शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

भाजपा 'वन मॅन आर्मी'च्या चक्रव्यूहात अडकलीये, बाहेर पडली नाही तर विनाश नक्की - शत्रुघ्न सिन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 11:58 IST

शत्रुघ्न सिन्हा बोलले आहेत की, भाजपा तेव्हाच लोकांच्या अपेक्षांवर उतरु शकते जेव्हा ते 'वन मॅन शो' आणि 'टू मॅन आर्मी'च्या चक्रव्यूहातून बाहेर पडेल. त्यांनी सांगितलं की, 'देशातील तरुण, शेतकरी आणि व्यापारी भाजपा सरकारच्या धोरणांमुळे नाराज आहे'. 

ठळक मुद्देशत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधला'भाजपा तेव्हाच लोकांच्या अपेक्षांवर उतरु शकते जेव्हा ते 'वन मॅन शो' आणि 'टू मॅन आर्मी'च्या चक्रव्यूहातून बाहेर पडेल''देशातील तरुण, शेतकरी आणि व्यापारी भाजपा सरकारच्या धोरणांमुळे नाराज आहे'

नवी दिल्ली- भाजपा खासदार आणि अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. शत्रुघ्न सिन्हा बोलले आहेत की, भाजपा तेव्हाच लोकांच्या अपेक्षांवर उतरु शकते जेव्हा ते 'वन मॅन शो' आणि 'टू मॅन आर्मी'च्या चक्रव्यूहातून बाहेर पडेल. त्यांनी सांगितलं की, 'देशातील तरुण, शेतकरी आणि व्यापारी भाजपा सरकारच्या धोरणांमुळे नाराज आहे'. 

शत्रुघ्न सिन्हा यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं की, 'मला वाटतं आम्हाला गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन्ही विधानसभा निवडणुकीत कडव्या आव्हानांचा सामना करत आहोत. कारण तरुण, शेतकरी आणि व्यापा-यांमध्ये केंद्र सरकारच्या धोरणांवरुन नाराजी आहे'.

शत्रुघ्न सिन्हा हे पाटलीपुत्रमधून लोकसभा खासदार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून आपल्या वक्तव्यांमुळे ते नेहमी चर्चेत राहत आहेत. काही दिवसांपुर्वी त्यांनी माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांचं समर्थन करताना, देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. जेव्हा त्यांना भाजपा पक्ष सोडण्याचा विचार करत आहात का ? असं विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की, 'मी सोडण्यासाठी भाजपा पक्षात सामील झालो नव्हतो. पण जेव्हा कधी मी बोलतो की आम्ही आव्हानांचा सामना करुन शकत नाही, तेव्हा मी याकडे दुर्लक्ष करु शकत नाही की, पक्ष 'वन मॅन शो' आणि 'टू मॅन आर्मी होत चालला आहे'.

ज्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षासाठी इतकं काम केलं, अनेक गोष्टींचा त्याग देऊन पक्ष उभा केला त्यांचा आशिर्वाद घेऊन निर्धाराने लढाई लढली पाहिजे असं शत्रुघ्न सिन्हा बोलले आहेत. 'मला आजपर्यंत हे समजलेलं नाही की, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा आणि अरुण शौरी यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांची काय चूक आहे जे त्यांना साइडलाइन केलं जात आहे. त्यांना अर्ध्यावर का सोडण्यात आलं आहे. आपण सर्व कुटुंबाचे सदस्य आहोत. जर यांच्यापैकी कोणीही चुकलं असेल, तर ती चूक विसरली जाऊ शकत नाही का ?' असा प्रश्न शत्रुघ्न सिन्हा यांनी यावेळी विचारला. 

टॅग्स :Shatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हाBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाह