शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
3
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
6
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
7
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
8
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
9
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
10
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
11
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
12
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
13
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
14
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
15
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
16
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
17
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
18
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
19
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
20
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा एक्शन मोडवर; रणनीतीमध्ये केले मोठे बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 13:39 IST

याआधी भाजपाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची २ दिवसांची बैठक झाली.

नवी दिल्ली - BJP Preparation for Loksabha ( Marathi Newsलोकसभा निवडणुकीला आता अवघे काही महिनेच शिल्लक आहेत. त्यातच आता भाजपाने निवडणुकीच्या दृष्टीने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. २०२४ ची निवडणूकभाजपासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे पक्षाने सर्व नेत्यांना एक्शन मोडमध्ये आणले आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी विविध बैठका घेतल्या जात आहेत. त्यात पक्षाचे प्रत्येक लोकसभा मतदारसंघनिहाय निवडणूक कार्यालय उघडण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाने सर्व राज्यातील प्रदेशाध्यक्षांना याबाबत आदेश दिलेत. येत्या ३० जानेवारीच्या आत लोकसभा मतदारसंघनिहाय कार्यालये उघडण्याची सूचना पक्षाकडून करण्यात आली आहे. 

भाजपानं प्रदेश पदाधिकाऱ्यांना सांगितलं आहे की, लोकसभा निवडणुकीची तारीख, पक्षाचे उमेदवार यांच्या नावाची वाट न पाहता सर्व लोकसभा मतदारसंघात निवडणूक कार्यालये उघडा. त्यामुळे लोकसभा उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्यापूर्वी पक्ष मतदारसंघात कार्यालये थाटणार आहेत. त्याठिकाणी निवडणुकीसाठी लागणारे साहित्य, बैठका आणि सर्व हालचालीचे केंद्र असेल. आतापर्यंत उमेदवारांच्या नावाची घोषणा झाल्यावर लोकसभा मतदारसंघात मध्यवर्ती निवडणूक कार्यालये उघडली जात होती. मात्र यंदा भाजपाने निवडणुकीच्या दृष्टीने आधीच तयारी सुरू केली आहे. 

निवडणूक खर्च कमी करण्याचे निर्देशत्याचसोबत पक्षाच्या वरिष्ठांनी निवडणुकीत प्रदेश संघटनांकडून खर्च कमी करण्याची सूचना दिली आहे. कार्यकर्त्यांनी झेंडे, बॅनर, पोस्टर, वाहन इत्यादींवर खर्च कमी करावा याची जबाबदारी प्रदेश कार्यालयांची असेल. तर पैसे खर्च करून निवडणुका जिंकणे ही काँग्रेसची संस्कृती आहे. जी काँग्रेस नेत्यांच्या भ्रष्टाचारामुळे आली आहे असा मेसेज लोकांपर्यंत कार्यकर्त्यांना पोहचवावा असंही सांगण्यात आले आहे. 

याआधी भाजपाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची २ दिवसांची बैठक झाली. ज्यात १० टक्के मतांची टक्केवारी वाढवून ५० टक्के मते आणि मोठ्या फरकाने निवडणुकीत विजय मिळवण्याचे टार्गेट ठेवले आहे. यंदा पक्षाचे लक्ष नवीन मतदारांवर आहे. नवीन मतदारांसाठी संमेलनाची सुरुवात २४ जानेवारीपासून युवा मोर्चा करेल. भाजपा युवा मोर्चा देशभरात ५ हजार संमेलन घेईल. त्यातून नवीन मतदारांना जोडण्याच्या कार्यक्रमाची जबाबदारी भाजपाच्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. मतांची टक्केवारी वाढवण्यासाठी लवकरच कार्यक्रमाची रुपरेषा तयार केली जाणार आहे. 

टॅग्स :lok sabhaलोकसभाBJPभाजपाcongressकाँग्रेसElectionनिवडणूक