शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भाजपाला धक्का : आसाम सरकारमधून ‘अगप’ बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 05:40 IST

नागरिकत्व विधेयकावरील संसदीय समितीचा अहवाल लोकसभेत

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून आसाम गण परिषदने (अगप) आम्ही आसाममधील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमधून (रालोआ) बाहेर पडत असल्याची घोषणा सोमवारी केली. हे नियोजित विधेयक मागे घ्यावे हे सरकारला पटवून देण्यात अगपने निर्वाणीचे केलेले प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर थेट सरकारमधूनच बाहेर पडण्याचा निर्णय परिषदेने घेतला.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची येथे भेट घेतल्यानंतर परिषदेचे अध्यक्ष अतुल बोरा म्हणाले की, हे विधेयक आसाम कराराच्याविरोधात आहे आणि सध्या सुरू असलेले नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्स (एनआरसी) अद्ययावत करण्याचे काम वाया जाईल हे केंद्र सरकारला पटवून देण्याचा आम्ही प्रयत्न केला. परंतु, राजनाथ सिंह यांनी आम्हाला हे विधेयक उद्या लोकसभेत संमत होईल हे स्पष्टपणे सांगितले आहे. यानंतर आघाडीमध्ये राहण्याचा कोणताच प्रश्न उरला नाही, असे ते म्हणाले. १२६ सदस्यांच्या राज्य विधानसभेत भाजपाचे ६१ आमदार असून बोडोलँड पीपल्स फ्रंटच्या १२ आमदारांचा व एकमेव अपक्ष आमदाराचा आघाडीला पाठिंबा आहे. अगपचे १४ आमदार आहेत. अतुल बोरा यांच्यासह तीन मंत्री आहेत.

आज सभागृहात चर्चानागरिकत्व दुरुस्ती विधेयक २०१६ तयार झाले आहे. त्यावरील संयुक्त संसदीय समितीचा अहवाल लोकसभेत सोमवारी मांडण्यातआला. या विधेयकावर मंगळवारी सभागृहात चर्चा होणे अपेक्षित आहे. धार्मिकतेच्या आधारावर भारतीय नागरिकत्व देणे ही राज्यघटनाविरोधी व चुकीची कृती आहे, असे मत या समितीने बहुमताने व्यक्त केले आहे.काय आहे प्रकरण?च्अफगाणिस्तान, बांगलादेश, पाकिस्तानमधील जे हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चनधर्मीय स्थलांतरित होऊन भारतात आले आहेत आणि त्यांच्या वास्तव्याला सहा वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, अशांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी १९५५ च्या नागरिकत्व कायद्यात दुरुस्ती करण्यात येणार आहे.च्आतापर्यंत हा वास्तव्याचा कालावधी १२ वर्षांचा धरण्यात येतो. तो कमी करून व अशा लोकांकडे पुरेशी कागदपत्रे नसतानाही त्यांना नागरिकत्व बहाल करण्याची तरतूद या विधेयकात आहे. तसे आश्वासन भाजपाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत दिले होते.ईशान्य भारतात आज बंदगुवाहाटी : नागरिकत्व दुरुस्ती विधेयक २०१६ च्या निषेधार्थ ईशान्य भारताच्या सातही राज्यांतील अनेक विद्यार्थी संघटनांनी उद्या, मंगळवारी बंद पुकारला आहे.मिझो झिरलाई पवाल (एमझेडपी), दी आॅल अरुणाचल प्रदेश स्टुडंटस् युनियन (आपसू), नागा स्टुडंटस् फेडरेशन, आॅल आसाम स्टुंडटस् युनियन (आसू) यांनी ११ तासांचा बंद पाळण्याचे ठरविले आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपा