शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

राहुल गांधी यांच्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 15:46 IST

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या गुजरातमधील वक्तव्यावर भाजपकडून आक्षेप.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यानंतर लगेचच विविध राजकीय पक्ष निवडणूक प्रचाराची रणनिती तयार करत आहे. ही रणनिती आखत असतानाच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातेत केलेल्या वक्तव्यावर भाजपकडून आक्षेप घेण्यात आला आहे. तसेच त्या संदर्भात तक्रार देखील देण्यात आली आहे.

केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी निवडणूक आयोगासमोर आपले म्हणणे मांडले. रविशंकर प्रसाद म्हणाले की, बंगालमध्ये होणाऱ्या हिंसक घटनांमुळे अनेक लोक प्रभावित झाले आहेत. यापुढे देखील हिंसक घटना होण्याची शक्यता असून संपूर्ण पश्चिम बंगाल राज्याला अतिसंवेदनशील राज्य घोषित करण्याची मागणी आम्ही निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसेच सर्व मतदान केंद्रांवर केंद्रीय सुरक्षा दल तैनात करावे आणि  बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान माध्यमांना प्रवेश मिळावा, अशी मागणी आपण निवडणूक आयोगाकडे केल्याचे प्रसाद यांनी सांगितले. 

राहुल यांच्याविरुद्ध तक्रार दाखलकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी अहमदाबाद येथील जाहीर सभेत म्हटले होते की, पंतप्रधान नरेंद्री मोदी यांनी राफेल करारातील पैशाने उद्योगपती अनिल अंबानी यांचे खिसे भरले. राहुल यांच्या या वक्तव्याची भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. तसेच याची निवडणूक आयोगाने दखल घ्यावी असंही तक्रारीत म्हटले आहे. 

राहुल गांधी यांचे वक्तव्यराहुल गांधी म्हणाले होते की, 2014 मधील निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी आपल्याला पंतप्रधान नव्हे तर चौकीदार बनवा असे म्हटले होते. हेच मोदी प्रत्येक व्यासपिठावर देशभक्तीविषयी बोलतात. वायुसेनेचे कौतुक करतात. परंतु वायुसेनेचे 30 हजार कोटी रुपये अनिल अंबानींच्या खिशात का घातले, याविषयी मोदी काहीही बोलत नाही.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBJPभाजपाcongressकाँग्रेस