शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

Lakhimpur Violence: भाजप खासदार वरुण गांधींनी आपल्या ट्विटर बायोमधून हटवले पक्षाचे नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 14:35 IST

UP Lakhimpur Violence: खासदार वरुण गांधींनी सोमवारी सकाळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसह पीडितांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणी केली होती.

पीलीभीत:उत्तर प्रदेशातील पीलीभीतचे भाजप खासदार वरुण गांधी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटच्या बायोमधून 'भाजप' हा शब्द काढून टाकला आहे. वरुण गांधी यांनी सोमवारी सकाळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसह पीडितांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणी केली होती. यापूर्वीही त्यांनी शेतकऱ्यांना ऊसाचा दर ₹ 350 / क्विंटलवरुन 400 रुपये करण्याची मागणी केली होती.

भाजप खासदार वरुण गांधी यांनी सीएम योगींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, लखीमपूर खीरीमध्ये विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना निर्घृणपणे चिरडल्याच्या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण देशातील नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. या घटनेच्या एक दिवस आधी देशाने अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी यांची जयंती साजरी केली होती. लखीमपूर खीरीमध्ये दुसऱ्याच दिवशी आमच्या अन्नदात्यांना ठार मारल्याच्या घटना कोणत्याही सुसंस्कृत समाजात अशोभनीय आहे. आंदोलक शेतकरी बांधव आपलेच नागरिक आहेत. शेतकरी बांधव काही समस्यांमुळे त्रस्त असतील आणि त्यांच्या लोकशाही हक्कांखाली निषेध करत असतील तर आपण त्यांच्याशी मोठ्या संयमाने वागले पाहिजे.

त्यांनी पत्रात पुढे लिहिले की, आपण आमच्या शेतकऱ्यांशी केवळ आणि केवळ गांधीवादी आणि लोकशाही मार्गाने कायद्याच्या कक्षेत संवेदनशीलतेने वागले पाहिजे. या घटनेत शहीद झालेल्या शेतकरी बांधवांना श्रद्धांजली अर्पण करताना मी त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो. मी तुम्हाला विनंती करतो की या घटनेशी संबंधित सर्व संशयितांची त्वरित ओळख पटवा आणि आयपीसीच्या कलम 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करुन कडक कारवाई करा. याशिवाय, पीडितांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची भरपाई देखील देण्यात यावी आणि भविष्यात शेतकऱ्यांवर असा अन्याय किंवा इतर अत्याचार होणार नाहीत याची खात्री करावी. मला आशा आहे की या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, तुम्ही माझ्या विनंतीवर त्वरित कारवाई कराल.

लखीमपूर खीरीमध्ये काय झालं?

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या दौऱ्यावर शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान रविवारी लखीमपूर खीरी जिल्ह्यातील तिकोनिया भागात झालेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह नऊ जण ठार झाले. ही घटना तिकोनिया-बनबीरपूर रस्त्यावर घडली. उपमुख्यमंत्र्यांना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी जाणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांच्या दोन वाहनांनी आंदोलकांना कथितरीत्या धडक दिल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी दोन्ही वाहनांची जाळपोळ केली. या घटनेत चार शेतकरी आणि वाहनांवरील इतर चार लोकांचा मृत्यू झाला. केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि खेरीचे खासदार अजय कुमार मिश्रा यांचे मूळ गाव असलेल्या मण्य यांच्या बनबीरपूरच्या दौऱ्याला शेतकरी विरोध करत होते.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशlakhimpur-pcलखीमपुरVarun Gandhiवरूण गांधीBJPभाजपा