शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांवरील अत्याचाराविरोधात ठाकरे सरकारनं आणलेलं 'शक्ती विधेयक' केंद्र सरकारनं नाकारलं, कारण...
2
मातृभाषेसोबतच आणखी एक भारतीय भाषा शिकवा; यूजीसीचं सर्व राज्यांना पत्र, नियमावली जारी
3
Donald Trump: "मी ८ युद्धे थांबवली, पण रशिया-युक्रेन संघर्ष थांबवणं सोपं नाही..." ट्रम्प असं का म्हणाले?
4
Russia Attack Ukraine: ६५३ ड्रोन्स, ५१ मिसाईल; युक्रेन हादरले! रशियाचा मोठा हवाई हल्ला
5
Goa Fire :  कुटुंबाचा आधार गेला! पैसे कमावण्यासाठी गोव्यात आलेले दोन भाऊ; क्लबच्या आगीत झाला मृत्यू
6
फक्त ७.१०% च्या व्याजदरावर 'इकडे' मिळतंय होमलोन; ₹८० लाखांच्या कर्जासाठी किती हमी मंथली सॅलरी, EMI किती?
7
गोव्यातील भीषण आगीत अवघ्या १५ मिनिटांत कुटुंब उद्ध्वस्त; चौघांचा मृत्यू, एकमेव पत्नी बचावली
8
घरबसल्या श्रीमंत व्हाल! 'या' सरकारी योजनेत गुंतवणूक करा आणि मिळवा ₹४० लाखांपेक्षा अधिक टॅक्स फ्री रक्कम
9
संसार वाचवण्यासाठी 'ती' सहन करत राहिली, पण नराधम पतीने हद्दच ओलांडली! मारहाण केली अन्...
10
काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
11
आजचे राशीभविष्य, ०८ डिसेंबर २०२५: आपण केलेल्या कामातून यश अन् कीर्ती लाभ होईल
12
इंडिगोवर मोठा आर्थिक दंड लावा; डीजीसीए आणि कंपनीच्या प्रमुखांना हटवा
13
यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा
14
देशातील सर्वांत मोठी एअरलाइन का डगमगली?; नवीन नियमांमुळे संकट! कमी कर्मचारी मॉडेलचाही फटका
15
विमानसेवाच जमीनदोस्त ! अनेक विमानतळांवर गोंधळ सुरू, प्रवाशांचे हाल
16
विरोधी पक्षनेतेपद मुद्यावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; ‘मविआ’ला खुर्चीचीच चिंता असल्याची सरकारची टीका
17
महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
18
विमानतळावर इंडिगोने स्थापन केला आपत्ती व्यवस्थापन गट; अडथळ्यांबाबत २४ तासांत स्पष्टीकरण देण्याची नोटीस
19
क्रिकेटपटू स्मृती मानधना अन् पलाशचे लग्न अखेर माेडले; कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा : स्मृती
20
...ये दोस्ती हम नही तोडेंगे ! मोदी आणि पुतीन यांच्या भेटीकडे अमेरिका, युरोप आणि चीनचेही होते लक्ष
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण भारतात भाजपला मर्यादाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 04:32 IST

दक्षिण भारतातील पाच राज्यांत आणि तीन केंद्रशासित प्रदेशांतील १३२ मतदारसंघांमध्ये भाजपला केवळ तीस जागा मिळाल्या आहेत;

