शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
6
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
7
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
8
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
9
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
10
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
11
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
12
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
13
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
14
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
15
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
16
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
17
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
18
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
19
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
20
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!

काँग्रेसच्या रणनीतीला छेद देत भाजपने आसाम राखले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 02:05 IST

याउलट भाजपने साम-दाम-दंड-भेद या नीतीचा अवलंब करीत निवडणूक लढवली आणि जिंकली. मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल व ज्येष्ठ मंत्री हेमंत विश्व शर्मा असे दोन प्रमुख चेहरे भाजपकडे असल्याने त्यांनी दोघांचा खुबीने वापर केला.

मिलिंद कुलकर्णीपूर्वोत्तर राज्यात भाजपच्या प्रवेशाचे दार ठरलेल्या आसाममधील यंदाची विधानसभा निवडणूक सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण ठरली. सलग १५ वर्षे काँग्रेसच्या ताब्यात हे राज्य ठेवणारे तरुण गोगोई यांच्या निधनामुळे नेतृत्वहीन असलेल्या काँग्रेसने छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल यांच्या रणनीतीनुसार यशस्वी आघाडी तयार केली. जुन्या चुका दुरुस्त करीत पावले उचलली. अनुकूल वातावरण असताना स्थानिक सक्षम नेता नसल्याची मोठी किंमत काँग्रेसला मोजावी लागली. मात्र गेल्या वेळी मिळालेल्या १९ जागांवरून घेतलेली झेप हे निश्चितच काँग्रेसच्या सामूहिक नेतृत्वाची परिणती आहे.

याउलट भाजपने साम-दाम-दंड-भेद या नीतीचा अवलंब करीत निवडणूक लढवली आणि जिंकली. मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल व ज्येष्ठ मंत्री हेमंत विश्व शर्मा असे दोन प्रमुख चेहरे भाजपकडे असल्याने त्यांनी दोघांचा खुबीने वापर केला. विकास पुरुष, मवाळ नेतृत्व अशी सोनोवाल यांची छवी असल्याने सर्वसामान्य मतदारांना त्यांनी आपलेसे केले. शर्मा हे लोकप्रिय आणि वादग्रस्त विधाने करण्यात पटाईत असे नेते म्हणून परिचित आहेत. मोगल राज, बाबर राज नको, अशी त्यांची विधाने वादग्रस्त ठरली. बांगलादेशातील स्थलांतरित मुस्लिमांविषयी जाणीवपूर्वक केलेल्या विधानाने त्यांनी बंगाली हिंदू मतांचे ध्रुवीकरण साधले. 

पश्चिम बंगालमध्ये सीएए व एनआरसी याविषयी उच्चरवाने बोलणाऱ्या भाजप नेत्यांनी आसाममध्ये याविषयी चकार शब्द काढला नाही. आसाममधील प्रादेशिक रचना व तेथील सामाजिक, आर्थिक, राजकीय व धार्मिक प्रश्नांचे स्वरूप पाहता हा कौल संमिश्र स्वरूपाचा आहे. बराक व्हॅली, अप्पर आसाम, लोअर आसाम व बोडोलँड या चार विभागांमध्ये दोन्ही पक्षांनी अपेक्षेप्रमाणे यश मिळविले आहे.

आसामात भाजपची खेळी यशस्वी 

बआसामची सत्ता हातात येत असली तरी मुख्यमंत्री कोण असेल, याविषयी उत्कंठा कायम आहे. सर्वानंद सोनोवाल यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सत्ता राखली असल्याने त्यांचा दावा प्रबळ आहे. परंतु हेमंत विश्व शर्मा यांची सरकारमधील मंत्री म्हणून कामगिरी आणि विशेषतः कोरोना काळात हाताळलेली परिस्थिती ही त्यांची जमेची बाजू आहे. मुख्यमंत्री होण्याच्या महत्त्वाकांक्षेतून त्यांनी काँग्रेस सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. पाच वर्षे त्यांनी प्रतीक्षा केली. आता मात्र संधी न मिळाल्यास शर्मा वेगळा निर्णय घेऊ शकतात, अशी दाट शक्यता आहे. हा पेच भाजप नेते कसा सोडवितात, हे बघणे रंजक ठरेल. 

टॅग्स :AssamआसामBJPभाजपाElectionनिवडणूक