शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

ईशान्य भारत काँग्रेसमुक्त करण्याचा भाजपाचा मनसुबा, अमित शहा आज ठरवणार स्ट्रॅटेजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 14:35 IST

ईशान्य भारतातील आठ पैकी पाच राज्यांमध्ये भाजपाप्रणीत रालोआची सत्ता असून अन्य राज्यांमधूनही काँग्रेसचे उच्चाटन करण्याचा भाजपानं चंग बांधला आहे. या राज्यांमधल्या स्थानिक सहकारी पक्षांशी भाजपा अध्यक्ष आज चर्चा करणार असून काँग्रेसमुक्त ईशान्य भारताच्या दिशेने मोर्चेबांधणी करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

ठळक मुद्देभाजपा व त्यांचे सहकारी पक्ष आसाम, अरूणाचल प्रदेश, नागालँड, मणीपूर व सिक्कीममध्ये सत्तेत आहेत.मेघालय, मिझोराम या राज्यात काँग्रेस व त्रिपुरात या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची सत्ता आहे.मेघालय व त्रिपुरा या दोन राज्यांमध्ये फेब्रुवारी 2018 मध्ये तर मिझोराममध्ये याच वर्षी नोव्हेंबरमध्ये निवडणुका

नवी दिल्ली, दि. 5 - ईशान्य भारतातील आठ पैकी पाच राज्यांमध्ये भाजपाप्रणीत रालोआची सत्ता असून अन्य राज्यांमधूनही काँग्रेसचे उच्चाटन करण्याचा भाजपानं चंग बांधला आहे. या राज्यांमधल्या स्थानिक सहकारी पक्षांशी भाजपा अध्यक्ष आज चर्चा करणार असून काँग्रेसमुक्त ईशान्य भारताच्या दिशेने मोर्चेबांधणी करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

नवी दिल्लीमध्ये आज अमित शाह, ईशान्य भारतातील पाच मुख्यमंत्री, तीन माजी मुख्यमंत्री आणि नॉर्थ ईस्ट डेमोक्रॅटिक अलायन्स (नेडा)च्या अन्य सहकारी पक्षांची पूर्ण दिवसभराची बैठक आहे. सुरक्षित सीमा, राष्ट्रीय एकात्मता, एकात्मिक विकास हे बैठकीचे मुख्य मुद्दे असल्याचे भाजपाचे सरचिटणीस भुपेंदर यादव यांनी सांगितले.

ईशान्य भारतामध्ये भाजपाचे काही अस्तित्व नव्हते, परंतु केंद्रात 2014 मध्ये सत्ता आल्यानंतर भाजपाने ईशान्य भारतात आपली सगळी शक्ती पणाला लावली आहे. भाजपा व त्यांचे सहकारी पक्ष आसाम, अरूणाचल प्रदेश, नागालँड, मणीपूर व सिक्कीममध्ये सत्तेत आहेत. यादव यांनी सांगितले की, "मेघालय, मिझोराम या काँग्रेसशासित राज्यात व त्रिपुरा या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची सत्ता असलेल्या राज्यात सत्ता मिळवण्यासाठी भाजपा सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे." 

मेघालय व त्रिपुरा या दोन राज्यांमध्ये फेब्रुवारी 2018 मध्ये विधानसभेच्या निवडुका होणार आहेत तर मिझोराममध्ये याच वर्षी नोव्हेंबरमध्ये निवडणूक होणार आहे. या प्रदेशाचा एकात्मिक विकास व्हावा हे आमचे उद्दिष्ट्य आहे तसेच सुरक्षित सीमा व राष्ट्रीय एकात्मता हे आमचे लक्ष्य असल्याचे यादव म्हणाले. काँग्रेसमुक्त ईशान्य भारताच्या दिशेने आमची वाटचाल होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बीफबद्दलच्या भाजपाच्या विरोधी भूमिकेबाबत विचारले असता भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, ईशान्य भारतात बीफ हे पारंपरिक खाणं असून नेडा स्थानिक परंपरांचा सन्मान करते आणि कुणी काय खावं हा लोकांचा वैयक्तिक प्रश्न असल्याची नेडीची भूमिका आहे.

टॅग्स :BJPभाजपाAmit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदी