शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
3
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
4
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
5
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
7
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
8
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
9
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
10
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
11
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
12
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
13
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
14
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
15
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
16
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
18
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
19
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
20
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?

PM मोदींच्या अपमानाची आठवण, भाजपानं सुनावलं; जे.पी नड्डांचं खरगेंना खरमरीत पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 10:56 IST

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राहुल गांधींवरील टीकेवरून पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं होते. त्याला भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

नवी दिल्ली - देशाच्या राजकारणात सध्या काँग्रेस आणि भाजपा यांच्यात 'लेटर'वॉर सुरू झालं आहे. राहुल गांधी यांनी आरक्षणावरून केलेल्या विधानावरून भाजपा नेते आक्रमक झाले. त्यानंतर राहुल गांधींच्या टीकेवरून काँग्रेस  अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवून प्रश्नांचा भडीमार केला. आता खरगे यांच्या पत्रावर भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी प्रत्युत्तर देत पत्र पाठवलं आहे.

नड्डा यांनी त्यांच्या पत्रात म्हटलंय की, राहुल गांधी यांनी वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान केला. तितकेच नाही तर सोनिया गांधी यांनी मोदींसाठी मौत का सौदागर या शब्दाचा वापर केला. काँग्रेस नेत्यांनी मागील १० वर्षात पंतप्रधान मोदींना ११० हून अधिक शिव्या दिल्या. ज्या व्यक्तिचा इतिहास देशातील पंतप्रधानांसह पूर्ण ओबीसी समुदायाला चोर म्हणून संबोधण्याचा आहे, पंतप्रधानांसाठी अत्यंत आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्याचा आहे, ज्याने संसदेत पंतप्रधानांना काठीने मारण्याची भाषा केली त्यांच्या मानसिकतेबाबत देशाला माहिती आहे अशा राहुल गांधींना योग्य ठरवण्याचा प्रयत्न तुम्ही कोणत्या मजबुरीतून करत आहात असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

तसेच काँग्रेस कॉपी अँन्ड पेस्टवाला पक्ष बनला आहे. मागील १० वर्षात पंतप्रधानांबद्दल काँग्रेस नेत्यांनी शिव्यांचा वापर केला. दुर्दैव म्हणजे त्यात काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाचाही समावेश होता. मग त्यावेळी राजकीय संस्कृती, मर्यादा, शिस्त, शिष्टाचार यासारख्या शब्दांचा तुमच्या आणि काँग्रेस पक्षाच्या शब्दकोशातून गायब होता का? असा सवाल करत जे.पी नड्डा यांनी राहुल गांधी यांच्या मोहब्बत की दुकान याचा उल्लेख केला. स्वार्थी सत्तेत बुडालेली काँग्रेस पार्टी कथित मोहब्बत की दुकान असं जे प्रोडेक्ट विकत आहे, जातीयवादी विष पेरत आहे. वैमनस्या वाढवत आहे. देश तोडण्याचं काम करतेय असा आरोपही केला. 

काय म्हणाले होते मल्लिकार्जुन खरगे?

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं होते. त्यात केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टूसह इतर नेत्यांविरोधात ज्यांनी राहुल गांधींवर टीका केली त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. या नेत्यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर आक्षेपार्ह आणि हिंसक विधाने केली. भाजपा नेत्यांच्या या विधानावर काँग्रेसनं चिंता व्यक्त केली होती. भविष्यासाठी हे घातक आहे असं खरगे म्हणाले. 

टॅग्स :J P Naddaजगत प्रकाश नड्डाMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी