शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
3
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
4
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
5
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
6
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
7
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
8
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
9
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
10
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
11
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
12
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
13
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
14
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
15
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
16
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
17
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
18
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
19
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान

लिव्ह इन रिलेशनशिप धोकादायक आजार, प्रेमविवाहातही परवानगी हवी; भाजप खासदाराची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 14:54 IST

लिव्ह-इन रिलेशनशिपवर बंदी घालावी आणि त्यासाठी कायदा करावा अशी मागणी भाजप खासदार धरमबीर सिंह यांनी केली आहे.

लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, आज भाजप खासदार धरमसिंह यांनी लिव्ह-इन रिलेशनशीपवर प्रश्न उपस्थित केले आहेत. धरमबीर सिंह यांनी लिव्ह-इन रिलेशनशिपला धोकादायक आजार असल्याचे सांगून त्याविरोधात कायदा करण्याची मागणी केली आहे. हरियाणातील भिवानी-महेंद्रगडचे खासदार धरमबीर सिंह म्हणाले की, लिव्ह-इन रिलेशनशिपसारख्या आजाराला समाजातून उखडून टाकण्याची गरज आहे. याविरोधात कायदा करावा, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. झिरो अवरमध्ये हा मुद्दा उपस्थित करताना त्यांनी प्रेमविवाहावरही प्रश्न उपस्थित केले. सिंह म्हणाले की, प्रेमविवाहांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे लग्नासारख्या बाबतीत वधू-वरांच्या पालकांची संमती आवश्यक असायला हवी, असंही ते म्हणाले. 

चीनच्या माजी परराष्ट्र मंत्र्यांना हालहाल करून मारले; ब्रिटनमधून खळबळजनक दावा

खासदार धरमबीर सिंह  म्हणाले, 'मला हा गंभीर मुद्दा संसद आणि सरकारसमोर मांडायचा आहे. भारतीय संस्कृती वसुधैव कुटुंबकमसाठी ओळखली जाते. आपली सामाजिक बांधणी जगातील इतर अनेक देशांपेक्षा वेगळी आहे. विविधतेतील एकतेच्या आपल्या संस्कृतीचा संपूर्ण जगावर प्रभाव पडला आहे. भारतात अ‍ॅरेंज्ड मॅरेजची परंपरा फार पूर्वीपासून आहे. आजही समाजातील एक मोठा वर्ग कुटुंब आणि नातेवाईकांच्या संमतीनेच लग्नाला महत्त्व देतो. लग्नात मुलगा आणि मुलगी यांच्या संमतीशिवाय घरातील सदस्यांशीही सल्लामसलत केली जाते. याशिवाय अनेक बाबीही विचारात घेतल्या जातात.

"लोक कौटुंबिक पार्श्वभूमी आणि सामाजिक मूल्ये लक्षात घेऊन लग्न करतात. लग्नासारख्या पवित्र बंधनाचे पावित्र्य राखले पाहिजे, असे ते म्हणाले. खासदार धरमबीर म्हणाले, 'लग्न हे पवित्र नाते मानले जाते, जे ७ पिढ्या टिकते. भारतात घटस्फोटाचे प्रमाण केवळ १.१ टक्के आहे, तर अमेरिकेत ते ४० टक्के आहे. ठरवून केलेल्या लग्नात घटस्फोट फार कमी वेळा होतात, असं समोर आलं आहे, अलीकडच्या काळात देशात घटस्फोटाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याचे कारण म्हणजे प्रेमविवाहात, यामुळे अधिक नाती तुटतात, असंही धरमबीर सिंह म्हणाले.

सिंह म्हणाले, माझी सूचना आहे की प्रेमविवाहात पालकांची मान्यता अनिवार्य करावी. याचे कारण असे की, देशाच्या मोठ्या भागात एकोप्याने विवाह होत नाहीत. प्रेमविवाहावरून गावात अनेक वाद होतात. अशा भांडणात अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात. अशा परिस्थितीत दोन्ही घरच्यांच्या मान्यतेने लग्न होणे आवश्यक आहे. आता आणखी एक नवीन आजार उद्भवला आहे, ज्याला लिव्ह-इन रिलेशनशिप म्हटले जात आहे. या अंतर्गत दोन व्यक्ती लग्नाशिवाय एकत्र राहू शकतात.

श्रद्धा केसची दिली माहिती

यावेळी सिंह यांनी श्रद्धा हत्याकांडाचाही उल्लेख केला. धरमबीर सिंह म्हणाले, 'पाश्‍चिमात्य देशांमध्ये असे संबंध सामान्य आहेत, परंतु आपल्या समाजातही हे दुष्प्रवृत्ती वेगाने पसरत आहे. त्याचे परिणाम अत्यंत घातक आहेत. नुकतेच श्रद्धा आणि आफताब पूनावालाचे प्रकरणही समोर आले. दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहत होते. आता अशी प्रकरणे रोज समोर येत आहेत. यामुळे आपली संस्कृती नष्ट होत असून समाजात द्वेष निर्माण होत असल्याचेही खासदार सिंह म्हणाले.

टॅग्स :ParliamentसंसदBJPभाजपा