शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

...अन् मनोज तिवारी थोडक्यात बचावले, 40 मिनिटं 'गायब' होतं हेलिकॉप्टर; पाटण्यात इमर्जन्सी लँडींग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2020 12:31 IST

BJP Manoj Tiwari : भाजपा खासदार मनोज तिवारी एका अपघातातून थोडक्यात बचावल्याची घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - लोकप्रिय भोजपुरी अभिनेते आणि भाजपा खासदार मनोज तिवारी एका अपघातातून थोडक्यात बचावल्याची घटना समोर आली आहे. बिहार निवडणुकीसाठी भाजपाच्या प्रचारात सध्या मनोज तिवारी व्यस्त आहेत. याचदरम्यान निवडणुकीच्या प्रचारासाठी निघालेले असताना त्याचं हेलिकॉप्टर तब्बल 40 मिनिटं गायब झालं होतं. काही तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टरशी असलेला संपर्क तुटला होता. मात्र त्यानंतर पाटणा येथे हेलिकॉप्टरचं यशस्वीरित्या 'इमर्जन्सी लँडींग' करण्यात आलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज तिवारी पाटणा येथून मोतिहारी येथे निवडणूक प्रचारासाठी जात होते. यासाठी पाटणाच्या बेहटिया विमानतळावरून त्यांच्या हेलिकॉप्टरने उड्डाण केले. मात्र उड्डाणानंतर हेलिकॉप्टरशी असलेला संपर्क तुटला आणि 40 मिनिटं ते गायब होतं. कोणतीही माहिती मिळत नव्हती. काही तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टरला इमर्जन्सी लँडींग करावं लागलं. पाटणा येथे लँडींग केल्यानंतर धोका टळला आहे. 

मनोज तिवारी यांच्यासह हेलिकॉप्टरमध्ये असलेले सर्वच जण सुरक्षित असल्याची माहिती मिळत आहे. इमर्जन्सी लँडींगमुळे सर्व जण थोडक्यात बचावले आहेत. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. मनोज तिवारी हे भाजपाच्या स्टार प्रचारकांपैकी एक आहेत. काही दिवसांपूर्वी तिवारी यांची सुरक्षा वाढवण्यात आली होती. सभांमध्ये वाढणारी गर्दी लक्षात घेऊन या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

"राम मंदिराची तारीख विचारणारे आता नाईलाजाने टाळ्या वाजवताहेत", मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

बिहारमध्ये जोरदार प्रचार सुरू आहे. दरभंगा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांची रॅली पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राम मंदिराच्या उभारणीवरून त्यांनी विरोधकांना सणसणीत टोला लगावला आहे. "राम मंदिराची तारीख विचारणारे आता नाईलाजाने टाळ्या वाजवताहेत" असं म्हणत पंतप्रधान मोदींनी निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी यांनी "गेल्या अनेक वर्षांच्या तपस्येनंतर आता राम मंदिराच्या उभारणीचं काम सुरू झालं आहे. राम मंदिराची तारीख विचारणारे आता नाईलाजाने टाळ्या वाजवत आहेत. प्रत्येक शेतकऱ्याच्या  थेट बँक खात्यात आम्ही मदत पोहोचवणार असल्याचं सांगितलं होतं. आतापर्यंत जवळपास एक लाख कोटी रूपयांपेक्षा अधिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे" असं म्हटलं आहे.

 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBiharबिहारBJPभाजपा