शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

भाजपा आमदाराने केंद्रीय अर्थमंत्र्यांना सुचविला भन्नाट तोडगा; म्हणाला काळा पैसाच संपून जाईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 14:19 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा संपविण्याची मोहिम उघडली होती. 2014 लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी आघाडी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना स्विस बँकांमधील काळा पैसा भारतात आणून प्रत्येक नागरिकाच्या खात्यात 15 लाख रुपये टाकण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर दोन वर्षांनी नोटाबंदी केली होती.

गोरखपूर : जीएसटीमुळे महसुलात घट झाल्याने देशाच्या तिजोरीमध्ये खडखडाट जाणवू लागला आहे. यामुळे केंद्र सरकारने आरबीआयकडून पैसे घेतानाच भारत पेट्रोलियम सारख्या कंपन्याही विकायला काढल्या आहेत. यामुळे पेशाने डॉक्टर असलेल्या गोरखपूरच्या भाजपा आमदाराने होमिओपथिक औषधच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना सुचविले आहे. त्यांनी फेसबुकवर हा उपाय पोस्ट केला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा संपविण्याची मोहिम उघडली होती. 2014 लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी आघाडी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना स्विस बँकांमधील काळा पैसा भारतात आणून प्रत्येक नागरिकाच्या खात्यात 15 लाख रुपये टाकण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर दोन वर्षांनी नोटाबंदी केली होती. आता हे दोन्ही प्रयत्न फोल ठरले आहेत. त्यातच वर्षभरानंतर जीएसटी लागू केल्याने भारतीय अर्थव्यस्थेचे कंबरडे मोडल्याचा आरोप विरोधक करत आहेत. देशातील आर्थिक मंदीवर केंद्र सरकारला उपाय सापडत नसताना गोरखपूरचे भाजपा आमदार डॉ. राधा मोहन दास अग्रवाल यांनी आयकरच बंद करण्याचा उपाय सुचविला आहे. 

आज आर्थिक मंदीचे मूळ कारण मागणीत घट झाली हे आहे. बाजारात खरेदीची संख्या जोपर्यंत वाढत नाही, उत्पादक माल कोणासाठी बनविणार? तो त्याचे पैसे माल बनविण्याऐवजी शेअर बाजारात गुंतवेल, आणि हेच झाले आहे. आम्ही जेवढे पैसे त्यांना मदतीसाठी दिले ते त्यांनी उत्पादन वाढविण्यासाठी वापरलेच नाहीत. कारण त्यांचा जुनाच माल विकला गेलेला नाही. जेव्हा लोकांच्या मनातून दोन नंबरचा पैसा पाप असतो, याचे ओझे संपून जाईल तेव्हा ते पैसे बँकेत ठेवतील किंवा त्यांचे जिवनमान सुधारण्यासाठी वस्तू खरेदी करतील. त्यांच्याकडे पैसा आहे पण तो 1 नंबरचा नाहीय, अशी पोस्ट त्यांनी केली आहे. 

हे सांगताना त्यांनी अर्थमंत्र्यांना नाराज होऊ नकात, अशी विनंतीही केली आहे. जेव्हा दोन नंबरचा पैसा संपेल तेव्हा विक्री वाढल्याने उद्योजक अधिक माल उत्पादन करतील. यामुळे आयकरच रद्द करावा, असे दास यांनी म्हटले आहे.

डॉ. राधा मोहन दास अग्रवाल हे उत्तर प्रदेश विधानसभेत भाजपालाच, सरकारी अधिकाऱ्यांनाच कधी कधी अडचणीत आणतात. गोरखपूरमध्ये भूमिगत वीजतारा टाकण्यातील भ्रष्टाचार उकरून काढत त्यांनी भाजपाच्या आमदाराची कंपनी काळ्या यादीत टाकायला लावली होती. 

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनBJPभाजपाblack moneyब्लॅक मनीUttar Pradeshउत्तर प्रदेश