शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा आमदाराने केंद्रीय अर्थमंत्र्यांना सुचविला भन्नाट तोडगा; म्हणाला काळा पैसाच संपून जाईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 14:19 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा संपविण्याची मोहिम उघडली होती. 2014 लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी आघाडी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना स्विस बँकांमधील काळा पैसा भारतात आणून प्रत्येक नागरिकाच्या खात्यात 15 लाख रुपये टाकण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर दोन वर्षांनी नोटाबंदी केली होती.

गोरखपूर : जीएसटीमुळे महसुलात घट झाल्याने देशाच्या तिजोरीमध्ये खडखडाट जाणवू लागला आहे. यामुळे केंद्र सरकारने आरबीआयकडून पैसे घेतानाच भारत पेट्रोलियम सारख्या कंपन्याही विकायला काढल्या आहेत. यामुळे पेशाने डॉक्टर असलेल्या गोरखपूरच्या भाजपा आमदाराने होमिओपथिक औषधच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना सुचविले आहे. त्यांनी फेसबुकवर हा उपाय पोस्ट केला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा संपविण्याची मोहिम उघडली होती. 2014 लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी आघाडी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना स्विस बँकांमधील काळा पैसा भारतात आणून प्रत्येक नागरिकाच्या खात्यात 15 लाख रुपये टाकण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर दोन वर्षांनी नोटाबंदी केली होती. आता हे दोन्ही प्रयत्न फोल ठरले आहेत. त्यातच वर्षभरानंतर जीएसटी लागू केल्याने भारतीय अर्थव्यस्थेचे कंबरडे मोडल्याचा आरोप विरोधक करत आहेत. देशातील आर्थिक मंदीवर केंद्र सरकारला उपाय सापडत नसताना गोरखपूरचे भाजपा आमदार डॉ. राधा मोहन दास अग्रवाल यांनी आयकरच बंद करण्याचा उपाय सुचविला आहे. 

आज आर्थिक मंदीचे मूळ कारण मागणीत घट झाली हे आहे. बाजारात खरेदीची संख्या जोपर्यंत वाढत नाही, उत्पादक माल कोणासाठी बनविणार? तो त्याचे पैसे माल बनविण्याऐवजी शेअर बाजारात गुंतवेल, आणि हेच झाले आहे. आम्ही जेवढे पैसे त्यांना मदतीसाठी दिले ते त्यांनी उत्पादन वाढविण्यासाठी वापरलेच नाहीत. कारण त्यांचा जुनाच माल विकला गेलेला नाही. जेव्हा लोकांच्या मनातून दोन नंबरचा पैसा पाप असतो, याचे ओझे संपून जाईल तेव्हा ते पैसे बँकेत ठेवतील किंवा त्यांचे जिवनमान सुधारण्यासाठी वस्तू खरेदी करतील. त्यांच्याकडे पैसा आहे पण तो 1 नंबरचा नाहीय, अशी पोस्ट त्यांनी केली आहे. 

हे सांगताना त्यांनी अर्थमंत्र्यांना नाराज होऊ नकात, अशी विनंतीही केली आहे. जेव्हा दोन नंबरचा पैसा संपेल तेव्हा विक्री वाढल्याने उद्योजक अधिक माल उत्पादन करतील. यामुळे आयकरच रद्द करावा, असे दास यांनी म्हटले आहे.

डॉ. राधा मोहन दास अग्रवाल हे उत्तर प्रदेश विधानसभेत भाजपालाच, सरकारी अधिकाऱ्यांनाच कधी कधी अडचणीत आणतात. गोरखपूरमध्ये भूमिगत वीजतारा टाकण्यातील भ्रष्टाचार उकरून काढत त्यांनी भाजपाच्या आमदाराची कंपनी काळ्या यादीत टाकायला लावली होती. 

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनBJPभाजपाblack moneyब्लॅक मनीUttar Pradeshउत्तर प्रदेश