शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

PM मोदींच्या अपमानाची आठवण, भाजपानं सुनावलं; जे.पी नड्डांचं खरगेंना खरमरीत पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 10:56 IST

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राहुल गांधींवरील टीकेवरून पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं होते. त्याला भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

नवी दिल्ली - देशाच्या राजकारणात सध्या काँग्रेस आणि भाजपा यांच्यात 'लेटर'वॉर सुरू झालं आहे. राहुल गांधी यांनी आरक्षणावरून केलेल्या विधानावरून भाजपा नेते आक्रमक झाले. त्यानंतर राहुल गांधींच्या टीकेवरून काँग्रेस  अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवून प्रश्नांचा भडीमार केला. आता खरगे यांच्या पत्रावर भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी प्रत्युत्तर देत पत्र पाठवलं आहे.

नड्डा यांनी त्यांच्या पत्रात म्हटलंय की, राहुल गांधी यांनी वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान केला. तितकेच नाही तर सोनिया गांधी यांनी मोदींसाठी मौत का सौदागर या शब्दाचा वापर केला. काँग्रेस नेत्यांनी मागील १० वर्षात पंतप्रधान मोदींना ११० हून अधिक शिव्या दिल्या. ज्या व्यक्तिचा इतिहास देशातील पंतप्रधानांसह पूर्ण ओबीसी समुदायाला चोर म्हणून संबोधण्याचा आहे, पंतप्रधानांसाठी अत्यंत आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्याचा आहे, ज्याने संसदेत पंतप्रधानांना काठीने मारण्याची भाषा केली त्यांच्या मानसिकतेबाबत देशाला माहिती आहे अशा राहुल गांधींना योग्य ठरवण्याचा प्रयत्न तुम्ही कोणत्या मजबुरीतून करत आहात असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

तसेच काँग्रेस कॉपी अँन्ड पेस्टवाला पक्ष बनला आहे. मागील १० वर्षात पंतप्रधानांबद्दल काँग्रेस नेत्यांनी शिव्यांचा वापर केला. दुर्दैव म्हणजे त्यात काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाचाही समावेश होता. मग त्यावेळी राजकीय संस्कृती, मर्यादा, शिस्त, शिष्टाचार यासारख्या शब्दांचा तुमच्या आणि काँग्रेस पक्षाच्या शब्दकोशातून गायब होता का? असा सवाल करत जे.पी नड्डा यांनी राहुल गांधी यांच्या मोहब्बत की दुकान याचा उल्लेख केला. स्वार्थी सत्तेत बुडालेली काँग्रेस पार्टी कथित मोहब्बत की दुकान असं जे प्रोडेक्ट विकत आहे, जातीयवादी विष पेरत आहे. वैमनस्या वाढवत आहे. देश तोडण्याचं काम करतेय असा आरोपही केला. 

काय म्हणाले होते मल्लिकार्जुन खरगे?

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं होते. त्यात केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टूसह इतर नेत्यांविरोधात ज्यांनी राहुल गांधींवर टीका केली त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. या नेत्यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर आक्षेपार्ह आणि हिंसक विधाने केली. भाजपा नेत्यांच्या या विधानावर काँग्रेसनं चिंता व्यक्त केली होती. भविष्यासाठी हे घातक आहे असं खरगे म्हणाले. 

टॅग्स :J P Naddaजगत प्रकाश नड्डाMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी