शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

लंडनमधील क्वारंटाइन काळात एस. जयशंकर यांना वेटरसारखे कपडे!; भाजप खासदाराचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 09:38 IST

भाजपच्या एका खासदाराने परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना योग्य वागणूक दिली गेली नसल्याचा दावा केला आहे.

ठळक मुद्देसुब्रमण्यम स्वामींचा मोठा दावाएस. जयशंकर यांना योग्य वागणूक दिली नसल्याचा दावा

नवी दिल्ली: देशात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. कोरोनाबाधित आणि कोरोना मृत्यूचे प्रमाण वाढत चालले आहे. यातच भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी लंडन येथे जी७ देशांच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावत भारताला मदत करणाऱ्या सर्व देशांचे आभार मानले. मात्र, याच कार्यक्रमावरून आता राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. कारण भाजपच्या एका खासदाराने परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना योग्य वागणूक दिली गेली नसल्याचा दावा केला आहे. (bjp subramanian swamy claims external affairs minister s jaishankar dressed like waiter in quarantine)

एस. जयशंकर यांनी जी७ देशांच्या एका कार्यक्रमात सहभागी होत भारतातील कोरोनाची परिस्थिती आणि निवडणुका यांवर सविस्तर भाष्य केले होते. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या परदेश वारीबद्दल भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एक ट्विट करत एक दावा केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाल्याचे समजते. गेल्या काही दिवसांपूर्वी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि प्रतिनिधी मंडळातील दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. यानंतर या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले होते. 

एस. जयशंकर यांना वेटरचे कपडे

सुब्रमण्यम स्वामी यांनी एक ट्विट करत यावर भाष्य केले आहे. मला समजले आहे की, भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना लंडनमध्ये क्वारंटाइन करण्यात आले असून, त्यांना वेटरसारखे कपडे देण्यात आले होते, असा दावा करत एस. जयशंकर आता मायदेशात परत येऊ शकत नाहीत. परंतु, ही बाब असत्य असल्यास खंडन करावे, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. 

सलाम! ५ महिन्यांच्या बाळावर यशस्वी उपचार; चिमुकल्या जीवासाठी १६ कोटींचे महादान

कोरोनाविरुद्ध लढ्याची जबाबदारी गडकरींकडे द्या

पंतप्रधान कार्यालय हे सध्याच्या कोरोना संकट काळात काहीच कामाचे नसून सध्याची कोरोनाची परिस्थिती हातळण्याची सर्व जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे सहकारी असणाऱ्या नितीन गडकरी यांच्याकडे द्यावी, अशी मागणी सुब्रमण्यम स्वामी यांनी अलीकडेच केली आहे. यासंदर्भात सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट केले होते. त्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले होते. 

क्या बात! ४ वेळा कोरोनावर मात; दोनदा प्लाझ्मादान, कोरोना वॉरियरची कौतुकास्पद कामगिरी

नितीन गडकरीच का?

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन खूपच नम्र असून, त्यांना त्यांच्या खात्याचे काम मोकळेपणाने करू दिले जात नाही; परंतु, अधिकारवाणीने बोलणाऱ्या नेत्यांसारखे ते नसून खूपच नम्र आहेत. गडकरींसोबत काम केल्याने त्यांच्यातील हा गुण नक्कीच बहरेल, नितीन गडकरीच का? असा प्रश्न एकाने विचारला असता स्वामी म्हणाले की, कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी योग्य आरोग्य व्यवस्था उभारणीची गरज लागेल. यामध्ये गडकरींनी यापूर्वीच स्वत:ला सिद्ध करून दाखविले आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाSubramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीS. Jaishankarएस. जयशंकरLondonलंडन