शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Video : संतापजनक! जनसभेसाठी भाजपा नेत्याने रोखला रुग्णवाहिकेचा रस्ता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 08:13 IST

जनसभेसाठी एका भाजपा नेत्याने रुग्णवाहिकेचा रस्ता रोखल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ठळक मुद्देभाजपाचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी पक्षाच्या एका रॅली दरम्यान रुग्णवाहिकेचा रस्ता रोखला.नदियामध्ये एका जनसभेचे आयोजन करण्यात आले होते. रुग्णवाहिकेचा रस्ता रोखला आणि दुसऱ्या रस्त्याने रुग्णवाहिका वळवण्यास सांगितली

कोलकाता - सण, समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम किंवा एखादं आंदोलन अथवा मोर्चा असला तरी रुग्णवाहिकेला तातडीने रस्ता दिला जातो. गर्दीमध्ये अडकलेल्या रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून दिल्याच्या अनेक घटना या समोर आल्या आहेत. मात्र पश्चिम बंगालमध्ये रुग्णवाहिकेचा रस्ता रोखल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. जनसभेसाठी एका भाजपा नेत्याने रुग्णवाहिकेचा रस्ता रोखल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाचेपश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी पक्षाच्या एका रॅली दरम्यान रुग्णवाहिकेचा रस्ता रोखला. नदियामध्ये एका जनसभेचे आयोजन करण्यात आले होते. जनसभेला लोकांची प्रचंड गर्दी होती. त्याचदरम्यान एक रुग्णवाहिका तेथून जात होती. मात्र जनसभेसाठी दिलीप घोष यांनी रुग्णवाहिकेचा रस्ता रोखला आणि दुसऱ्या रस्त्याने रुग्णवाहिका वळवण्यास सांगितली. पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्यामध्ये ही घटना आहे. या संपूर्ण प्रकारानंतर घोष यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. 

दिलीप घोष यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर काही आरोप केले आहे. जनसभेत व्ययय आणण्याच्या उद्देशाने ममता बॅनर्जी सरकारने रुग्णवाहिका पाठवल्याचा आरोप घोष यांनी केला आहे. तसेच रुग्णवाहिका रिकामी असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. दिलीप घोष यांनी काही महिन्यांपूर्वी अजब विधान केलं होतं. 'सुशिक्षित असलेले जे लोक रस्त्यावर गोमांस खातात त्यांनी श्वानाचे मांस खावे. ते आरोग्यासाठी चांगलं असतं' असं दिलीप घोष यांनी म्हटलं होतं. बर्दवानमध्ये गोप अष्टमीच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात घोष यांनी हे अजब विधान केलं होतं. 

भाजपाच्या दिलीप घोष यांनी फक्त श्वानच नाही तर आणखी प्राणी आहेत त्यांचं देखील मांस खा. तुम्हाला कोणी अडवलं आहे? मात्र तुम्ही घरी भोजन करा असं म्हटलं होतं. तसेच 'गाय आपली माता आहे आणि गायीला मारणं असामाजिक आहे. समाजात असे अनेक लोक आहेत जे घरामध्ये विदेशी श्वान पाळतात. तसेच त्यांचे मलमूत्र देखील साफ करतात. मात्र हा मोठा अपराध आहे' असं घोष यांनी म्हटलं होतं. तसेच 'भारत हे भगवान कृष्णाचे स्थान आहे आणि येथे गायींप्रति नेहमीच सन्मान आणि आदर असतो. गायीच्या दूध पिऊन मुलं जगतात. गाय आपली आई आहे. त्यामुळे हिला कोणी मारलं तर आम्ही ते अजिबात सहन करणार नाही' असं देखील बर्दवानमधील कार्यक्रमात घोष यांनी म्हटलं होतं. गायीच्या दुधामध्ये सोनं असतं. त्यामुळेच ते सोनेरी दिसत असल्याचा दावा ही त्यांनी केला होता. तसेच देशी गायी आणि विदेशी गायींची त्यांनी तुलना केली आहे. 'विदेशी गाय नाही तर फक्त देशी गाय आपली आई आहे. ज्या लोकांची पत्नी विदेशी आहे. ते आता कठिण परिस्थितीत आहेत' असं दिलीप घोष यांनी म्हटलं होतं. 

महत्त्वाच्या बातम्या

VIDEO: इराणकडून अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले; कमांडर सुलेमानींच्या हत्येचा बदला

आजच्या ‘भारत बंद’मधून रेल्वे, अत्यावश्यक सेवा वगळल्या

JNU Attack : दीपिकाचे जेएनयू प्रेमानं सरकार चकित, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला दिला पाठिंबा

सुलेमानी यांच्या अंत्ययात्रेत चेंगराचेंगरी; ५६ मृत्युमुखी

टॅग्स :BJPभाजपाwest bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जी