शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
3
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
4
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
5
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
6
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
7
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
9
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
10
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
11
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
12
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
13
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
14
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
15
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
16
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
17
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
18
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
19
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
20
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी

"कोण चालवतय महाराष्ट्राचा शो? राज्यात महाविकास अघाडी नव्हे, महावसुली सरकार चाललंय!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 18:00 IST

प्रसाद म्हणाले, राज्याच्या गृहमंत्र्यांनी मुंबईतून महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट निश्चित केले आहे, असे एखाद्या माजी पोलीस आयुक्ताने लिहिने, हे भारताच्या इतिहासात,  पहिल्यांदाच घडले आहे. (Parambir Singh)

नवी दिल्ली/मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh Letter) यांच्या पत्राने महाराष्ट्राचे राजकारण पार ढवळून निघाले आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद (Ravishankar Prasad) यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर झालेल्या 100 कोटी रुपयांच्या वसूलीच्या आरोपावरून उद्धव ठाकरे सरकारला घेरले आहे. याच वेळी, अखेर महाराष्ट्राचा शो चालवतंय कोण? असा सवाल करत, राज्यात महाविकास अघाडी नव्हे, तर महावसुली सरकार चालवले जात आहे, असेही प्रसाद यांनी म्हटले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. (BJP minister Ravishankar Prasad questions Maharashtra government over Anil Deshmukh corruption charges)

"शरद पवार आणि गृहमंत्र्यांनी कितीही प्रयत्न केला, तरी सत्य समोर येणार; ‘दूध का दूध, पानी का पानी’ होणार"!

प्रसाद म्हणाले, 'राज्याच्या गृहमंत्र्यांनी मुंबईतून महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट निश्चित केले आहे, असे एखाद्या माजी पोलीस आयुक्ताने लिहिने, हे भारताच्या इतिहासात,  पहिल्यांदाच घडले आहे. जर एका मंत्र्याचे टार्गेट 100 कोटी रुपये आहे, तर इतर मंत्र्यांचे किती असेल?' असा सवाल करत प्रसाद म्हणाले, शरद पवारांनीअनिल देशमुखांचा बचाव केला आहे. जो खोटा ठरला. जर पवारांना त्यांची विश्वसनियता सिद्ध करायची इच्छा असेल तर, त्यांनी देशमुखांचा राजीनामा घ्यावा.

'यापूर्वी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काही दस्तऐवजांच्या आधारे, बदली आणि पोस्टिंगच्या नावावर वसुली सुरू होती. तीही छोट्या-मोठ्या अधिकाऱ्याचीच नव्हे तर मोठ-मोठ्या आयपीएस अधिकाऱ्यांची,' असेही प्रसाद म्हणाले.

15 फेब्रुवारीला अनिल देशमुख आयसोलेट नव्हते, मग काय करत होते? फडणवीसांनी केला मोठा गौप्यस्फोट

उद्धव ठाकरेंवर निशाणा -रविशंकर प्रसाद म्हणाले, 'मुख्यमंत्री ठाकरे यावर कारवाई करतील, अशी आशा होती. मात्र, असे होताना दिसत नाही. दोषींवर कारवाई करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी रश्मी शुक्ला यांची बदली केली. यावेळी प्रसाद यांनी महाविकास अघाडी सरकारला प्रश्नही केला आहे, की ही कथित वसुली सरकारसाठी होती, की आघाडीतील पक्षांसाठी (शिवसेना, एनसीपी आणि काँग्रेस) होती.

शरद पवार आणि गृहमंत्र्यांनी कितीही प्रयत्न केला, तरी सत्य समोर येणार -भाजप खासदार गिरीश बापट यांनीही गृहमंत्री देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सत्य दडवण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी ते शक्य नाही. कारण प्रसारमाध्यमे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून ही सर्व माहिती समोर येईल. येत्या काळात ‘दूध का दूध, पानी का पानी’ होईल. देवेंद्र फडणवीस यांचे मुंबईत बसून सर्व गोष्टींवर लक्ष आहे. महाराष्ट्रात भ्रष्टाचार आणि दुराचार बोकाळला आहे. माणसे बदलली तरी वृत्ती बदलत नाही. राज्यात सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून खंडणी वसूल करणे योग्य नाही. हे गंभीर आहे. यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्यात यावी, अशी मागणीही बापट यांनी केली आहे.

'क्वारन्टाइन'वरून अनिल देशमुख अडचणीत; १५ फेब्रुवारीच्या 'त्या' नागपूर-मुंबई विमान प्रवासावर दिलं 'स्पष्टीकरण'

टॅग्स :Ravi Shankar Prasadरविशंकर प्रसादSharad Pawarशरद पवारAnil Deshmukhअनिल देशमुखUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसParam Bir Singhपरम बीर सिंग