शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

भाजपाकडून एका आमदाराला २५ ते ३५ कोटींची ऑफर; काँग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 14:54 IST

Congress: मध्य प्रदेशातील आमदार कर्नाटक आमदारांसारखे नाहीत. हे बिकाऊ आमदार नाहीत. मी कोणत्याही पुराव्याशिवाय आरोप लावत नाही.

ठळक मुद्दे एका आमदाराला २५ ते ३५ कोटी रुपये ऑफरकाँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केला दावा भाजपाने फेटाळले काँग्रेसचे आरोप, खळबळजनक दावा करणं ही दिग्विजय सिंह यांची जुनी सवय

नवी दिल्ली - मध्य प्रदेशात काँग्रेस शासित राज्य सरकार पाडण्यासाठी पुन्हा एकदा भाजपाने हालचाली सुरु केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. काँग्रेस आमदारांना विकत घेण्यासाठी मध्य प्रदेश भाजपाकडून घोडेबाजार केला जात आहे असा आरोप माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी केला आहे. काँग्रेसने केलेल्या या आरोपामुळे खळबळ माजली आहे. 

दिल्ली पत्रकार परिषदेत काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह यांनी सांगितले की, मध्य प्रदेशातील आमदार कर्नाटक आमदारांसारखे नाहीत. हे बिकाऊ आमदार नाहीत. मी कोणत्याही पुराव्याशिवाय आरोप लावत नाही. शिवराज चौहान आणि नरोत्तम मिश्र यांच्यात एकमत झालेले आहे. एकाने मुख्यमंत्री आणि दुसऱ्याने उपमुख्यमंत्रिपद घेण्याचे स्वप्न पाहत आहेत. शिवराज चौहान यांच्याकडून काँग्रेस आमदारांना फोन लावण्यात येत आहेत. एका आमदाराला २५ ते ३५ कोटी रुपये ऑफर दिली जात आहे. ५ कोटी आता घ्या, दुसऱ्या टप्पा राज्यसभा निवडणूक आणि तिसऱ्या टप्प्यात संपूर्ण रक्कम सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी देऊ असं सांगितलं जात आहे. 

मात्र दिग्विजय सिंह यांच्या आरोपाला उत्तर देताना शिवराज चौहान म्हणाले की, खळबळजनक दावा करणं ही दिग्विजय सिंह यांची जुनी सवय आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांचे लक्ष विचलित करणे आणि स्वत:चं महत्त्व वाढवण्यासाठी त्यांच्याकडून हे आरोप केले जात असावेत असा टोला त्यांनी दिग्विजय सिंह यांना लगावला. 

यापूर्वी कर्नाटकात काँग्रेस-जेडीएस सरकार पाडण्यासाठी भाजपाने धनशक्तीचा वापर केल्याचा आरोप केला जात होता. काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे कर्नाटकमधील कुमारस्वामी सरकार अस्थिर झाले. कर्नाटकमधील राजीनामा दिलेल्या १३ आमदारांमुळे काँग्रेस-जेडीएस सरकार अल्पमतात गेले. कुमारस्वामी सरकार पाडण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजप प्रयत्न करीत असल्याचा आरोप करण्यात आला होता. कर्नाटकच्या विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. त्यात काँग्रेस, जेडीएसच्या बाजूनं ९९ आमदारांनी मतदान केलं. तर १०५ मतं सरकारविरोधात गेली आणि सरकार कोसळलं होतं. 

तर महाराष्ट्रतही सत्तास्थापनेदरम्यान प्रचंड राजकीय घडामोडी घडत होत्या. यावेळी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीने आपल्या आमदारांना सुरक्षितस्थळी ठेवलं होतं. कोणताही आमदार फुटू नये यासाठी खबरदारी घेण्यात आली होती. भाजपाकडून आमदारांना फोडलं जात आहे, त्यांना अमिष दाखवण्यात येत आहेत असा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे मध्य प्रदेशात काँग्रेस सरकार पाडण्याचा आरोप दिग्विजय सिंह यांनी केला आहे तो सिद्ध होतो का ते येणाऱ्या काळात ठरेल.   

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाMadhya Pradeshमध्य प्रदेशDigvijaya Singhदिग्विजय सिंहshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहान