शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

यूपीत हिंसक आंदोलन घडवण्यासाठी प्रियंका गांधींकडून होतेय आर्थिक मदत; भाजपाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 19:11 IST

त्याचसोबत शेजारील राष्ट्रातील अल्पसंख्याकांचं जगणं कठीण झालं होतं.

बरेली - उत्तर प्रदेशात सुरु असणाऱ्या हिंसक कृत्यासाठी भाजपा नेते स्वतंत्रदेव सिंह यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना जबाबदार धरलं आहे. दुसऱ्या राज्यातील गुंड आणून युपीमध्ये दंगल घडविण्याचा आरोप भाजपानेकाँग्रेसवर केला आहे. त्याचसोबत युपीत कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी प्रियंका गांधींकडून आर्थिक मदतही पुरवली जातेय असंही त्यांनी सांगितले. 

बरेलीमधील एका सभेत बोलताना भाजपा नेते स्वतंत्रदेव सिंह म्हणाले की, उत्तर प्रदेशात मागील तीन वर्ष शांतता होती मग आता हिंसा का घडवताय? असा सवाल त्यांनी प्रियंका गांधी यांना केला आहे. त्या राजस्थान, मध्यप्रदेश याठिकाणी हिंसा का नाही करत? हिंसक कृत्यासाठी आर्थिक मदतही केली जाते. दुसऱ्या राज्यातून समाज कंटकांना आणलं जात आहे. शांतता भंग करण्यासाठी दगडफेकीचे प्रकार सुरु आहेत. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांग्लादेशात अल्पसंख्याकांवर अत्याचार होत असताना नेहरुंनी काय केलं न मनमोहन सिंग काय करु शकले असा आरोप त्यांनी केला. 

त्याचसोबत शेजारील राष्ट्रातील अल्पसंख्याकांचं जगणं कठीण झालं होतं. पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेत्याने ऐतिहासिक असा निर्णय घेऊन सीएए कायदा आणला. नागरिकत्व सुधारणा कायदा हा भारताबाहेरील अल्पसंख्याक समुदायातीय शरणार्थींना भारताचं नागरिकत्व देऊन सन्मानाने जगण्याचा अधिकार देणारं आहे. त्यांना पंतप्रधान आवास योजना आणि अन्य सरकारी योजनांचा लाभ घेता यावा यासाठी आहे असं भाजपा नेते स्वतंत्रदेव सिंह यांनी सांगितले. 

दरम्यान, विरोधी पक्षाकडून सीएए कायद्याबाबत चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. भारतीय मुस्लिमांची नागरिकता जाणार ही अफवा आहे. समाजवादी पक्षाचे राम मनोहर लोहिया यांनीही सांगितले होते पाकिस्तानातील अल्पसंख्याकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत असून त्यांना भारताची नागरिकत्व द्यायला हवं असं सांगितले. पण समाजवादी पक्षाला संस्थापकांचे शब्द आठवत नाहीत. त्यांच्या नेत्यांना फक्त घराणेशाहीचं राजकारण करायचा आहे असा आरोप भाजपा नेते स्वतंत्रदेव सिंह यांनी माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर केला.  

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसPriyanka Gandhiप्रियंका गांधी