शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

'केजरीवाल, उद्धव ठाकरे, शरद पवार अन्...', या नेत्यांना अटक होणार; राघव चड्ढांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 17:52 IST

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आल्यामुळे आप नेते आक्रमक झाले आहेत.

नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED) चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. यामुळे आम आदमी पार्टी भाजपवर सातत्याने टीका करत आहे. अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकून भाजप दिल्लीच्या 7 जागा आपल्या खिशात घालण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका आप नेते आणि खासदार राघव चढ्ढा यांनी केली आहे.

'या नेत्यांना अटक होणार...'

माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, अरविंद केजरीवालांना समन्स आले, आता पुढची बारी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची असेल. हेमंत सोरेन यांच्यानंतर राजदचे तेजस्वी यादव यांना बिहारमध्ये अटक केली जाईल. हे इथेच थांबणार नाही, यानंतर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांनाही अटक होईल. त्यानंतर सीएम पिनराई विजयन, तामिळनाडूमध्ये सीएम स्टॅलिन, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांनाही अटक केली जाईल. 

प्रत्येक राज्यांतील प्रमुख नेत्यांना अटक करून भाजपला लोकसभेच्या जागा जिंकायच्या आहेत. राजकीय पक्ष आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांना अशा प्रकारे अटक केल्यास लोकशाहीचा पायाच डळमळीत होईल. भाजपला पराभवाची भीती आहे, त्यामुळे त्यांना एकट्यानेच शर्यतीत उतरायचे आहे. विरोधी आघाडीच्या प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकून भाजपला जागा जिंकायच्या आहेत, अशी टीकाही चड्ढा यांनी यावेळी केली. 

'भाजपला पराभवाची भीती'

राघव चढ्ढा पुढे म्हणतात, इंडिया आघाडीचा उमेदवार निवडणूक लढला तर भाजपच्या जागा कमी होतील. यामुळे भाजपला पराभवाची भीती वाटू लागली आहे. एखादा नेता तुरुंगात असेल तर तो निवडणूक लढवू शकणार नाही, त्यामुळे भाजप विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकण्याचे प्रयत्न करत आहे. या योजनेअंतर्गत भाजप केजरीवाल यांना अटक करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपचे पुढील लक्ष 14 लोकसभा जागा असलेल्या झारखंडवर आहे. या सर्व जागांवर भाजपची अवस्था वाईट आहे, त्यामुळेच ते हेमंत सोरेन यांना अटक करू शकतात.

95% विरोधी नेत्यांवर गुन्हे दाखल2014 पासून केंद्रीय एजन्सींनी नोंदवलेल्या 95% केसेस विरोधी नेत्यांच्या विरोधात आहेत. गेल्या काही वर्षांत विरोधी पक्षनेत्यांवर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. निवडणुकीपूर्वी भाजप त्यांची पिळवणूक करते. या नेत्यांनी शरणागती पत्करली नाही तर निवडणुकीच्या आसपास त्यांना अटक केली जाते. या देशात एक पक्ष आणि एकच नेता ठेवणे, हेच भाजपचे उद्दिष्ट आहे. अशाने देशाची लोकशाही धोक्यात येईल, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय