शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाला धक्का : आसाम सरकारमधून ‘अगप’ बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 05:40 IST

नागरिकत्व विधेयकावरील संसदीय समितीचा अहवाल लोकसभेत

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून आसाम गण परिषदने (अगप) आम्ही आसाममधील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमधून (रालोआ) बाहेर पडत असल्याची घोषणा सोमवारी केली. हे नियोजित विधेयक मागे घ्यावे हे सरकारला पटवून देण्यात अगपने निर्वाणीचे केलेले प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर थेट सरकारमधूनच बाहेर पडण्याचा निर्णय परिषदेने घेतला.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची येथे भेट घेतल्यानंतर परिषदेचे अध्यक्ष अतुल बोरा म्हणाले की, हे विधेयक आसाम कराराच्याविरोधात आहे आणि सध्या सुरू असलेले नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्स (एनआरसी) अद्ययावत करण्याचे काम वाया जाईल हे केंद्र सरकारला पटवून देण्याचा आम्ही प्रयत्न केला. परंतु, राजनाथ सिंह यांनी आम्हाला हे विधेयक उद्या लोकसभेत संमत होईल हे स्पष्टपणे सांगितले आहे. यानंतर आघाडीमध्ये राहण्याचा कोणताच प्रश्न उरला नाही, असे ते म्हणाले. १२६ सदस्यांच्या राज्य विधानसभेत भाजपाचे ६१ आमदार असून बोडोलँड पीपल्स फ्रंटच्या १२ आमदारांचा व एकमेव अपक्ष आमदाराचा आघाडीला पाठिंबा आहे. अगपचे १४ आमदार आहेत. अतुल बोरा यांच्यासह तीन मंत्री आहेत.

आज सभागृहात चर्चानागरिकत्व दुरुस्ती विधेयक २०१६ तयार झाले आहे. त्यावरील संयुक्त संसदीय समितीचा अहवाल लोकसभेत सोमवारी मांडण्यातआला. या विधेयकावर मंगळवारी सभागृहात चर्चा होणे अपेक्षित आहे. धार्मिकतेच्या आधारावर भारतीय नागरिकत्व देणे ही राज्यघटनाविरोधी व चुकीची कृती आहे, असे मत या समितीने बहुमताने व्यक्त केले आहे.काय आहे प्रकरण?च्अफगाणिस्तान, बांगलादेश, पाकिस्तानमधील जे हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चनधर्मीय स्थलांतरित होऊन भारतात आले आहेत आणि त्यांच्या वास्तव्याला सहा वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, अशांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी १९५५ च्या नागरिकत्व कायद्यात दुरुस्ती करण्यात येणार आहे.च्आतापर्यंत हा वास्तव्याचा कालावधी १२ वर्षांचा धरण्यात येतो. तो कमी करून व अशा लोकांकडे पुरेशी कागदपत्रे नसतानाही त्यांना नागरिकत्व बहाल करण्याची तरतूद या विधेयकात आहे. तसे आश्वासन भाजपाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत दिले होते.ईशान्य भारतात आज बंदगुवाहाटी : नागरिकत्व दुरुस्ती विधेयक २०१६ च्या निषेधार्थ ईशान्य भारताच्या सातही राज्यांतील अनेक विद्यार्थी संघटनांनी उद्या, मंगळवारी बंद पुकारला आहे.मिझो झिरलाई पवाल (एमझेडपी), दी आॅल अरुणाचल प्रदेश स्टुडंटस् युनियन (आपसू), नागा स्टुडंटस् फेडरेशन, आॅल आसाम स्टुंडटस् युनियन (आसू) यांनी ११ तासांचा बंद पाळण्याचे ठरविले आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपा