शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

...तर लवकरच भारत भाजपामुक्त होईल; बड्या नेत्याकडून भाजपाला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 15:26 IST

मोदींचे सल्लागार त्यांना चुकीची माहिती देतात; भाजपा नेत्याचं शरसंधान

नवी दिल्ली: झारखंडमधील पराभवामुळे भाजपाच्या गोटात चिंतेचं वातावरण असताना पक्षाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामींनी घरचा आहेर दिला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची अवस्था अतिशय वाईट आहे. आर्थिक आघाडीवर वेळीच योग्य पावलं उचलली न गेल्यास देश भाजपामुक्त होईल, असा इशारा स्वामींनी भाजपा नेतृत्त्वाला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सल्लागार त्यांना अंधारात ठेवत असल्याचंदेखील स्वामींनी म्हटलं आहे. 'अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी प्रयत्न न केल्यास भारत भाजपामुक्त होईल. मोदींचे सल्लागार कोण आहेत याबद्दल मला माहिती नाही. मात्र ते त्यांना सत्य परिस्थिती सांगत नाहीत. मोदींना अंधारात ठेवण्याचं काम त्यांच्या सल्लागारांकडून सुरू आहे', अशा शब्दांत स्वामींनी स्वत:च्याच सरकारवर टीका केली. झारखंडमधील पराभवाच्या पार्श्वभूमीवर स्वामींनी मोदी सरकारला लक्ष्य केलं. काल झारखंड विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. राज्यात विधानसभेच्या एकूण ८१ जागा आहेत. यापैकी केवळ २५ जागा जिंकण्यात भाजपाला यश आल्यानं त्यांना सत्ता गमवावी लागली. तर झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस, राष्ट्रीय जनता दलाच्या महाआघाडीनं ४७ जागा जिंकल्या. झारखंड मुक्ती मोर्चानं ३०, काँग्रेस १६, तर राष्ट्रीय जनता दलानं एक जागा जिंकली. झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन राज्याचे मुख्यमंत्री होतील. त्यांनी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत दोन्ही ठिकाणी विजय संपादन केला आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJharkhandझारखंडBJPभाजपाSubramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामी