शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

Tripura, Nagaland, Meghalaya's Election Result: निकालापूर्वीच भाजप तयार! त्रिपुरा व मेघालयात रंगू शकते सत्तानाट्य; नेत्यांना पाठविले मोहिमेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 06:06 IST

Tripura, Nagaland, Meghalaya's Election Result:

- संजय शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : त्रिपुरा, नागालँड व मेघालय या तीन राज्यांत सरकार स्थापन करण्यासाठी भाजपने युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. त्यातील त्रिपुरा व मेघालयात तोडफोडीची शक्यता दिसते. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा, केंद्रीय मंत्री किरण रिजीजू, माजी मुख्यमंत्री विप्लव देव, ईशान्येकडील राज्यांचे समन्वयक संबित पात्रा यांच्यासह सहा नेत्यांना निवडणूक निकालापूर्वी तीन राज्यांत तैनात केले आहे.

तिन्ही राज्यांतील निवडणूक निकालांपूर्वीच दिल्लीतील भाजप मुख्यालयात जल्लोषाची तयारी केली जात आहे. उद्या होळी खेळली जाणार आहे, असे म्हटले जात आहे कारण भाजप दोन राज्यांत पुन्हा सरकार स्थापन करणार आहे. निवडणूक निकालांपूर्वीच एक्झिट पोलने त्रिपुरा व नागालँडमध्ये भाजप स्पष्ट बहुमताने सरकार स्थापन करणार असल्याचे भाकीत वर्तविले आहे. तर मेघालयात त्रिशंकू सरकार स्थापन करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

त्रिपुरात भाजपचे सरकार आल्यास तेथे प्रथमच महिला मुख्यमंत्री होऊ शकते. प्रतिमा भौमिक यांना निवडणूक लढविण्यासाठी पाठवले, तेव्हाच याबाबतची शक्यता व्यक्त केली जात होती. 

आसाम  भाजपसाठी तोडफोड करण्यातील अग्रणी हेमंत बिस्वा सरमा यांनी पूर्ण तयारीनिशी अगरतळामध्ये ठाण मांडले आहे. भाजप नेते संबित पात्रा व माजी मुख्यमंत्री विप्लव देव हे त्रिपुरामध्ये यासाठीच गेले आहेत. त्रिपुरामध्ये सलग दुसऱ्यांदा भाजपने सरकार स्थापन करणे, ही ऐतिहासिक घटना होईल. अशाच प्रकारे नागालँडमध्ये भाजपचे सरकार स्पष्ट बहुमताने स्थापन होणे निश्चित मानले जाते. 

मेघालयत्रिशंकू निकालांची शक्यता व्यक्त केली जात आहे. येथे भाजपच्या तोडफोडीचा कस लागणार आहे. येथे कशा प्रकारे सरकार स्थापन होऊ शकते किंवा राष्ट्रपती राजवट लावून भाजप मागील दाराने सरकार चालवतो, हे येणारा काळच ठरवेल. केंद्रीय मंत्री किरण रिजीजू व भाजप नेते ऋतुराज सिन्हा आधीपासूनच मेघालयात ठाण मांडून आहेत. तृणमूल उमेदवारांवर भाजपची नजर राहील.

त्रिपुराएक्झिट पोलबरोबरच भाजपचा अंदाज आहे की, त्रिपुरात भाजप बहुमताच्या ६० पैकी ३० या जादुई आकड्याच्या आसपास असेल. दोन-चार जागा कमी-जास्त मिळू शकतात. बहुमताला जागा कमी पडण्याच्या स्थितीत भाजप त्रिपुरात तीपरा मोथासमवेत युती करू शकतो, तसेच काही अपक्षांना आपलेसे करू शकतो. या सर्व हालचाली निवडणूक निकालानंतरच होऊ शकतात.

निधी जमविण्यात भाजप देशात आघाडीवरn २०२१-२२ या आर्थिक वर्षात देशात आठ राष्ट्रीय पक्षांचे ३२८९.३४ कोटी रुपयांचे उत्पन्न होते. त्यांतील निम्म्याहून अधिक रक्कम एकट्या भाजपला मिळाली, असे असोसिशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या स्वयंसेवी संस्थेने सांगितले.n भाजपने २०२१-२२ या आर्थिक वर्षात १९१७.१२ कोटी रुपयांचे उत्पन्न जाहीर केले व त्यातील ८५४.४६७ कोटी रुपये खर्च केले. भाजपनंतर सर्वाधिक ५४५.७४५ कोटी रुपयांची रक्कम तृणमूल काँग्रेसला मिळाली आहे. n २०२१-२२मध्ये काँग्रेसचे एकूण उत्पन्न ५४१.२७५ कोटी रुपये होते. त्यातील ७३.९८ टक्के पैसे खर्च करण्यात आले. 

टॅग्स :Tripuraत्रिपुराAssamआसामElectionनिवडणूकBJPभाजपा