शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

यूपीत हिंसक आंदोलन घडवण्यासाठी प्रियंका गांधींकडून होतेय आर्थिक मदत; भाजपाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 19:11 IST

त्याचसोबत शेजारील राष्ट्रातील अल्पसंख्याकांचं जगणं कठीण झालं होतं.

बरेली - उत्तर प्रदेशात सुरु असणाऱ्या हिंसक कृत्यासाठी भाजपा नेते स्वतंत्रदेव सिंह यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना जबाबदार धरलं आहे. दुसऱ्या राज्यातील गुंड आणून युपीमध्ये दंगल घडविण्याचा आरोप भाजपानेकाँग्रेसवर केला आहे. त्याचसोबत युपीत कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी प्रियंका गांधींकडून आर्थिक मदतही पुरवली जातेय असंही त्यांनी सांगितले. 

बरेलीमधील एका सभेत बोलताना भाजपा नेते स्वतंत्रदेव सिंह म्हणाले की, उत्तर प्रदेशात मागील तीन वर्ष शांतता होती मग आता हिंसा का घडवताय? असा सवाल त्यांनी प्रियंका गांधी यांना केला आहे. त्या राजस्थान, मध्यप्रदेश याठिकाणी हिंसा का नाही करत? हिंसक कृत्यासाठी आर्थिक मदतही केली जाते. दुसऱ्या राज्यातून समाज कंटकांना आणलं जात आहे. शांतता भंग करण्यासाठी दगडफेकीचे प्रकार सुरु आहेत. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांग्लादेशात अल्पसंख्याकांवर अत्याचार होत असताना नेहरुंनी काय केलं न मनमोहन सिंग काय करु शकले असा आरोप त्यांनी केला. 

त्याचसोबत शेजारील राष्ट्रातील अल्पसंख्याकांचं जगणं कठीण झालं होतं. पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेत्याने ऐतिहासिक असा निर्णय घेऊन सीएए कायदा आणला. नागरिकत्व सुधारणा कायदा हा भारताबाहेरील अल्पसंख्याक समुदायातीय शरणार्थींना भारताचं नागरिकत्व देऊन सन्मानाने जगण्याचा अधिकार देणारं आहे. त्यांना पंतप्रधान आवास योजना आणि अन्य सरकारी योजनांचा लाभ घेता यावा यासाठी आहे असं भाजपा नेते स्वतंत्रदेव सिंह यांनी सांगितले. 

दरम्यान, विरोधी पक्षाकडून सीएए कायद्याबाबत चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. भारतीय मुस्लिमांची नागरिकता जाणार ही अफवा आहे. समाजवादी पक्षाचे राम मनोहर लोहिया यांनीही सांगितले होते पाकिस्तानातील अल्पसंख्याकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत असून त्यांना भारताची नागरिकत्व द्यायला हवं असं सांगितले. पण समाजवादी पक्षाला संस्थापकांचे शब्द आठवत नाहीत. त्यांच्या नेत्यांना फक्त घराणेशाहीचं राजकारण करायचा आहे असा आरोप भाजपा नेते स्वतंत्रदेव सिंह यांनी माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर केला.  

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसPriyanka Gandhiप्रियंका गांधी