शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

CoronaVirus: “ना ढासळलेल्या अर्थव्यवस्थेची, ना चीनच्या घुसखोरीची; मोदी सरकार कसलीच जबाबदारी घेत नाही”

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 15:47 IST

CoronaVirus: भाजप खासदाराने केंद्रातील मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

ठळक मुद्देसुब्रमण्यम स्वामींचा भाजपला घरचा अहेरकेंद्रातील मोदी सरकारवर साधला निशाणा

नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक देशभरात कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. नवीन कोरोनाबाधितांची संख्या घटताना दिसत असली, तरी कोरोनामुळे होणारे मृत्यू वाढत आहेत. कोरोना संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळत चालल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे चीनच्या कुरघोड्याही अधूनमधून सुरू आहेत. या तिहेरी संकटाशी लढत असताना भाजप खासदाराने केंद्रातील मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. केंद्रातील मोदी सरकार कसलीच जबाबदारी घेत नसल्याची टीका करण्यात आली आहे. (bjp subramanian swamy criticised modi govt over collapsing economy and china intrusion)

भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधताना दिसत आहेत. अनेक मुद्द्यांवरून ते सरकारला घरचा आहेर देत आहेत. आता कोलमडत जात असलेली अर्थव्यवस्था आणि लडाख भागात चीनची सुरू असलेली घुसखोरी यांवरून स्वामी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. याप्रकरणी स्वामी यांनी एक ट्विट केले आहे. 

मस्तच! आता Ration Card नसेल तरीही मिळणार मोफत धान्य; सरकारचा दिलासा

मोदी सरकार कसलीच जबाबदारी घेत नाही

सन २०१६ पासून कोलमडत चाललेल्या अर्थव्यवस्थेची जबाबदारी कुणीही घेतलेली नाही. तसेच लडाख भागात चीनकडून होत असलेली घुसखोरी थांबवण्यात अपयश आल्याबाबत कुणीही जबाबदारी घेतली आहे. एवढेच नव्हे तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी उपाययोजना न करण्याबाबत जबाबदारी घेतली, असे सांगत मोदी सरकार कसलीच जबाबदारी घेत नसल्याची टीका सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. 

ऐकावं ते नवलच! संकटापासून बचावासाठी थेट कोरोना देवीची स्थापना; धोका कमी होत असल्याचा दावा

भारत एकटा पडण्याच्या स्थितीत 

आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या घडामोडी सूरू असून, अमेरिका आणि रशिया यांनी आपापसातील वितुष्ट मिटवले असून, लवकरच याची घोषणा केली जाईल. याला चीननेही समर्थन दिले असून, भारत आता एकटा पडण्याच्या स्थितीत आहे, असा दावा करत हवे असेल, तर आपल्या परराष्ट्रमंत्र्यांना विचारा, असे स्वामी यांनी म्हटले आहे. 

Corona Vaccine वर नागरिकांची शंका; ‘या’ देशाने जाळले तब्बल २० हजार डोस!

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात २ लाख ७६ हजार ०७० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर, दिलासादायक बाब म्हणजे याच कालावधीत देशात ३ लाख ६९ हजार ७७ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. गेल्या २४ तासांत ३,८७४ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसEconomyअर्थव्यवस्थाindia china faceoffभारत-चीन तणावSubramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण