शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
2
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
3
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
4
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
5
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
6
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
7
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
8
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
9
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
10
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
11
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
12
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
13
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
14
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
15
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
16
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
17
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
18
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
19
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
20
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभेत बहुमत मिळविण्यासाठी भाजप आतुर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 04:46 IST

राज्यसभेत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी संसदेच्या इतिहासात आजवर कधीही ऐकिवात नव्हती अशी पद्धत शोधून भाजप विरोधी पक्षाच्या राज्यसभा सदस्यांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : राज्यसभेत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी संसदेच्या इतिहासात आजवर कधीही ऐकिवात नव्हती अशी पद्धत शोधून भाजप विरोधी पक्षाच्या राज्यसभा सदस्यांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी प्रयत्न करीत आहे. २४५ सदस्य असलेल्या राज्यसभेत भाजपचे संख्याबळ ७८ आहे. स्वबळावर बहुमत प्राप्त करण्यासाठी भाजपला २०२० पर्यंत वाट पाहावी लागेल; परंतु तोवर महत्त्वाची विधेयके मंजूर करून घेण्यासाठी सबुरीने घेण्यास भाजप तयार नाहीत.तेलगू देसमचे सहापैकी ४ खासदार भाजपत सामील झाले आहेत. समाजवादी पार्टीचे खासदार नीरज शेखर हेही राजीनामा देत भाजपमध्ये दाखल झाले आहेत. भाजप त्यांना पुन्हा उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर आणणार आहे. उत्तर प्रदेशात भाजपचे ३२५ आमदार असल्याने शेखर यांना पुन्हा राज्यसभेवर निवडून आणणे भाजपला सहज शक्य आहे. पुढल्या आठवड्यात निवडणूक आयोग कधीही राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी अधिसूचना जारी करण्याची दाट शक्यता आहे.समाजवादी पार्टी आणि बसपाचे आणखी दोन संसद सदस्य राजीनामा देतील आणि या दोन जागांसाठी स्वतंत्रपणे पोटनिवडणूक घेतली जाईल, असे समजते. दोन्ही खासदार नोव्हेंबर २०२० मध्ये निवृत्त होणार आहेत. राज्यसभेवर पुन्हा निवडून आणण्यासोबत त्यांना २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याचा विचार केला जाईल, असा सांगावा भाजपने त्यांना धाडला आहे.संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची मुदत वाढविली जाऊ शकते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.राज्यसभेतील संख्याबळ याचवर्षी शंभरीपार नेण्याचा भाजपचा मनोदय आहे. मित्रपक्ष, तीन नामनियुक्त सदस्य तसेच समर्थकांमुळे राज्यसभेत भाजपने कामचलाऊ बहुमत मिळविले आहे. बिजू जनता दल (७), वायएसआर काँग्रेस (२), जेडीएसच्या एका सदस्यांच्या पाठिंब्यामुळे भाजपच्या बाजूने १२४ खासदार आहेत.>महाराष्टÑ, आसाम, बिहारकडेही लक्षयाशिवाय उत्तर प्रदेश, आसाम, बिहार आणि महाराष्टÑ आणि अन्य राज्यांतील विरोधी पक्षांच्या काही राज्यसभा सदस्यांचेही मन वळविण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. ते भाजपमध्ये सामील झाल्यानंतर त्यांची पुन्हा राज्यसभेवर वर्णी लावून भाजपला राज्यसभेत महत्त्वाची विधेयके संमत करणे सोपे होईल.