शहरं
Join us  
Trending Stories
1
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
2
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
3
संकष्ट चतुर्थी 2025 : असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
4
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
5
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
6
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
7
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
8
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
9
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
10
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
11
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
12
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
13
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
14
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
15
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
16
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
17
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
18
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
19
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
20
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम

ईशान्य भारत काँग्रेसमुक्त करण्याचा भाजपाचा मनसुबा, अमित शहा आज ठरवणार स्ट्रॅटेजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 14:35 IST

ईशान्य भारतातील आठ पैकी पाच राज्यांमध्ये भाजपाप्रणीत रालोआची सत्ता असून अन्य राज्यांमधूनही काँग्रेसचे उच्चाटन करण्याचा भाजपानं चंग बांधला आहे. या राज्यांमधल्या स्थानिक सहकारी पक्षांशी भाजपा अध्यक्ष आज चर्चा करणार असून काँग्रेसमुक्त ईशान्य भारताच्या दिशेने मोर्चेबांधणी करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

ठळक मुद्देभाजपा व त्यांचे सहकारी पक्ष आसाम, अरूणाचल प्रदेश, नागालँड, मणीपूर व सिक्कीममध्ये सत्तेत आहेत.मेघालय, मिझोराम या राज्यात काँग्रेस व त्रिपुरात या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची सत्ता आहे.मेघालय व त्रिपुरा या दोन राज्यांमध्ये फेब्रुवारी 2018 मध्ये तर मिझोराममध्ये याच वर्षी नोव्हेंबरमध्ये निवडणुका

नवी दिल्ली, दि. 5 - ईशान्य भारतातील आठ पैकी पाच राज्यांमध्ये भाजपाप्रणीत रालोआची सत्ता असून अन्य राज्यांमधूनही काँग्रेसचे उच्चाटन करण्याचा भाजपानं चंग बांधला आहे. या राज्यांमधल्या स्थानिक सहकारी पक्षांशी भाजपा अध्यक्ष आज चर्चा करणार असून काँग्रेसमुक्त ईशान्य भारताच्या दिशेने मोर्चेबांधणी करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

नवी दिल्लीमध्ये आज अमित शाह, ईशान्य भारतातील पाच मुख्यमंत्री, तीन माजी मुख्यमंत्री आणि नॉर्थ ईस्ट डेमोक्रॅटिक अलायन्स (नेडा)च्या अन्य सहकारी पक्षांची पूर्ण दिवसभराची बैठक आहे. सुरक्षित सीमा, राष्ट्रीय एकात्मता, एकात्मिक विकास हे बैठकीचे मुख्य मुद्दे असल्याचे भाजपाचे सरचिटणीस भुपेंदर यादव यांनी सांगितले.

ईशान्य भारतामध्ये भाजपाचे काही अस्तित्व नव्हते, परंतु केंद्रात 2014 मध्ये सत्ता आल्यानंतर भाजपाने ईशान्य भारतात आपली सगळी शक्ती पणाला लावली आहे. भाजपा व त्यांचे सहकारी पक्ष आसाम, अरूणाचल प्रदेश, नागालँड, मणीपूर व सिक्कीममध्ये सत्तेत आहेत. यादव यांनी सांगितले की, "मेघालय, मिझोराम या काँग्रेसशासित राज्यात व त्रिपुरा या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची सत्ता असलेल्या राज्यात सत्ता मिळवण्यासाठी भाजपा सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे." 

मेघालय व त्रिपुरा या दोन राज्यांमध्ये फेब्रुवारी 2018 मध्ये विधानसभेच्या निवडुका होणार आहेत तर मिझोराममध्ये याच वर्षी नोव्हेंबरमध्ये निवडणूक होणार आहे. या प्रदेशाचा एकात्मिक विकास व्हावा हे आमचे उद्दिष्ट्य आहे तसेच सुरक्षित सीमा व राष्ट्रीय एकात्मता हे आमचे लक्ष्य असल्याचे यादव म्हणाले. काँग्रेसमुक्त ईशान्य भारताच्या दिशेने आमची वाटचाल होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बीफबद्दलच्या भाजपाच्या विरोधी भूमिकेबाबत विचारले असता भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, ईशान्य भारतात बीफ हे पारंपरिक खाणं असून नेडा स्थानिक परंपरांचा सन्मान करते आणि कुणी काय खावं हा लोकांचा वैयक्तिक प्रश्न असल्याची नेडीची भूमिका आहे.

टॅग्स :BJPभाजपाAmit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदी