शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

यूपीत हिंसक आंदोलन घडवण्यासाठी प्रियंका गांधींकडून होतेय आर्थिक मदत; भाजपाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2020 7:09 PM

त्याचसोबत शेजारील राष्ट्रातील अल्पसंख्याकांचं जगणं कठीण झालं होतं.

बरेली - उत्तर प्रदेशात सुरु असणाऱ्या हिंसक कृत्यासाठी भाजपा नेते स्वतंत्रदेव सिंह यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना जबाबदार धरलं आहे. दुसऱ्या राज्यातील गुंड आणून युपीमध्ये दंगल घडविण्याचा आरोप भाजपानेकाँग्रेसवर केला आहे. त्याचसोबत युपीत कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी प्रियंका गांधींकडून आर्थिक मदतही पुरवली जातेय असंही त्यांनी सांगितले. 

बरेलीमधील एका सभेत बोलताना भाजपा नेते स्वतंत्रदेव सिंह म्हणाले की, उत्तर प्रदेशात मागील तीन वर्ष शांतता होती मग आता हिंसा का घडवताय? असा सवाल त्यांनी प्रियंका गांधी यांना केला आहे. त्या राजस्थान, मध्यप्रदेश याठिकाणी हिंसा का नाही करत? हिंसक कृत्यासाठी आर्थिक मदतही केली जाते. दुसऱ्या राज्यातून समाज कंटकांना आणलं जात आहे. शांतता भंग करण्यासाठी दगडफेकीचे प्रकार सुरु आहेत. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांग्लादेशात अल्पसंख्याकांवर अत्याचार होत असताना नेहरुंनी काय केलं न मनमोहन सिंग काय करु शकले असा आरोप त्यांनी केला. 

त्याचसोबत शेजारील राष्ट्रातील अल्पसंख्याकांचं जगणं कठीण झालं होतं. पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेत्याने ऐतिहासिक असा निर्णय घेऊन सीएए कायदा आणला. नागरिकत्व सुधारणा कायदा हा भारताबाहेरील अल्पसंख्याक समुदायातीय शरणार्थींना भारताचं नागरिकत्व देऊन सन्मानाने जगण्याचा अधिकार देणारं आहे. त्यांना पंतप्रधान आवास योजना आणि अन्य सरकारी योजनांचा लाभ घेता यावा यासाठी आहे असं भाजपा नेते स्वतंत्रदेव सिंह यांनी सांगितले. 

दरम्यान, विरोधी पक्षाकडून सीएए कायद्याबाबत चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. भारतीय मुस्लिमांची नागरिकता जाणार ही अफवा आहे. समाजवादी पक्षाचे राम मनोहर लोहिया यांनीही सांगितले होते पाकिस्तानातील अल्पसंख्याकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत असून त्यांना भारताची नागरिकत्व द्यायला हवं असं सांगितले. पण समाजवादी पक्षाला संस्थापकांचे शब्द आठवत नाहीत. त्यांच्या नेत्यांना फक्त घराणेशाहीचं राजकारण करायचा आहे असा आरोप भाजपा नेते स्वतंत्रदेव सिंह यांनी माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर केला.  

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसPriyanka Gandhiप्रियंका गांधी