शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

Video: 'त्या' ऐतिहासिक चुकीला पंडित नेहरूच जबाबदार; भाजपाकडून व्हिडीओ केला जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 10:59 IST

काश्मीर प्रकरण स्वत: जवाहरलाल नेहरूंनी हाताळले. काश्मीर प्रकरणी यूएन जाण्याची सर्वात मोठी चूक पंडित जवाहरलाल नेहरूंनी केल्याचा दावा भाजपाने केला आहे.

नवी दिल्ली - भाजपानेकलम 370 हटविण्याला एक महिना पूर्ण झाल्याच्या मुहुर्तावर एक शॉर्ट फिल्म प्रकाशित केली आहे. पक्षाचे कार्याध्यक्ष जे.पी नड्डा यांनी बुधवारी हा लघुपट प्रसिद्ध केला. ज्यात जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविण्याचा निर्णय आणि दोन केंद्रशासित प्रदेशाचं विभाजन याचा उल्लेख केला आहे. 

हा व्हिडीओ पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लाल किल्ल्यावरील भाषणाने सुरू होतो. तर व्हिडीओचा शेवटची मोदींच्या भाषणाने केला जातो. 11 मिनिटाच्या या व्हिडीओत देशातील पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. काश्मीरमधील स्थितीसाठी नेहरूंना दोषी ठरवत त्यांची ऐतिहासिक चूक यासाठी जबाबदार आहे असं सांगितलं जातं. व्हिडीओनुसार त्यावेळी कलम 370 वरुन बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी सरकारच्या निर्णयाचा विरोध केला होता. 

भाजपाचं म्हणणं आहे की, त्याकाळी 562 संस्थांना सरदार वल्लभभाई पटेल यांनी शांततापूर्ण भारतात विलीन केलं होतं. मात्र काश्मीर प्रकरण स्वत: जवाहरलाल नेहरूंनी हाताळले. काश्मीर प्रकरणी यूएन जाण्याची सर्वात मोठी चूक पंडित जवाहरलाल नेहरूंनी केल्याचा दावा भाजपाने केला आहे. तसेच राज्याला विशेष दर्जा देऊन दुसरी चूक केली. या निर्णयाला तत्कालीन काँग्रेस नेत्यांनीही विरोध केला होता. 

व्हिडीओनुसार त्याकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरूंना सांगितले होते की, कलम 370 हा देशाचा विश्वासघात आहे. याचा मसुदा बनविण्यासाठी त्यांनी विरोध केला होता. या शॉर्ट फिल्ममध्ये अमित शहा यांनी संसदेत कलम 370 हटविण्याचा निर्णयाचा उल्लेख करण्यात आला आहे. 

केंद्रातील मोदी सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी ऐतिहासिक निर्णय घेतला. त्याअंतर्गत जम्मू-काश्मीरला लडाखपासून वेगळं करण्यात आलं आहे. लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा बहाल करण्यात आला असून, तिथे विधानसभेची स्थापन करण्यात आलेली नाही. लडाखच्या लोकांनी गेल्या अनेक वर्षांपासून लडाख हा केंद्रशासित प्रदेश व्हावा, अशी मागणी केली होती. 

राज्यसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर ते लोकसभेत मंजुरीसाठी मांडण्यात आले होते. अशा पद्धतीने विधेयक का मांडले गेले याबाबत आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माहिती दिली होती.  लोकसभेत आधी विधेयक मांडले असते तर राज्यसभेत त्यावर मोठा गोंधळ होण्याची भीती होती. त्यामुळे ते आधी राज्यसभेत मांडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अमित शहा यांनी दिली आहे. 

टॅग्स :Jawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूBJPभाजपाAmit Shahअमित शहाJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370