शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
3
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
4
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
5
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
6
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
7
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
8
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
9
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
10
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
11
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
12
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
13
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
14
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
15
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
16
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
17
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
18
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
19
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
20
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: “ना ढासळलेल्या अर्थव्यवस्थेची, ना चीनच्या घुसखोरीची; मोदी सरकार कसलीच जबाबदारी घेत नाही”

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 15:47 IST

CoronaVirus: भाजप खासदाराने केंद्रातील मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

ठळक मुद्देसुब्रमण्यम स्वामींचा भाजपला घरचा अहेरकेंद्रातील मोदी सरकारवर साधला निशाणा

नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक देशभरात कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. नवीन कोरोनाबाधितांची संख्या घटताना दिसत असली, तरी कोरोनामुळे होणारे मृत्यू वाढत आहेत. कोरोना संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळत चालल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे चीनच्या कुरघोड्याही अधूनमधून सुरू आहेत. या तिहेरी संकटाशी लढत असताना भाजप खासदाराने केंद्रातील मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. केंद्रातील मोदी सरकार कसलीच जबाबदारी घेत नसल्याची टीका करण्यात आली आहे. (bjp subramanian swamy criticised modi govt over collapsing economy and china intrusion)

भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधताना दिसत आहेत. अनेक मुद्द्यांवरून ते सरकारला घरचा आहेर देत आहेत. आता कोलमडत जात असलेली अर्थव्यवस्था आणि लडाख भागात चीनची सुरू असलेली घुसखोरी यांवरून स्वामी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. याप्रकरणी स्वामी यांनी एक ट्विट केले आहे. 

मस्तच! आता Ration Card नसेल तरीही मिळणार मोफत धान्य; सरकारचा दिलासा

मोदी सरकार कसलीच जबाबदारी घेत नाही

सन २०१६ पासून कोलमडत चाललेल्या अर्थव्यवस्थेची जबाबदारी कुणीही घेतलेली नाही. तसेच लडाख भागात चीनकडून होत असलेली घुसखोरी थांबवण्यात अपयश आल्याबाबत कुणीही जबाबदारी घेतली आहे. एवढेच नव्हे तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी उपाययोजना न करण्याबाबत जबाबदारी घेतली, असे सांगत मोदी सरकार कसलीच जबाबदारी घेत नसल्याची टीका सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. 

ऐकावं ते नवलच! संकटापासून बचावासाठी थेट कोरोना देवीची स्थापना; धोका कमी होत असल्याचा दावा

भारत एकटा पडण्याच्या स्थितीत 

आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या घडामोडी सूरू असून, अमेरिका आणि रशिया यांनी आपापसातील वितुष्ट मिटवले असून, लवकरच याची घोषणा केली जाईल. याला चीननेही समर्थन दिले असून, भारत आता एकटा पडण्याच्या स्थितीत आहे, असा दावा करत हवे असेल, तर आपल्या परराष्ट्रमंत्र्यांना विचारा, असे स्वामी यांनी म्हटले आहे. 

Corona Vaccine वर नागरिकांची शंका; ‘या’ देशाने जाळले तब्बल २० हजार डोस!

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात २ लाख ७६ हजार ०७० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर, दिलासादायक बाब म्हणजे याच कालावधीत देशात ३ लाख ६९ हजार ७७ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. गेल्या २४ तासांत ३,८७४ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसEconomyअर्थव्यवस्थाindia china faceoffभारत-चीन तणावSubramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण