शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

'केजरीवाल, उद्धव ठाकरे, शरद पवार अन्...', या नेत्यांना अटक होणार; राघव चड्ढांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 17:52 IST

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आल्यामुळे आप नेते आक्रमक झाले आहेत.

नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED) चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. यामुळे आम आदमी पार्टी भाजपवर सातत्याने टीका करत आहे. अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकून भाजप दिल्लीच्या 7 जागा आपल्या खिशात घालण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका आप नेते आणि खासदार राघव चढ्ढा यांनी केली आहे.

'या नेत्यांना अटक होणार...'

माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, अरविंद केजरीवालांना समन्स आले, आता पुढची बारी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची असेल. हेमंत सोरेन यांच्यानंतर राजदचे तेजस्वी यादव यांना बिहारमध्ये अटक केली जाईल. हे इथेच थांबणार नाही, यानंतर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांनाही अटक होईल. त्यानंतर सीएम पिनराई विजयन, तामिळनाडूमध्ये सीएम स्टॅलिन, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांनाही अटक केली जाईल. 

प्रत्येक राज्यांतील प्रमुख नेत्यांना अटक करून भाजपला लोकसभेच्या जागा जिंकायच्या आहेत. राजकीय पक्ष आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांना अशा प्रकारे अटक केल्यास लोकशाहीचा पायाच डळमळीत होईल. भाजपला पराभवाची भीती आहे, त्यामुळे त्यांना एकट्यानेच शर्यतीत उतरायचे आहे. विरोधी आघाडीच्या प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकून भाजपला जागा जिंकायच्या आहेत, अशी टीकाही चड्ढा यांनी यावेळी केली. 

'भाजपला पराभवाची भीती'

राघव चढ्ढा पुढे म्हणतात, इंडिया आघाडीचा उमेदवार निवडणूक लढला तर भाजपच्या जागा कमी होतील. यामुळे भाजपला पराभवाची भीती वाटू लागली आहे. एखादा नेता तुरुंगात असेल तर तो निवडणूक लढवू शकणार नाही, त्यामुळे भाजप विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकण्याचे प्रयत्न करत आहे. या योजनेअंतर्गत भाजप केजरीवाल यांना अटक करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपचे पुढील लक्ष 14 लोकसभा जागा असलेल्या झारखंडवर आहे. या सर्व जागांवर भाजपची अवस्था वाईट आहे, त्यामुळेच ते हेमंत सोरेन यांना अटक करू शकतात.

95% विरोधी नेत्यांवर गुन्हे दाखल2014 पासून केंद्रीय एजन्सींनी नोंदवलेल्या 95% केसेस विरोधी नेत्यांच्या विरोधात आहेत. गेल्या काही वर्षांत विरोधी पक्षनेत्यांवर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. निवडणुकीपूर्वी भाजप त्यांची पिळवणूक करते. या नेत्यांनी शरणागती पत्करली नाही तर निवडणुकीच्या आसपास त्यांना अटक केली जाते. या देशात एक पक्ष आणि एकच नेता ठेवणे, हेच भाजपचे उद्दिष्ट आहे. अशाने देशाची लोकशाही धोक्यात येईल, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय