शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

राहुल गांधी काँग्रेसच्या 'गाली गँग' चे प्रमुख, भाजपाची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 15:11 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात भारतीय जनता पार्टीने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात भारतीय जनता पार्टीने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. राहुल गांधी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना खालच्या शब्दाचा वापर करुन मर्यादा ओलांडली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे 'गाली गॅंग' चे प्रमुख आहेत अशी टीका भारतीय जनता पार्टीकडून करण्यात आली आहे. 

भाजपाचे नेते मुख्तार अब्बास नकवी यांनी भाजपाच्या शिष्टमंडळासह केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्तार अब्बास नकवी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. त्याचसोबत राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी निवडणूक आयोगाला केल्याचं मुख्तार अब्बास नकवी यांनी सांगितले. 

भाजपा नेत्या निर्मला सीतारामन आणि मुख्तार अब्बास नकवी यांनी सांगितले की, सुप्रीम कोर्टाच्या नावावर वारंवार काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी खोटं बोलत आहे. काँग्रेसमध्ये झूठमेव जयतेच्या आधारावर कोणताही पुरावा नसताना राफेल प्रकरणात खोटे आरोप लावत आहे. निवडणूक आयोगाकडे आम्ही राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर लक्ष ठेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

देशात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये काँग्रेस-भाजपा एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मागील अनेक महिन्यांपासून राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात मोहीम आखली आहे. चौकीदार चोर है अशी घोषणा काँग्रेसकडून आणि राहुल गांधी यांच्याकडून वारंवार केली जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचार भाषणात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व्यासपीठावरुन चौकीदार चोर है असा उल्लेख करत असतात. राफेल विमान खरेदी प्रकरणावरुन राहुल गांधी यांनी प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट केले आहे. राहुल यांच्या याच अभियानाला उत्तर म्हणून भाजपाकडून मै भी चौकीदार असं कॅम्पेन सुरु करण्यात आलं आहे. त्याचसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही विरोधी पक्षांकडून मला शिव्या दिल्या जातात असा आरोप भाषणांमधून करण्यात येतो.   

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBJPभाजपा