शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

"गोमूत्र हाय अँटिबायोटिक, ते प्यायल्यास सर्व संसर्गजन्य रोग बरे होतात"; भाजपा खासदाराचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 14:31 IST

BJP Pragya Singh Thakur tell that gomutra is high antibiotic : भाजपा नेत्या आणि भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी एक नवा दावा केला आहे. गोमूत्र हे हाय अँटिबायोटिक असल्याचं ठाकूर यांनी म्हटलं आहे. 

नवी दिल्ली - देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. रुग्णांची संख्या तब्बल तीन कोटींवर पोहोचली आहे तर लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारांकडून विविध उपाययोजना आखल्या जात आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत आढळून येणाऱ्या कोरोना रुग्यांच्या संख्येत प्रचंड मोठी वाढ झाली आहे. याच दरम्यान भाजपा नेत्या आणि भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर (BJP Pragya Singh Thakur) यांनी एक नवा दावा केला आहे. गोमूत्र हे हाय अँटिबायोटिक असल्याचं ठाकूर यांनी म्हटलं आहे. 

भोपाळमध्ये एका कार्यक्रमादरम्यान प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी अजब विधान केलं असून ते सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. "मी कोरोनापासून वाचले कारण मी दररोज गोमूत्राचं सेवन करते" असं देखील याआधी ठाकूर यांनी म्हटलं आहे. मात्र आता "आम्ही गोमूत्र पवित्र मानतो. तर अनेक संशोधक असंही म्हणतात की गोमूत्र हाय अँटिबायोटिक आहे. संशोधनातील दाव्यांनंतर आम्हाला आढळलं की गोमूत्र प्यायल्यास सर्व संसर्गजन्य रोग बरे होतात" असा दावाच प्रज्ञा सिंह ठाकूर केला आहे. ठाकूर यांच्या या नव्या विधानावरून अनेकांनी जोरदार निशाणा साधला आहे. 

"मी कोरोनापासून वाचले कारण मी दररोज गोमूत्राचं सेवन करते" 

ठाकूर यांनी गोमूत्राचे फायदे सांगण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. देशातील कोरोना दुसऱ्या लाटेच्या कालावधीदरम्यान त्यांनी असच एक अजब विधान केलं होतं. मी कोरोनापासून वाचले. कारण मी दररोज गोमूत्राचं सेवन करते असं म्हटलं होतं. एका कार्यक्रमादरम्यान ठाकूर यांनी "गोमूत्र प्यायल्याने फुफ्फुसाचा संसर्ग बरा होतो. मी स्वतः दररोज गोमूत्राचा अर्क घेते. म्हणूनच मला करोनाचा संसर्ग झाला नाही" असं सांगितलं होतं. तसेच कोरोना बरा होण्यासाठी हनुमान चालीसा म्हणण्याचा उपाय सुचविला होता. हनुमान चालीसा म्हणा, कोरोना बरा होईल असा देखील सल्ला दिला होता. 

"या आपण सर्वांनी मिळून कोरोना महामारी संपवण्यासाठी आणि लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी एक आध्यात्मिक प्रयत्न करूया. 25 जुलैपासून ते 5 ऑगस्ट दरम्यान दररोज सायंकाळी 7 वाजता आपापल्या घरात हनुमान चालिसेचे पठण करावे. 5 ऑगस्टला रामलल्लाची आरती झाल्यानंतर आपापल्या घरात दिवा लावून याचा समारोप करावा" असं ट्विट प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 3,29,45,907 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 42,618 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 330 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,40,225 लोकांना जीव गमवावा लागला आहे. 

टॅग्स :Sadhvi Pragya Singh Thakurप्रज्ञा सिंह ठाकूरbhopal-pcभोपाळBJPभाजपाcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत