शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

"गांधी कुटुंबाने गरीब जनतेचा फक्त मतांसाठी केला वापर, मतदारसंघात सुविधांचा अभाव"; स्मृती इराणींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 16:22 IST

Smirit Irani And Rahul Gandhi : स्मृती इराणी यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smirit Irani) यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi Wadra) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मतांसाठी राजकारण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. "मी पहिल्यांदा जेव्हा अमेठीत आले तेव्हा इथे जिल्हाधिकारी कार्यालय नव्हते, मुख्य वैद्यकीय अधिकारी कार्यालयात अनुपस्थित होते, मुख्य शिक्षणाधिकारी कार्यालय अस्तित्वात नव्हते. एवढंच नव्हे तर इथे रुग्णालयात मूलभूत सुविधा उपलब्ध नव्हत्या, ट्रॉमा सेंटर नव्हते, महिला आणि मुलांसाठी विशेष रुग्णालये नव्हती, योग्य अग्निशमन केंद्र नव्हते" असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. 

"अमेठीच्या जनतेला मागच्या तीन-चार दशकांपासून फक्त आश्वासनंच मिळाली होती. वैद्यकीय महाविद्यालयाचं देखील आश्वासन देण्यात आलेलं पण ते अस्तित्वात मात्र आलं नव्हतं. गेली अनेक वर्षे अमेठीला ज्या गोष्टींची आश्वासनं मिळाली होती, त्या सगळ्या गोष्टी आज अस्तित्वात आहेत" असं म्हणत स्मृती इराणी यांनी टीकास्त्र सोडलं आहे. तसेच "गांधी कुटुंबाने अमेठीतील गरीब जनतेचा फक्त मतांसाठी वापर केला. बाकी त्यांच्यासाठी काहीच केलं नाही. मतदारसंघात पायाभूत सुविधांचा अभाव आहे" असं देखील म्हटलं आहे. न्यूज १८ला दिलेल्या विशेष मुलाखतीत स्मृती इराणी यांनी हे म्हटलं आहे. 

"भाजपाची सत्ता आल्यानंतर तीन लाख शौचालये बांधण्यात आली"

"सध्या प्रियंका गांधी 'लड़की हूं लड़ सकती हूं' अशी मोहीम चालवत आहे, मग त्या भावासोबत येथे का आल्या? त्या एकट्या लढू शकत नाहीत का? जर मुलींबाबत त्या बोलत असतील तर अमेठीत वर्षानुवर्षे महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे का बांधली गेली नाहीत. भाजपाची सत्ता आल्यानंतर तीन लाख शौचालये बांधण्यात आली आहेत. अमेठीच्या ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांकडे राहण्यासाठी घरे नव्हती. मात्र आता प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेंतर्गत अनेक कुटुंबांना घराची भेट मिळाली आहे. गांधी घराण्याने घर किंवा वैद्यकीय महाविद्यालये बांधली नाहीत. माझ्या कार्यकाळात अमेठी येथील रुग्णालयात पहिले सीटी स्कॅन मशीन आणण्यात आले" असं म्हणत इराणी यांनी जोरदार टीका केली आहे.  

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधी