शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

Video: 'त्या' ऐतिहासिक चुकीला पंडित नेहरूच जबाबदार; भाजपाकडून व्हिडीओ केला जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 10:59 IST

काश्मीर प्रकरण स्वत: जवाहरलाल नेहरूंनी हाताळले. काश्मीर प्रकरणी यूएन जाण्याची सर्वात मोठी चूक पंडित जवाहरलाल नेहरूंनी केल्याचा दावा भाजपाने केला आहे.

नवी दिल्ली - भाजपानेकलम 370 हटविण्याला एक महिना पूर्ण झाल्याच्या मुहुर्तावर एक शॉर्ट फिल्म प्रकाशित केली आहे. पक्षाचे कार्याध्यक्ष जे.पी नड्डा यांनी बुधवारी हा लघुपट प्रसिद्ध केला. ज्यात जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविण्याचा निर्णय आणि दोन केंद्रशासित प्रदेशाचं विभाजन याचा उल्लेख केला आहे. 

हा व्हिडीओ पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लाल किल्ल्यावरील भाषणाने सुरू होतो. तर व्हिडीओचा शेवटची मोदींच्या भाषणाने केला जातो. 11 मिनिटाच्या या व्हिडीओत देशातील पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. काश्मीरमधील स्थितीसाठी नेहरूंना दोषी ठरवत त्यांची ऐतिहासिक चूक यासाठी जबाबदार आहे असं सांगितलं जातं. व्हिडीओनुसार त्यावेळी कलम 370 वरुन बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी सरकारच्या निर्णयाचा विरोध केला होता. 

भाजपाचं म्हणणं आहे की, त्याकाळी 562 संस्थांना सरदार वल्लभभाई पटेल यांनी शांततापूर्ण भारतात विलीन केलं होतं. मात्र काश्मीर प्रकरण स्वत: जवाहरलाल नेहरूंनी हाताळले. काश्मीर प्रकरणी यूएन जाण्याची सर्वात मोठी चूक पंडित जवाहरलाल नेहरूंनी केल्याचा दावा भाजपाने केला आहे. तसेच राज्याला विशेष दर्जा देऊन दुसरी चूक केली. या निर्णयाला तत्कालीन काँग्रेस नेत्यांनीही विरोध केला होता. 

व्हिडीओनुसार त्याकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरूंना सांगितले होते की, कलम 370 हा देशाचा विश्वासघात आहे. याचा मसुदा बनविण्यासाठी त्यांनी विरोध केला होता. या शॉर्ट फिल्ममध्ये अमित शहा यांनी संसदेत कलम 370 हटविण्याचा निर्णयाचा उल्लेख करण्यात आला आहे. 

केंद्रातील मोदी सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी ऐतिहासिक निर्णय घेतला. त्याअंतर्गत जम्मू-काश्मीरला लडाखपासून वेगळं करण्यात आलं आहे. लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा बहाल करण्यात आला असून, तिथे विधानसभेची स्थापन करण्यात आलेली नाही. लडाखच्या लोकांनी गेल्या अनेक वर्षांपासून लडाख हा केंद्रशासित प्रदेश व्हावा, अशी मागणी केली होती. 

राज्यसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर ते लोकसभेत मंजुरीसाठी मांडण्यात आले होते. अशा पद्धतीने विधेयक का मांडले गेले याबाबत आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माहिती दिली होती.  लोकसभेत आधी विधेयक मांडले असते तर राज्यसभेत त्यावर मोठा गोंधळ होण्याची भीती होती. त्यामुळे ते आधी राज्यसभेत मांडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अमित शहा यांनी दिली आहे. 

टॅग्स :Jawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूBJPभाजपाAmit Shahअमित शहाJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370