- वसंत भोसलेदेशाच्या अनेक राज्यांत मोदी लाट आली असताना दक्षिण भारतातील पाच राज्यांत आणि तीन केंद्रशासित प्रदेशांतील १३२ मतदारसंघांमध्ये भाजपला केवळ तीस जागा मिळाल्या आहेत; शिवाय मित्रपक्षांचाही दारुण पराभव झाला आहे. कर्नाटक या एकमेव राज्यानेच मोदी लाटेत उडी घेतली आहे. याउलट प्रादेशिक पक्षांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व दाखवून दिले आहे.तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांत अनेक वर्षांपासून प्रादेशिक पक्षांचा दबदबा आहे. तमिळनाडूत तर ५२ वर्षांपूर्वी राष्ट्रीय पक्षाचा पराभव झाला आहे तेव्हापासून द्रविड मुनेन कळघम किंवा अण्णा द्रमुक या पक्षांची सत्ता येते. लोकसभेच्या निवडणुकीत याच पक्षांना यश मिळते. या पक्षांबरोबर राष्ट्रीय पक्षांना जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. दक्षिण भारतातील पाच राज्यांत आणि तीन केंद्रशासित प्रदेशांत १३२ लोकसभेचे मतदारसंघ आहेत. सन २०१४ च्या निवडणुकीत प्रादेशिक पक्ष आणि अन्य स्थानिक पक्षांना यापैकी ९० जागा मिळाल्या होत्या. भाजप आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांना अनुक्रमे २२ आणि २० जागा मिळाल्या होत्या.तमिळनाडूमध्ये सत्तारूढ अण्णा द्रमुक-भाजप या युतीला केवळ एकच जागा मिळाली. द्रमुक पक्षाने काँग्रेस, मार्क्सवादी आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष तसेच पीएमके, आदी पक्षांबरोबर महागठबंधन केले होते. या महागठबंधनने ३८ पैकी ३७ जागा जिंकल्या. त्यामध्ये द्रमुकला २२, काँग्रेस आठ, तर डाव्या पक्षांना चार जागा मिळाल्या आहेत.कर्नाटकात भाजपने मुसंडी मारत आपलाच पक्ष प्रथम क्रमांकावर आहे, हे सिद्ध केले आहे. राज्यात गतवर्षी सत्तेवर आलेल्या काँग्रेस जनता दल आघाडीचा सपशेल पराभव झाला आहे. भाजपने २५ जागा जिंकल्या, तर काँग्रेस आणि जनता दलास प्रत्येकी एकच जागा मिळाली आहे. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, माजी मुख्यमंत्री वीराप्पा मोईली, ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे, आदींचा पराभव झाला आहे. भाजपने ही निवडणूक एकतर्फीच जिंकली आहे. एका जागेवर (मंड्या) अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. त्यालाही भाजपचा पाठिंबा होता.

आंध्र प्रदेशात भाजपचा करिष्मा चालला नाही. काँग्रेसही स्पर्धेत राहिली नाही. या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना २५ पैकी एकही जागा मिळाली नाही. याउलट सत्तारूढ तेलगू देसम या पक्षाला पर्यायी वायएसआर काँग्रेस या नव्या प्रादेशिक पक्षाचा उदय झाला आहे. तो प्रथम राज्यातही सत्तारूढ होतो आहे. लोकसभेच्या २२ जागा जिंकणाऱ्या वायएसआर काँग्रेसच्या जगनमोहन रेड्डी यांच्याकडे विधानसभेत बहुमत दिले आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या राजकारणाला वेसण घातली गेली आहे.>काही महिन्यांपूर्वी तेलंगणा विधानसभेची निवडणूक एकतर्फी जिंकणारा तेलंगणा राष्ट्रीय समितीस थोडा धक्का देण्यात विरोधकांना यश आले आहे. समितीला १७ पैकी ९ जागा मिळाल्या आहेत. मात्र, मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या कन्येचा पराभव झाला आहे. भाजपने एका जागेवरून उडी मारत चार जागा पटकाविल्या आहेत. काँग्रेसला तीन आणि एमआयएमला एक जागा मिळाली आहे. लक्षद्वीप, पुडुचेरी व अंदमान-निकोबार या केंद्रशासित प्रदेशांत प्रत्येकी एक जागा काँग्रेसने जिंकली आहे.
>केरळमध्ये सत्तारूढ डाव्या आघाडीला काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडीने जोरदार धक्का दिला. २० पैकी १९ जागा या आघाडीने जिंकल्या. त्यात काँग्रेसच्या पंधरा जागांचा समावेश आहे. पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी वायनाड मतदारसंघातून जिंकले. डाव्या आघाडीला तीनच जागा मिळाल्या.>दक्षिण भारतातील पक्षीय बलाबल२०१४राज्य जागा भाजप काँग्रेस प्रादेशिक अन्यतेलंगणा १७ १ २ ११ (टीआरएस) ३आंध्रप्रदेश २५ २ - १५ (तेदे) ८ (वायएस) -तमिळनाडू ३९ १ - ३७ (अण्णा द्रमुक)केरळ २० - ९ ६ (डावे) ५कर्नाटक २८ १७ ९ २ (जद) -लक्षद्वीप १ - - १ (राष्ट्रवादी) -अंदमान १ १ - - -पुडुचेरी १ - - १ १एकूण १३२ २२ २० ७२ १८>२०१९राज्य भाजप काँग्रेस प्रादेशिक अन्यतेलंगणा ४ ३ ९ (टीआरएस) १आंध्रप्रदेश - - ३ (तेदे) २२ (वायएस)तमिळनाडू - ८ २२ (द्रमुक) ८केरळ - १५ ३ डावे २कर्नाटक २६ १ १ (जद) -लक्षद्वीप - १ - -अंदमान - १ - -पुडुचेरी - १ - -एकूण ३० ३० ३८ ३३

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९