शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

"कोण चालवतय महाराष्ट्राचा शो? राज्यात महाविकास अघाडी नव्हे, महावसुली सरकार चाललंय!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 18:00 IST

प्रसाद म्हणाले, राज्याच्या गृहमंत्र्यांनी मुंबईतून महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट निश्चित केले आहे, असे एखाद्या माजी पोलीस आयुक्ताने लिहिने, हे भारताच्या इतिहासात,  पहिल्यांदाच घडले आहे. (Parambir Singh)

नवी दिल्ली/मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh Letter) यांच्या पत्राने महाराष्ट्राचे राजकारण पार ढवळून निघाले आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद (Ravishankar Prasad) यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर झालेल्या 100 कोटी रुपयांच्या वसूलीच्या आरोपावरून उद्धव ठाकरे सरकारला घेरले आहे. याच वेळी, अखेर महाराष्ट्राचा शो चालवतंय कोण? असा सवाल करत, राज्यात महाविकास अघाडी नव्हे, तर महावसुली सरकार चालवले जात आहे, असेही प्रसाद यांनी म्हटले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. (BJP minister Ravishankar Prasad questions Maharashtra government over Anil Deshmukh corruption charges)

"शरद पवार आणि गृहमंत्र्यांनी कितीही प्रयत्न केला, तरी सत्य समोर येणार; ‘दूध का दूध, पानी का पानी’ होणार"!

प्रसाद म्हणाले, 'राज्याच्या गृहमंत्र्यांनी मुंबईतून महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट निश्चित केले आहे, असे एखाद्या माजी पोलीस आयुक्ताने लिहिने, हे भारताच्या इतिहासात,  पहिल्यांदाच घडले आहे. जर एका मंत्र्याचे टार्गेट 100 कोटी रुपये आहे, तर इतर मंत्र्यांचे किती असेल?' असा सवाल करत प्रसाद म्हणाले, शरद पवारांनीअनिल देशमुखांचा बचाव केला आहे. जो खोटा ठरला. जर पवारांना त्यांची विश्वसनियता सिद्ध करायची इच्छा असेल तर, त्यांनी देशमुखांचा राजीनामा घ्यावा.

'यापूर्वी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काही दस्तऐवजांच्या आधारे, बदली आणि पोस्टिंगच्या नावावर वसुली सुरू होती. तीही छोट्या-मोठ्या अधिकाऱ्याचीच नव्हे तर मोठ-मोठ्या आयपीएस अधिकाऱ्यांची,' असेही प्रसाद म्हणाले.

15 फेब्रुवारीला अनिल देशमुख आयसोलेट नव्हते, मग काय करत होते? फडणवीसांनी केला मोठा गौप्यस्फोट

उद्धव ठाकरेंवर निशाणा -रविशंकर प्रसाद म्हणाले, 'मुख्यमंत्री ठाकरे यावर कारवाई करतील, अशी आशा होती. मात्र, असे होताना दिसत नाही. दोषींवर कारवाई करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी रश्मी शुक्ला यांची बदली केली. यावेळी प्रसाद यांनी महाविकास अघाडी सरकारला प्रश्नही केला आहे, की ही कथित वसुली सरकारसाठी होती, की आघाडीतील पक्षांसाठी (शिवसेना, एनसीपी आणि काँग्रेस) होती.

शरद पवार आणि गृहमंत्र्यांनी कितीही प्रयत्न केला, तरी सत्य समोर येणार -भाजप खासदार गिरीश बापट यांनीही गृहमंत्री देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सत्य दडवण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी ते शक्य नाही. कारण प्रसारमाध्यमे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून ही सर्व माहिती समोर येईल. येत्या काळात ‘दूध का दूध, पानी का पानी’ होईल. देवेंद्र फडणवीस यांचे मुंबईत बसून सर्व गोष्टींवर लक्ष आहे. महाराष्ट्रात भ्रष्टाचार आणि दुराचार बोकाळला आहे. माणसे बदलली तरी वृत्ती बदलत नाही. राज्यात सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून खंडणी वसूल करणे योग्य नाही. हे गंभीर आहे. यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्यात यावी, अशी मागणीही बापट यांनी केली आहे.

'क्वारन्टाइन'वरून अनिल देशमुख अडचणीत; १५ फेब्रुवारीच्या 'त्या' नागपूर-मुंबई विमान प्रवासावर दिलं 'स्पष्टीकरण'

टॅग्स :Ravi Shankar Prasadरविशंकर प्रसादSharad Pawarशरद पवारAnil Deshmukhअनिल देशमुखUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसParam Bir Singhपरम बीर सिंग