शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
4
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
5
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
6
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
7
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
8
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
9
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
10
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
11
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
12
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
13
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
14
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
15
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
16
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
17
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
18
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
19
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
20
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार

राज्यसभेत बहुमत मिळविण्यासाठी भाजप आतुर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 04:46 IST

राज्यसभेत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी संसदेच्या इतिहासात आजवर कधीही ऐकिवात नव्हती अशी पद्धत शोधून भाजप विरोधी पक्षाच्या राज्यसभा सदस्यांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : राज्यसभेत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी संसदेच्या इतिहासात आजवर कधीही ऐकिवात नव्हती अशी पद्धत शोधून भाजप विरोधी पक्षाच्या राज्यसभा सदस्यांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी प्रयत्न करीत आहे. २४५ सदस्य असलेल्या राज्यसभेत भाजपचे संख्याबळ ७८ आहे. स्वबळावर बहुमत प्राप्त करण्यासाठी भाजपला २०२० पर्यंत वाट पाहावी लागेल; परंतु तोवर महत्त्वाची विधेयके मंजूर करून घेण्यासाठी सबुरीने घेण्यास भाजप तयार नाहीत.तेलगू देसमचे सहापैकी ४ खासदार भाजपत सामील झाले आहेत. समाजवादी पार्टीचे खासदार नीरज शेखर हेही राजीनामा देत भाजपमध्ये दाखल झाले आहेत. भाजप त्यांना पुन्हा उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर आणणार आहे. उत्तर प्रदेशात भाजपचे ३२५ आमदार असल्याने शेखर यांना पुन्हा राज्यसभेवर निवडून आणणे भाजपला सहज शक्य आहे. पुढल्या आठवड्यात निवडणूक आयोग कधीही राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी अधिसूचना जारी करण्याची दाट शक्यता आहे.समाजवादी पार्टी आणि बसपाचे आणखी दोन संसद सदस्य राजीनामा देतील आणि या दोन जागांसाठी स्वतंत्रपणे पोटनिवडणूक घेतली जाईल, असे समजते. दोन्ही खासदार नोव्हेंबर २०२० मध्ये निवृत्त होणार आहेत. राज्यसभेवर पुन्हा निवडून आणण्यासोबत त्यांना २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याचा विचार केला जाईल, असा सांगावा भाजपने त्यांना धाडला आहे.संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची मुदत वाढविली जाऊ शकते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.राज्यसभेतील संख्याबळ याचवर्षी शंभरीपार नेण्याचा भाजपचा मनोदय आहे. मित्रपक्ष, तीन नामनियुक्त सदस्य तसेच समर्थकांमुळे राज्यसभेत भाजपने कामचलाऊ बहुमत मिळविले आहे. बिजू जनता दल (७), वायएसआर काँग्रेस (२), जेडीएसच्या एका सदस्यांच्या पाठिंब्यामुळे भाजपच्या बाजूने १२४ खासदार आहेत.>महाराष्टÑ, आसाम, बिहारकडेही लक्षयाशिवाय उत्तर प्रदेश, आसाम, बिहार आणि महाराष्टÑ आणि अन्य राज्यांतील विरोधी पक्षांच्या काही राज्यसभा सदस्यांचेही मन वळविण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. ते भाजपमध्ये सामील झाल्यानंतर त्यांची पुन्हा राज्यसभेवर वर्णी लावून भाजपला राज्यसभेत महत्त्वाची विधेयके संमत करणे सोपे होईल.