शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या रणनीतीला छेद देत भाजपने आसाम राखले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 02:05 IST

याउलट भाजपने साम-दाम-दंड-भेद या नीतीचा अवलंब करीत निवडणूक लढवली आणि जिंकली. मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल व ज्येष्ठ मंत्री हेमंत विश्व शर्मा असे दोन प्रमुख चेहरे भाजपकडे असल्याने त्यांनी दोघांचा खुबीने वापर केला.

मिलिंद कुलकर्णीपूर्वोत्तर राज्यात भाजपच्या प्रवेशाचे दार ठरलेल्या आसाममधील यंदाची विधानसभा निवडणूक सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण ठरली. सलग १५ वर्षे काँग्रेसच्या ताब्यात हे राज्य ठेवणारे तरुण गोगोई यांच्या निधनामुळे नेतृत्वहीन असलेल्या काँग्रेसने छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल यांच्या रणनीतीनुसार यशस्वी आघाडी तयार केली. जुन्या चुका दुरुस्त करीत पावले उचलली. अनुकूल वातावरण असताना स्थानिक सक्षम नेता नसल्याची मोठी किंमत काँग्रेसला मोजावी लागली. मात्र गेल्या वेळी मिळालेल्या १९ जागांवरून घेतलेली झेप हे निश्चितच काँग्रेसच्या सामूहिक नेतृत्वाची परिणती आहे.

याउलट भाजपने साम-दाम-दंड-भेद या नीतीचा अवलंब करीत निवडणूक लढवली आणि जिंकली. मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल व ज्येष्ठ मंत्री हेमंत विश्व शर्मा असे दोन प्रमुख चेहरे भाजपकडे असल्याने त्यांनी दोघांचा खुबीने वापर केला. विकास पुरुष, मवाळ नेतृत्व अशी सोनोवाल यांची छवी असल्याने सर्वसामान्य मतदारांना त्यांनी आपलेसे केले. शर्मा हे लोकप्रिय आणि वादग्रस्त विधाने करण्यात पटाईत असे नेते म्हणून परिचित आहेत. मोगल राज, बाबर राज नको, अशी त्यांची विधाने वादग्रस्त ठरली. बांगलादेशातील स्थलांतरित मुस्लिमांविषयी जाणीवपूर्वक केलेल्या विधानाने त्यांनी बंगाली हिंदू मतांचे ध्रुवीकरण साधले. 

पश्चिम बंगालमध्ये सीएए व एनआरसी याविषयी उच्चरवाने बोलणाऱ्या भाजप नेत्यांनी आसाममध्ये याविषयी चकार शब्द काढला नाही. आसाममधील प्रादेशिक रचना व तेथील सामाजिक, आर्थिक, राजकीय व धार्मिक प्रश्नांचे स्वरूप पाहता हा कौल संमिश्र स्वरूपाचा आहे. बराक व्हॅली, अप्पर आसाम, लोअर आसाम व बोडोलँड या चार विभागांमध्ये दोन्ही पक्षांनी अपेक्षेप्रमाणे यश मिळविले आहे.

आसामात भाजपची खेळी यशस्वी 

बआसामची सत्ता हातात येत असली तरी मुख्यमंत्री कोण असेल, याविषयी उत्कंठा कायम आहे. सर्वानंद सोनोवाल यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सत्ता राखली असल्याने त्यांचा दावा प्रबळ आहे. परंतु हेमंत विश्व शर्मा यांची सरकारमधील मंत्री म्हणून कामगिरी आणि विशेषतः कोरोना काळात हाताळलेली परिस्थिती ही त्यांची जमेची बाजू आहे. मुख्यमंत्री होण्याच्या महत्त्वाकांक्षेतून त्यांनी काँग्रेस सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. पाच वर्षे त्यांनी प्रतीक्षा केली. आता मात्र संधी न मिळाल्यास शर्मा वेगळा निर्णय घेऊ शकतात, अशी दाट शक्यता आहे. हा पेच भाजप नेते कसा सोडवितात, हे बघणे रंजक ठरेल. 

टॅग्स :AssamआसामBJPभाजपाElectionनिवडणूक