शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

भाजपा स्थापना दिवस : पक्ष कार्यकर्त्यांनी आज एक वेळच्या जेवणाचा त्याग करावा, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 13:48 IST

'कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या जागतीक संकटाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने देशाचे नेतृत्व करत आहेत, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. यासंकटातून बाहेर पडण्यासाठी संपूर्ण जग मोदींकडे मोठ्या आशेने पाहत आहे,” असेही नड्डा म्हणाले.

ठळक मुद्देभारतीय जनता पक्ष आज आपला 40वा स्थापना दिवस साजरा करता आहेपक्षाच्या 40व्या स्थापना दिना निमित्त सर्व कार्यकर्त्यांनी 40 जणांची संपर्क साधावानाड्डा यांनी मानले पोलीस कर्मचारी, डॉक्टर, सफाई कर्मचारी, बँक आणि पोस्ट ऑफिसच्या कर्मचाऱ्यांचे आभार

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्ष आज आपला 40वा स्थापना दिवस साजरा करता आहे. या निमित्ताने पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांनी कार्यकर्त्यांना काही सूचनाही दिल्या आहेत. तसेच 'पक्ष कार्यकर्त्यांनी आजच्या दिवस एक वेळच्या जेवणाचा त्याग करावा आणि लॉकडाऊनच्या काळात ज्यांना कष्ट सोसावे लागले त्यांच्या प्रति सहानुभूती व्यक्त करावी,' असे आवाहन केले आहे. 

'कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या जागतीक संकटाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने देशाचे नेतृत्व करत आहेत, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. यासंकटातून बाहेर पडण्यासाठी संपूर्ण जग मोदींकडे मोठ्या आशेने पाहत आहे,” असेही नड्डा म्हणाले.

पक्षाच्या 40व्या स्थापना दिना निमित्त सर्व कार्यकर्त्यांनी 40 जणांची भेट घ्यावी आणि त्यांना पीएम केयर्स फंडात 100 रुपये दान करण्याचे आवाहन करावे, असेही नड्डा यांनी कार्यकर्त्यांना सागितले. यावेळी नड्डा यांनी कोरोनासारख्या कठीन परिस्थितीतही आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचारी, डॉक्टर, सफाई कर्मचारी, बँक आणि पोस्ट ऑफिसचे कर्मचारी आदिंचेही आभार मानले. 

जे लोक क्वारंटीनमध्ये आहेत त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधून त्यांची हिम्मत वाढवायची आहे. तेसच पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही यशस्वीपणे पक्षाची वाटपाच करू, असेही नड्डा म्हणाले.  यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करत, “संपूर्ण भारत देश कोरोना संकटाचा सामना करत असातानाच आज आपल्या पक्षाचा 40 वा स्थापनादिवस आहे. मी भाजपा कार्यकर्त्यांना आवाहन करतो, की त्यांनी पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. तसेच गरजूंची मदत करवी आणि सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करा, चला भारत कोरोनामुक्त करूया,' असे म्हटले आहे.

जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी 6 एप्रिल 1980 रोजी भारतीय जनता पक्षाची स्थापना केली. यानंतर हा पक्ष आणीबाणीनंतर 1977ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत इंदिरागांधींच्या विरोधात मैदानात उतरला होता.

टॅग्स :BJPभाजपाcorona virusकोरोना वायरस बातम्याIndira Gandhiइंदिरा गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस