शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

JP Nadda: “देशातील तरुणांना विनाश नाही, विकास हवाय”; जेपी नड्डांचे विरोधकांना सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 13:16 IST

JP Nadda: देशाच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे होतील, तेव्हाचा भारत कसा हवा? अशी विचारणा जेपी नड्डा यांनी केली आहे.

नवी दिल्ली: रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या निमित्ताने देशभरात काढण्यात आलेल्या शोभायात्रांदरम्यान काही हिंसक घटना घडल्या. यावरून राजकारण तापताना दिसत आहे. केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर विरोधकांकडून जोरदार निशाणा साधला जात आहे. यातच देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी एक संयुक्त निवेदन जारी करत देशातील जातीय हिंसाचाराच्या घटनांवर पंतप्रधान मोदी (PM Modi) गप्प का, असा गंभीर सवाल करत घणाघाती टीका केली. याला आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी प्रत्युत्तर दिले असून, देशातील जनतेच्या नावे एक खुले पत्र लिहिले आहे. 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी काँग्रेस काळातील दंगलींची यादीच देत देशातील तरुणांना विनाश नाही, विकास हवा आहे. विरोधकांनी आतापर्यंत भेदभाव आणि व्होट बँकेचे राजकारण केल्याचा आरोप करत, नड्डा यांनी विरोधकांनी आता विकासाचे राजकारण करावे, असा सल्ला दिला आहे. तसेच काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संसदीय निवडणुकीत पराभूत केले होते, याची आठवणही जेपी नड्डा यांनी देशवासीयांना लिहिलेल्या पत्रात करून दिली आहे. 

देशाच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे होतील, तेव्हाचा भारत कसा हवा?

जेपी नड्डा यांनी देशाच्या स्वातंत्र्यापासून आतापर्यंत काँग्रेसच्या कार्यकाळात झालेल्या दंगलींची यादीच दिली आहे. तसेच देशात काँग्रेसच्या कार्यकाळातच भीषण नरसंहार झाले, असा दावा नड्डा यांनी केला. तसेच देशाच्या स्वातंत्र्याला जेव्हा २०४७ मध्ये शंभर वर्षे होतील, तेव्हाचा भारत देशवासीयांना कसा हवा आहे, असा सवालही नड्डा यांनी केला आहे. आताच्या घडीला सर्व धर्मांतील, सर्व वयोगटातील युवापिढी सर्व क्षेत्रातील जनतेसह गरिबी हटवणे आणि भारताने नवीन यशोशिखर गाठण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे नड्डा यांनी नमूद केले. 

दरम्यान, देशातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांत जातीय हिंसाचाराच्या घटना घडल्या असून चिथावणीखोर वक्तव्यांनी स्थिती आणखी बिघडवली जात आहे. त्यावर देशातील विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी एक संयुक्त निवेदन जारी करत चिंता व्यक्त केली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस प्रमुख ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी , झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला, बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव , भाकपचे सरचिटणीस डी. राजा, देबब्रत बिस्वास, मनोज भट्टाचार्य, दीपांकर भट्टाचार्य, पी. के. कुन्हालीकुट्टी या १३ नेत्यांनी हे संयुक्त निवेदन जारी केले आहे. 

टॅग्स :J P Naddaजगत प्रकाश नड्डाBJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण