रीराम नाही, तर जय हिंद म्हणायची वेळी आली आहे, असे वरुण गांधी यांनी म्हटले आहे.

पिलिभीत: गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते वरुण गांधी (Varun Gandhi) केंद्रातील मोदी सरकार आणि आपल्याच पक्षावर सातत्याने टीका करताना पाहायला मिळत आहेत. वरुण गांधी कधीही भाजपला रामराम करू शकतात, अशा चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे सांगितले जात आहे. यातच आता महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) जयंतीच्या दिवशी गोडसे (Nathuram Godse) जिंदाबाद बोलणाऱ्या लोकांना फाशी दिली पाहिजे, असे टीकास्त्र वरुण गांधी यांनी सोडले.

आपल्या पिलिभीत मतदारसंघात अंगणवाडी सेविका आणि अन्य महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना वरुण गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला. वेतन, कामाबाबतच निश्चिती अशा काही मूलभूत मागण्यांसाठी या महिला कर्मचारी आंदोलन करत आहेत. आता जय हिंद म्हणण्याची वेळ आली आहे. आपल्याला एक हिंदुस्थान करायचा आहे. सरकार कुणाचे आहे, याची मला फिकीर नाही. मी तुमच्यासोबत आहे, असे वरुण गांधी म्हणाले. 

आता जय श्रीराम नाही, जय हिंद म्हणायची वेळ आलीय

मी इथे काही मुख्यमंत्र्यांना किंवा पंतप्रधानांना निवेदन देण्यासाठी आलेलो नाही, मी देशाचे राजकारण करायला आलो आहे. आज माझ्यासमोर आख्खा देश बसला आहे. माझ्यासमोर ना कुणी हिंदू आहे ना कुणी मुसलमान, ना कुणी पुढारलेला आहे, ना कुणी मागास. असा भेद करून आपण हिंदुस्थानला कमकुवत करत आहोत. आता जय श्रीराम नाही, तर जय हिंद म्हणायची वेळी आली आहे, असेही वरुण गांधी यांनी म्हटले आहे. 

गोडसेंचा जयघोष करणाऱ्यांना फाशी दिली पाहिजे

महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिवशी गोडसे जिंदाबाद बोलणाऱ्या लोकांना फाशी दिले पाहिजे. भगवान राम मर्यादा पुरुषोत्तम होते. ज्यांनी लोकांना जोडण्याचे काम केले. गांधीजींच्या जयंतीच्या दिवशी सोशल मीडियावर गोडसे जिंदाबाद ट्रेंड होत होता, असेही ते म्हणाले.  

टॅग्स :Varun Gandhiवरूण गांधीMahatma Gandhiमहात्मा गांधीBJPभाजपाNathuram Godseनथुराम गोडसे