शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

एका खासदारामुळे संपूर्ण भाजप अडचणीत; 'त्या' मागणीनं विरोधकांच्या आक्रमणाला धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 10:47 IST

खासदाराच्या मागणीमुळे भाजप अडचणीत; विरोधकांचा हल्लाबोल

नवी दिल्ली: पुढील वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्ष कामाला लागला आहे. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जातीनिहाय जनगणनेची मागणी केली जात आहे. विरोधकांनी संसदेत आणि संसदेबाहेर जातीनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली आहे. त्यातच आता भाजपच्या खासदार संघमित्रा मौर्य यांनीदेखील जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा उपस्थित केला आहे.

मंगळवारी लोकसभेत ओबीसी आरक्षण विधेयकावर चर्चा सुरू होती. त्यावेळी भाजपकडून संघमित्रा मौर्य यांनी त्यांचं मत मांडलं. 'मागील सरकारांनी जातीनिहाय जनगणनेला विरोध केला. मात्र आता मोदी सरकारनं याचा अधिकार राज्यांना दिला आहे,' असं मौर्य म्हणाल्या. मौर्य यांचं विधान ऐकून भाजपचे अनेक खासदार चकित राहिले. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव अगदी स्पष्ट दिसत होते. काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील सरकारांना जे जमलं नाही, ते मोदी सरकारनं करून दाखवलंय, असंदेखील मौर्य पुढे म्हणाल्या.

१९३१ मध्ये जातीनिहाय जनगणना झाली. त्यावेळी देशातील ओबीसींचं प्रमाण ५२ टक्के होतं. मात्र आताची आकडेवारी उपलब्ध नाही. त्यामुळे जातीनिहाय जनगणना झाल्यास ओबीसींना सरकारी योजनांचा लाभ मिळेल, असं मौर्य यांनी म्हटलं. संघमित्रा मौर्य लोकसभेत बदायू मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. त्यांचे वडील स्वामी प्रसाद मौर्य उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री आहेत. काल लोकसभेत ओबीसी आरक्षण विधेयकावर चर्चा झाली. या विधेयकावर बोलणाऱ्या भाजपच्या त्या पहिल्या खासदार होत्या.

टॅग्स :BJPभाजपाOBC Reservationओबीसी आरक्षण