शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

CoronaVirus: “PM मोदी आहेत म्हणून देश वाचला, काँग्रेस असती तर काय झाले असते कुणास ठाऊक”

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 10:48 IST

CoronaVirus: उत्तर प्रदेशचे भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी काँग्रेसवर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, म्हणून देश वाचला आहे, असे म्हटले आहे.

ठळक मुद्देPM मोदी आहेत म्हणून देश वाचलाकाँग्रेस असती तर काय झाले असते कुणास ठाऊकउत्तर प्रदेश भाजप प्रदेशाध्यक्षांचे टीकास्त्र

लखनऊ: कोरोना संकटाचे देशभरात थैमान सुरू आहे. दुसऱ्या लाटेचा प्रभाव अंशतः कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत असली, तरी कोरोनामुळे होणारे मृत्यू अद्यापही चिंतेत भर टाकणारे ठरत आहेत. अशातच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी मोठ्या प्रमाणात झडताना दिसत आहे. विरोध आणि सत्ताधारी पक्ष टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. उत्तर प्रदेशचे भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी काँग्रेसवर टीका करत पंतप्रधाननरेंद्र मोदी आहेत, म्हणून देश वाचला आहे, असे म्हटले आहे. (bjp swatantra dev singh says pm modi well handled corona situation in country)

स्वतंत्र देव सिंह यांनी एका पत्रकार परिषदेत सदर विधान केले आहे. पंतप्रधाननरेंद्र मोदी आहेत म्हणून देश वाचला, काँग्रेस सत्तेत असती, तर काय झाले असते, याची कल्पना करवत नाही, अशी टीका त्यांनी केली. मात्र, यानंतर सोशल मीडियावर स्वतंत्र देव सिंह यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत असून, ते ट्रोलही झाल्याची माहिती मिळाली आहे. 

‘ब्लॅक फंगस’चा साथरोग कायद्यात समावेश करावा; केंद्राची नवी नियमावली

काँग्रेस एक नंबरचा खोटारडा पक्ष

कोरोना संकटाच्या काळात रुग्णांना कशा प्रकारे मदत पोहोचवायची, लाभ मिळवून द्यायचे, यासाठी पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ उत्तम प्रकारे काम करत आहेत. परिस्थिती हाताळत आहेत. काँग्रेस हा एक नंबरचा खोटारडा पक्ष आहे. सर्वांना आता हे माहिती झाले आहे. पंतप्रधान मोदी आहेत म्हणून देश वाचला आहे, काँग्रेस असती तर काय झाले असते कुणास ठाऊक, असे स्वतंत्र देव सिंह यावेळी बोलताना म्हणाले.

“ना ढासळलेल्या अर्थव्यवस्थेची, ना चीनच्या घुसखोरीची; मोदी सरकार कसलीच जबाबदारी घेत नाही”

पंतप्रधान मोदींची संकटात संधी 

स्वतंत्र देव सिंह पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ अनेक आघाड्यांवर लढत आहेत. आव्हान, संकटाचे रुपांतर संधीत करण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून केले जात आहेत. समाजाचा सहयोग त्यांना मिळत आहे. गाव, गरीब आणि शेतकरी बंधू या संकटातून कसे वाचतील, हे मोठे आव्हान असल्याचे ते म्हणाले. दुसरीकडे, स्वतंत्र देव सिंह यांना अशा वक्तव्यामुळे मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे.   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाyogi adityanathयोगी आदित्यनाथ