शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

समाजात दुही पाडण्यासाठी रथयात्रेचा भाजपकडून वापर; मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 05:12 IST

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, रथयात्रा एक धार्मिक महोत्सव आहे. आपण सर्वच यात सहभागी असतो. भगवान जगन्नाथ, बलराम आणि देवी सुभद्रा त्या रथांतून प्रवास करतात; परंतु, भाजपचे नेते समाजात फूट पाडण्याच्या उद्देशाने रथयात्रा काढत आहेत.

रायगंज (पश्चिम बंगाल) : आपण देवच आहोत, अशा थाटात भाजप नेते रथांतून फिरत आहेत, अशा शब्दांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी  भाजप नेत्यांच्या रथयात्रेची खिल्ली उडविली.  धर्माच्या आधारे समाजात दुही निर्माण करणे, हा त्यांचा राजकीय कार्यक्रम आहे, असा आरोपही त्यांनी केला. रायगंज येथील सभेेत बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, रथयात्रा एक धार्मिक महोत्सव आहे. आपण सर्वच यात सहभागी असतो. भगवान जगन्नाथ, बलराम आणि देवी सुभद्रा त्या रथांतून प्रवास करतात; परंतु, भाजपचे नेते समाजात फूट पाडण्याच्या उद्देशाने रथयात्रा काढत आहेत. आपण देवच आहोत, अशा आविर्भावात भाजप नेते रथयात्रा काढत आहेत.प. बंगालमध्ये एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजप राज्याबाहेरील लोकांना आणत आहे, या आरोपाचाही ममता बॅनर्जी यांनी पुनरुच्चार केला. भाजपचे नेते फक्त फोटो काढण्यासाठी स्थानिक लोकांच्या घरी भोजन करीत आहेत. काही बाहेरचे लोक अलीशान कारमधून येत आहेत. फोटो काढण्यासाठी स्थानिक गावकऱ्यांच्या घरी भोजन करतात. प्रत्यक्षात हे भोजन पंचतारांकित हॉटेलातील असते, असा आरोपही त्यांनी केला.

  गुजरातमधून आलेले लोक नव्हे,तर, प. बंगालवर राज्यांतील लोकच राज्य करतील, असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगाल