शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

"गांधी कुटुंबाने गरीब जनतेचा फक्त मतांसाठी केला वापर, मतदारसंघात सुविधांचा अभाव"; स्मृती इराणींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 16:22 IST

Smirit Irani And Rahul Gandhi : स्मृती इराणी यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smirit Irani) यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi Wadra) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मतांसाठी राजकारण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. "मी पहिल्यांदा जेव्हा अमेठीत आले तेव्हा इथे जिल्हाधिकारी कार्यालय नव्हते, मुख्य वैद्यकीय अधिकारी कार्यालयात अनुपस्थित होते, मुख्य शिक्षणाधिकारी कार्यालय अस्तित्वात नव्हते. एवढंच नव्हे तर इथे रुग्णालयात मूलभूत सुविधा उपलब्ध नव्हत्या, ट्रॉमा सेंटर नव्हते, महिला आणि मुलांसाठी विशेष रुग्णालये नव्हती, योग्य अग्निशमन केंद्र नव्हते" असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. 

"अमेठीच्या जनतेला मागच्या तीन-चार दशकांपासून फक्त आश्वासनंच मिळाली होती. वैद्यकीय महाविद्यालयाचं देखील आश्वासन देण्यात आलेलं पण ते अस्तित्वात मात्र आलं नव्हतं. गेली अनेक वर्षे अमेठीला ज्या गोष्टींची आश्वासनं मिळाली होती, त्या सगळ्या गोष्टी आज अस्तित्वात आहेत" असं म्हणत स्मृती इराणी यांनी टीकास्त्र सोडलं आहे. तसेच "गांधी कुटुंबाने अमेठीतील गरीब जनतेचा फक्त मतांसाठी वापर केला. बाकी त्यांच्यासाठी काहीच केलं नाही. मतदारसंघात पायाभूत सुविधांचा अभाव आहे" असं देखील म्हटलं आहे. न्यूज १८ला दिलेल्या विशेष मुलाखतीत स्मृती इराणी यांनी हे म्हटलं आहे. 

"भाजपाची सत्ता आल्यानंतर तीन लाख शौचालये बांधण्यात आली"

"सध्या प्रियंका गांधी 'लड़की हूं लड़ सकती हूं' अशी मोहीम चालवत आहे, मग त्या भावासोबत येथे का आल्या? त्या एकट्या लढू शकत नाहीत का? जर मुलींबाबत त्या बोलत असतील तर अमेठीत वर्षानुवर्षे महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे का बांधली गेली नाहीत. भाजपाची सत्ता आल्यानंतर तीन लाख शौचालये बांधण्यात आली आहेत. अमेठीच्या ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांकडे राहण्यासाठी घरे नव्हती. मात्र आता प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेंतर्गत अनेक कुटुंबांना घराची भेट मिळाली आहे. गांधी घराण्याने घर किंवा वैद्यकीय महाविद्यालये बांधली नाहीत. माझ्या कार्यकाळात अमेठी येथील रुग्णालयात पहिले सीटी स्कॅन मशीन आणण्यात आले" असं म्हणत इराणी यांनी जोरदार टीका केली आहे.  

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधी