शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Video - 'दहशतवाद हा त्याग, तपस्या आणि बलिदानाचं प्रतिक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 13:22 IST

लोकसभा निवडणुकीदरम्यान मध्य प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत भाजपाच्या एका नेत्याची जीभ घसरली आहे. भाजपाचे मध्य प्रदेशमधील अध्यक्ष राकेश सिंह बुधवारी प्रचारसभेत दहशतवाद हा त्याग, तपस्या आणि बलिदानाचं प्रतिक असल्याचं म्हटले आहे. 

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीदरम्यान मध्य प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत भाजपाच्या एका नेत्याची जीभ घसरली आहे. भाजपाचे मध्य प्रदेशमधील अध्यक्ष राकेश सिंह बुधवारी प्रचारसभेत दहशतवाद हा त्याग, तपस्या आणि बलिदानाचं प्रतिक असल्याचं म्हटले आहे.  भाषण करत असताना त्यांची जीभ घसरली व ते भगव्या ऐवजी दहशतवाद बोलून चुकले.

नवी दिल्ली -  राजकीय पक्षांच्या प्रचाराची रंगत वाढत चालली आहे. प्रचारसभांमधून अनेक नेते एकमेकांवर घणाघाती टीका करताना पाहायला मिळत आहेत. तर अनेक ठिकाणी नेते मंडळी वादग्रस्त वक्तव्य करतं आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान मध्य प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत भाजपाच्या एका नेत्याची जीभ घसरली आहे. भाजपाचे मध्य प्रदेशमधील अध्यक्ष राकेश सिंह यांनी बुधवारी (24 एप्रिल) एका प्रचारसभेत दहशतवाद हा त्याग, तपस्या आणि बलिदानाचं प्रतिक असल्याचं म्हटलं आहे. 

राकेश सिंह यांना भगवा म्हणायचे होते. मात्र भाषण करत असताना त्यांची जीभ घसरली व ते भगव्या ऐवजी दहशतवाद बोलून चुकले. भाजपाच्या भोपाळच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी दिल्यानंतर विरोधकांनी त्यांना दहशतवादी म्हटले होते. त्यांच्या टीकेला उत्तर देताना राकेश सिंह यांची जीभ घसरली. 'भगवा कधीही दहशतवाद होऊ शकत नाही. भगवा धारण करणारी व्यक्ती कधीही दहशतवादी होऊ शकत नाही. दहशतवाद हा  प्रेम, तपस्या आणि बलिदानाचे प्रतिक आहे.’ असे वक्तव्य राकेश सिंह यांनी केले आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

... तर तुमचं बोट सलामत राहणार नाही, केंद्रीय मंत्र्याची धमकी

केंद्रीयमंत्री मनोज सिन्हा यांनी भाजपाच्या प्रचारसभेत बोलताना काही दिवसांपूर्वी विरोधकांना थेट धमकी दिली  होती. भाजपा कार्यकर्त्यांनाकडे बोट दाखवल्यास पुढील 4 तासांत तुमचं बोट (सलामत) जागेवर राहणार नाही, अशी सज्जड दमच सिन्हा यांनी दिला होता. गाझीपूरमधील सदीपुरा येथील किसान पंचायत संमेलनात भाषण करताना सिन्हा यांनी धमकी दिला होता. भाजपा नेते आणि कार्यकर्ते भ्रष्ट्राचार आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीतून तयार होणाऱ्या पैशाचा नायनाट करण्यास सक्षम आहेत. पूर्वांचलमधील कुणीही गुन्हेगार, कुणाचीही लायकी नाही की गाझीपूर येथे येऊन भाजपा कार्यकर्त्यांकडे बोट दाखवावे. तसे केल्यास त्यांचे बोट सलामत राहणार नसल्याचे सिन्हा यांनी म्हटले होते. सिन्हा यांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला होता. 

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना खोट्या आरोपाखाली फसविले - अमित शहा  

मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी भोपाळ लोकसभा मतदार संघातील भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर टीका होत आहे. मात्र, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा बचाव करण्यासाठी भाजपा अध्यक्ष अमित शहा सरसावले होते. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना खोट्या आरोपाखाली फसविले आहे, असा अमित शहा यांनी म्हटले होते. हिंदू दहशतवादाच्या नावाने एक बोगस केस तयार करण्यात आली. जगात देशाच्या संस्कृतीची बदनामी करण्यात आली. कोर्टात खटला चालल्यानंतर तो बोगस असल्याचे स्पष्ट झाले, असे अमित शहा म्हणाले. तसेच, स्वामी असीमानंद आणि अन्य लोकांवर खोट्या आरोपांखाली गुन्हे नोंद झाले. समझौता एक्स्प्रेसमध्ये स्फोट करणारे लोक कुठे आहेत. ज्या लोकांना पकडले त्यांना का सोडले, असे सवाल अमित शहा यांनी उपस्थित केले होते. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाTerrorismदहशतवाद