शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

ममता बॅनर्जी सरकारने बंगालची संस्कृती संपुष्टात आणली; जेपी नड्डांची टीका

By देवेश फडके | Updated: February 9, 2021 16:39 IST

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी दुसऱ्या परिवर्तन यात्रेत संबोधित करताना ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार टीका केली.

ठळक मुद्देजेपी नड्डा यांची ममता बॅनर्जी सरकारवर टीकाबंगालची संस्कृती संपुष्टात आणल्याचा नड्डा यांचा दावापरिवर्तन यात्रेदरम्यान नड्डा यांनी केले जनतेला संबोधित

कोलकाता :पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील आरोप-प्रत्यारोप हळूहळू आणखी तीव्र होऊ लागले आहेत. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी दुसऱ्या परिवर्तन यात्रेत संबोधित करताना ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार टीका केली. ममता बॅनर्जी सरकारने बंगालची संस्कृती संपुष्टात आणल्याचा दावा जेपी नड्डा यांनी यावेळी केला. (bjp national president j p nadda criticized mamata banerjee in west bengal parivartan rally)

ममता दीदी राज्यातील जनतेला परिवर्तन हवे आहे. ममता बॅनर्जींना पश्चिम बंगालचा विकास नकोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पश्चिम बंगालला येतात. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात बंगालचा विकास होईल. आम्ही मोकळ्या हाताने येत नाही, तर प्रकल्प घेऊन येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुमारे ४ हजार ७०० कोटींचे प्रकल्प बंगालला दिले, असे सांगतममता बॅनर्जींना केवळ हुकूमशाहीची चिंता असल्याचा दावा जेपी नड्डा यांनी केला.

बिहारमध्ये पळून जायच्या तयारीत होता दीप सिद्धू; पोलिसांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

ममता बॅनर्जी यांचा पुतण्या अभिषेक बॅनर्जी यांनी शुभेंदू अधिकारी यांच्यावर टीका करायला हवी होती. मात्र, त्यांच्या वडिलांवर टीका करताना अभिषेक बॅनर्जी यांची भाषा बंगालच्या संस्कृतीला धरून नव्हती. ममता बॅनर्जी सरकार बंगालच्या संस्कृतीसाठी धोकादायक असून, ती हळूहळू संपुष्टात आणण्याचे काम दीदींच्या कार्यकाळात झाले, असा दावाही जेपी नड्डा यांनी केला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात पश्चिम बंगाल आणि येथील जनतेबाबत विशेष आदर आहे. तृणमूल काँग्रेसच्या चुकीच्या वागणुकीमुळे आज अनेक नेते आणि कार्यकर्ते पक्षाला सोडून गेले. ममता बॅनर्जी सरकार केंद्राच्या योजनांची केवळ नावे बदलण्याच्या मागे आहे. बंगालच्या जनतेच्या मनात आता पंतप्रधान मोदींनी स्थान मिळवले आहे, असा विश्वास जेपी नड्डा यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :PoliticsराजकारणJ P Naddaजगत प्रकाश नड्डाBJPभाजपाMamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाwest bengalपश्चिम बंगाल