शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

Video - 'दहशतवाद हा त्याग, तपस्या आणि बलिदानाचं प्रतिक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 13:22 IST

लोकसभा निवडणुकीदरम्यान मध्य प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत भाजपाच्या एका नेत्याची जीभ घसरली आहे. भाजपाचे मध्य प्रदेशमधील अध्यक्ष राकेश सिंह बुधवारी प्रचारसभेत दहशतवाद हा त्याग, तपस्या आणि बलिदानाचं प्रतिक असल्याचं म्हटले आहे. 

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीदरम्यान मध्य प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत भाजपाच्या एका नेत्याची जीभ घसरली आहे. भाजपाचे मध्य प्रदेशमधील अध्यक्ष राकेश सिंह बुधवारी प्रचारसभेत दहशतवाद हा त्याग, तपस्या आणि बलिदानाचं प्रतिक असल्याचं म्हटले आहे.  भाषण करत असताना त्यांची जीभ घसरली व ते भगव्या ऐवजी दहशतवाद बोलून चुकले.

नवी दिल्ली -  राजकीय पक्षांच्या प्रचाराची रंगत वाढत चालली आहे. प्रचारसभांमधून अनेक नेते एकमेकांवर घणाघाती टीका करताना पाहायला मिळत आहेत. तर अनेक ठिकाणी नेते मंडळी वादग्रस्त वक्तव्य करतं आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान मध्य प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत भाजपाच्या एका नेत्याची जीभ घसरली आहे. भाजपाचे मध्य प्रदेशमधील अध्यक्ष राकेश सिंह यांनी बुधवारी (24 एप्रिल) एका प्रचारसभेत दहशतवाद हा त्याग, तपस्या आणि बलिदानाचं प्रतिक असल्याचं म्हटलं आहे. 

राकेश सिंह यांना भगवा म्हणायचे होते. मात्र भाषण करत असताना त्यांची जीभ घसरली व ते भगव्या ऐवजी दहशतवाद बोलून चुकले. भाजपाच्या भोपाळच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी दिल्यानंतर विरोधकांनी त्यांना दहशतवादी म्हटले होते. त्यांच्या टीकेला उत्तर देताना राकेश सिंह यांची जीभ घसरली. 'भगवा कधीही दहशतवाद होऊ शकत नाही. भगवा धारण करणारी व्यक्ती कधीही दहशतवादी होऊ शकत नाही. दहशतवाद हा  प्रेम, तपस्या आणि बलिदानाचे प्रतिक आहे.’ असे वक्तव्य राकेश सिंह यांनी केले आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

... तर तुमचं बोट सलामत राहणार नाही, केंद्रीय मंत्र्याची धमकी

केंद्रीयमंत्री मनोज सिन्हा यांनी भाजपाच्या प्रचारसभेत बोलताना काही दिवसांपूर्वी विरोधकांना थेट धमकी दिली  होती. भाजपा कार्यकर्त्यांनाकडे बोट दाखवल्यास पुढील 4 तासांत तुमचं बोट (सलामत) जागेवर राहणार नाही, अशी सज्जड दमच सिन्हा यांनी दिला होता. गाझीपूरमधील सदीपुरा येथील किसान पंचायत संमेलनात भाषण करताना सिन्हा यांनी धमकी दिला होता. भाजपा नेते आणि कार्यकर्ते भ्रष्ट्राचार आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीतून तयार होणाऱ्या पैशाचा नायनाट करण्यास सक्षम आहेत. पूर्वांचलमधील कुणीही गुन्हेगार, कुणाचीही लायकी नाही की गाझीपूर येथे येऊन भाजपा कार्यकर्त्यांकडे बोट दाखवावे. तसे केल्यास त्यांचे बोट सलामत राहणार नसल्याचे सिन्हा यांनी म्हटले होते. सिन्हा यांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला होता. 

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना खोट्या आरोपाखाली फसविले - अमित शहा  

मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी भोपाळ लोकसभा मतदार संघातील भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर टीका होत आहे. मात्र, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा बचाव करण्यासाठी भाजपा अध्यक्ष अमित शहा सरसावले होते. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना खोट्या आरोपाखाली फसविले आहे, असा अमित शहा यांनी म्हटले होते. हिंदू दहशतवादाच्या नावाने एक बोगस केस तयार करण्यात आली. जगात देशाच्या संस्कृतीची बदनामी करण्यात आली. कोर्टात खटला चालल्यानंतर तो बोगस असल्याचे स्पष्ट झाले, असे अमित शहा म्हणाले. तसेच, स्वामी असीमानंद आणि अन्य लोकांवर खोट्या आरोपांखाली गुन्हे नोंद झाले. समझौता एक्स्प्रेसमध्ये स्फोट करणारे लोक कुठे आहेत. ज्या लोकांना पकडले त्यांना का सोडले, असे सवाल अमित शहा यांनी उपस्थित केले होते. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाTerrorismदहशतवाद