शहरं
Join us  
Trending Stories
1
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
2
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
3
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारावरून अमेरिकेत गोंधळ; राष्ट्रपतींच्या टॅरिफ पॉवरवर न्यायालय आज निर्णय देणार
5
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
6
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
7
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?
8
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
9
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
10
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
11
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
12
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
13
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
14
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
15
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार
16
आमिर-जुनैदनं रिक्रिएट केला 'अंदाज अपना अपना' मधील आयकॉनिक सीन, पाहा मजेशीर VIDEO
17
आज शितला सप्तमीच्या मुहूर्तावर सुरु करा रोज ५ मिनिटं शेगडी पूजन; अन्नपूर्णा होईल प्रसन्न!
18
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
19
Video: विचित्र घटना; 'मौत का कुआं'मध्ये तरुण कोसळला; बाईक रायडरशिवाय तासभर धावत राहिली
20
चमत्कार! "मी वर तरंगत होते अन् माझं शरीर..."; १७ मिनिटांचा 'मृत्यू', महिलेसोबत काय घडलं?

भाजपा 'वन मॅन आर्मी'च्या चक्रव्यूहात अडकलीये, बाहेर पडली नाही तर विनाश नक्की - शत्रुघ्न सिन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 11:58 IST

शत्रुघ्न सिन्हा बोलले आहेत की, भाजपा तेव्हाच लोकांच्या अपेक्षांवर उतरु शकते जेव्हा ते 'वन मॅन शो' आणि 'टू मॅन आर्मी'च्या चक्रव्यूहातून बाहेर पडेल. त्यांनी सांगितलं की, 'देशातील तरुण, शेतकरी आणि व्यापारी भाजपा सरकारच्या धोरणांमुळे नाराज आहे'. 

ठळक मुद्देशत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधला'भाजपा तेव्हाच लोकांच्या अपेक्षांवर उतरु शकते जेव्हा ते 'वन मॅन शो' आणि 'टू मॅन आर्मी'च्या चक्रव्यूहातून बाहेर पडेल''देशातील तरुण, शेतकरी आणि व्यापारी भाजपा सरकारच्या धोरणांमुळे नाराज आहे'

नवी दिल्ली- भाजपा खासदार आणि अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. शत्रुघ्न सिन्हा बोलले आहेत की, भाजपा तेव्हाच लोकांच्या अपेक्षांवर उतरु शकते जेव्हा ते 'वन मॅन शो' आणि 'टू मॅन आर्मी'च्या चक्रव्यूहातून बाहेर पडेल. त्यांनी सांगितलं की, 'देशातील तरुण, शेतकरी आणि व्यापारी भाजपा सरकारच्या धोरणांमुळे नाराज आहे'. 

शत्रुघ्न सिन्हा यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं की, 'मला वाटतं आम्हाला गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन्ही विधानसभा निवडणुकीत कडव्या आव्हानांचा सामना करत आहोत. कारण तरुण, शेतकरी आणि व्यापा-यांमध्ये केंद्र सरकारच्या धोरणांवरुन नाराजी आहे'.

शत्रुघ्न सिन्हा हे पाटलीपुत्रमधून लोकसभा खासदार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून आपल्या वक्तव्यांमुळे ते नेहमी चर्चेत राहत आहेत. काही दिवसांपुर्वी त्यांनी माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांचं समर्थन करताना, देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. जेव्हा त्यांना भाजपा पक्ष सोडण्याचा विचार करत आहात का ? असं विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की, 'मी सोडण्यासाठी भाजपा पक्षात सामील झालो नव्हतो. पण जेव्हा कधी मी बोलतो की आम्ही आव्हानांचा सामना करुन शकत नाही, तेव्हा मी याकडे दुर्लक्ष करु शकत नाही की, पक्ष 'वन मॅन शो' आणि 'टू मॅन आर्मी होत चालला आहे'.

ज्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षासाठी इतकं काम केलं, अनेक गोष्टींचा त्याग देऊन पक्ष उभा केला त्यांचा आशिर्वाद घेऊन निर्धाराने लढाई लढली पाहिजे असं शत्रुघ्न सिन्हा बोलले आहेत. 'मला आजपर्यंत हे समजलेलं नाही की, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा आणि अरुण शौरी यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांची काय चूक आहे जे त्यांना साइडलाइन केलं जात आहे. त्यांना अर्ध्यावर का सोडण्यात आलं आहे. आपण सर्व कुटुंबाचे सदस्य आहोत. जर यांच्यापैकी कोणीही चुकलं असेल, तर ती चूक विसरली जाऊ शकत नाही का ?' असा प्रश्न शत्रुघ्न सिन्हा यांनी यावेळी विचारला. 

टॅग्स :Shatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हाBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाह