शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
2
Air India Plane Crash in Ahmedabad : पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
3
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
4
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
5
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
6
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
7
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
8
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
9
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
10
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
11
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
12
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
13
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
14
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
15
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
16
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
17
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
18
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
19
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
20
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...

भाजपाला धक्का : आसाम सरकारमधून ‘अगप’ बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 05:40 IST

नागरिकत्व विधेयकावरील संसदीय समितीचा अहवाल लोकसभेत

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून आसाम गण परिषदने (अगप) आम्ही आसाममधील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमधून (रालोआ) बाहेर पडत असल्याची घोषणा सोमवारी केली. हे नियोजित विधेयक मागे घ्यावे हे सरकारला पटवून देण्यात अगपने निर्वाणीचे केलेले प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर थेट सरकारमधूनच बाहेर पडण्याचा निर्णय परिषदेने घेतला.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची येथे भेट घेतल्यानंतर परिषदेचे अध्यक्ष अतुल बोरा म्हणाले की, हे विधेयक आसाम कराराच्याविरोधात आहे आणि सध्या सुरू असलेले नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्स (एनआरसी) अद्ययावत करण्याचे काम वाया जाईल हे केंद्र सरकारला पटवून देण्याचा आम्ही प्रयत्न केला. परंतु, राजनाथ सिंह यांनी आम्हाला हे विधेयक उद्या लोकसभेत संमत होईल हे स्पष्टपणे सांगितले आहे. यानंतर आघाडीमध्ये राहण्याचा कोणताच प्रश्न उरला नाही, असे ते म्हणाले. १२६ सदस्यांच्या राज्य विधानसभेत भाजपाचे ६१ आमदार असून बोडोलँड पीपल्स फ्रंटच्या १२ आमदारांचा व एकमेव अपक्ष आमदाराचा आघाडीला पाठिंबा आहे. अगपचे १४ आमदार आहेत. अतुल बोरा यांच्यासह तीन मंत्री आहेत.

आज सभागृहात चर्चानागरिकत्व दुरुस्ती विधेयक २०१६ तयार झाले आहे. त्यावरील संयुक्त संसदीय समितीचा अहवाल लोकसभेत सोमवारी मांडण्यातआला. या विधेयकावर मंगळवारी सभागृहात चर्चा होणे अपेक्षित आहे. धार्मिकतेच्या आधारावर भारतीय नागरिकत्व देणे ही राज्यघटनाविरोधी व चुकीची कृती आहे, असे मत या समितीने बहुमताने व्यक्त केले आहे.काय आहे प्रकरण?च्अफगाणिस्तान, बांगलादेश, पाकिस्तानमधील जे हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चनधर्मीय स्थलांतरित होऊन भारतात आले आहेत आणि त्यांच्या वास्तव्याला सहा वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, अशांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी १९५५ च्या नागरिकत्व कायद्यात दुरुस्ती करण्यात येणार आहे.च्आतापर्यंत हा वास्तव्याचा कालावधी १२ वर्षांचा धरण्यात येतो. तो कमी करून व अशा लोकांकडे पुरेशी कागदपत्रे नसतानाही त्यांना नागरिकत्व बहाल करण्याची तरतूद या विधेयकात आहे. तसे आश्वासन भाजपाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत दिले होते.ईशान्य भारतात आज बंदगुवाहाटी : नागरिकत्व दुरुस्ती विधेयक २०१६ च्या निषेधार्थ ईशान्य भारताच्या सातही राज्यांतील अनेक विद्यार्थी संघटनांनी उद्या, मंगळवारी बंद पुकारला आहे.मिझो झिरलाई पवाल (एमझेडपी), दी आॅल अरुणाचल प्रदेश स्टुडंटस् युनियन (आपसू), नागा स्टुडंटस् फेडरेशन, आॅल आसाम स्टुंडटस् युनियन (आसू) यांनी ११ तासांचा बंद पाळण्याचे ठरविले आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपा