शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

'बीएसएनएलचे कर्मचारी देशद्रोही, खाजगीकरण केल्यानंतर काढले जाईल', भाजपा खासदाराचे वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 17:29 IST

भाजपाचे खासदार अनंतकुमार हेगडे यांची वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही.

ठळक मुद्देमहात्मा गांधीजींनी ज्या सत्याग्रहाचे नेतृत्त्व केले, ते वास्तवात आंदोलन नव्हे, तर एक नाटक होते, असे वक्तव्य अनंतकुमार हेगडे यांनी केले होते.

नवी दिल्ली : भाजपाचे खासदार अनंत कुमार हेगडे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केल्याने चर्चेत आले आहेत. यावेळी बीएसएनएल कर्मचाऱ्यांबाबत त्यांनी विधान केले आहे. बीएसएनएलच्या ८८००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले जाणार आहे. कारण सरकार बीएसएनएलचे खाजगीकरण करणार आहे, असे अनंतकुमार हेगडे यांनी म्हटले आहे. १० ऑगस्ट रोजी उत्तर कन्नड जिल्ह्यातील कुमटा येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

अनंतकुमार हेगडे म्हणाले, "बीएसएनएलचे कर्मचारी देशद्रोही आहेत. जे प्रसिद्ध कंपनी विकसित करण्यासाठी काम करण्यास इच्छुक नाहीत. ८८००० हून अधिक कर्मचार्‍यांना काढून टाकले जाणार आहे. कारण सरकार बीएसएनएलचे खाजगीकरण करणार आहे. ''

दरम्यान, भाजपाचे खासदार अनंतकुमार हेगडे यांची वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल असे विधान केले होते, यावरुन बराच वाद झाला होता. महात्मा गांधीजींनी ज्या सत्याग्रहाचे नेतृत्त्व केले, ते वास्तवात आंदोलन नव्हे, तर एक नाटक होते, असे वक्तव्य अनंतकुमार हेगडे यांनी केले होते.

याचबरोबर, अनंतकुमार हेगडे म्हणाले होते की, "या आंदोलनाचे नेतृत्त्व इंग्रजांच्या सहमतीने करण्यात आले. या कथित नेत्यांपैकी एकालाही पोलिसांनी मारले नाही. भारताला स्वातंत्र्य हे बलिदान आणि सत्याग्रहामुळे मिळाले हे काँग्रेसचे समर्थक सांगतात. पण हे सत्य नाही. इंग्रजांनी सत्याग्रहामुळे देश सोडला नव्हता." 

टॅग्स :BSNLबीएसएनएलAnantkumar Hegdeअनंतकुमार हेगडे