शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

लोकसभा निवडणुकीपर्यंत पक्षांतर्गत निवडणुका का नकोत भाजपला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2018 15:43 IST

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक अवघ्या 7 महिन्यांवर आलेली असताना भाजपने सावध पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षपदाची मुदत जानेवारीमध्ये संपणार आहे. यामुळे भाजपला पक्षांतर्गत निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. मात्र, नव्या टीमसोबत निवडणुकीला सामोरे जाणे कठीण जाणार असल्याचा होरा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये असल्याने काय ...

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक अवघ्या 7 महिन्यांवर आलेली असताना भाजपने सावध पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षपदाची मुदत जानेवारीमध्ये संपणार आहे. यामुळे भाजपला पक्षांतर्गत निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. मात्र, नव्या टीमसोबत निवडणुकीला सामोरे जाणे कठीण जाणार असल्याचा होरा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये असल्याने काय करायचे असा प्रश्न भाजप नेतृत्वासमोर उभा ठाकला आहे. 

पुढील लोकसभा निवडणूक मार्च, एप्रिलमध्ये होणार आहे. अशामध्ये भाजप नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीसोबत निवडणूक लढविण्यास अनुत्सुक आहे. यामुळे सध्याच्या टीमचीच मुदत वाढविण्य़ाचा निर्णय घेण्याची शक्यता असून शहा यांचा कार्यकाळ वाढणार आहे. याबाबतच्या प्रस्तावावर राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्याची शक्यता आहे.

शनिवारी सकाळी भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची तीन दिवसीय बैठकीला सुरुवात झाली. यावेळी अमित शहा यांनी सांगितले की, 2019 मध्ये आम्ही स्पष्ट बहुमताने विजयी होऊ. या संकल्पाच्या ताकदीला कोणीही हरवू शकता नाही. 

राष्ट्रीय कार्यकारिणीच्या या बैठकीमध्ये पक्षाच्यावतीने 'अजेय बीजेपी'चा नारा दिला. या बैठकीमध्ये राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांसह राज्यांचे प्रदेशाध्यक्षही सहभागी झाले आहेत. यावेळी येत्या काही महिन्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमधील रणनीतीवर चर्चा करण्यात आली. खासकरून तेलंगाना राज्यामध्ये भाजप चांगले प्रदर्शन करणार असल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Telanganaतेलंगणा