शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

"गांधी कुटुंबाने माझ्याविरोधात निवडणूक लढवून ३ लाख मतं मिळवावीत, मी राजकारणातून संन्यास घेईन"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 13:19 IST

Dinesh Pratap Singh: संपूर्ण गांधी कुटुंबाला 'पलायनवादी' असं म्हणत खुले आव्हानही दिनेश प्रताप सिंह यांनी दिले आहे.

Dinesh Pratap Singh:काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वायनाडमधून लोकसभेची पोटनिवडणूक लढवणार आहेत. त्यांची ही पहिलीच निवडणूक असणार आहे. यावरून उत्तर प्रदेश सरकारचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) दिनेश प्रताप सिंह यांनी प्रियांका गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच, संपूर्ण गांधी कुटुंबाला 'पलायनवादी' असं म्हणत खुले आव्हानही दिनेश प्रताप सिंह यांनी दिले आहे.

"मी या सर्व गांधींना रायबरेलीमध्ये आमंत्रित करतो, जेव्हा त्यांना वाटेल, तेव्हा पंजाचे चिन्ह घेऊन काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून माझ्याविरोधात निवडणूक लढवावी आणि तीन लाख मते मिळवावी. मी राजकारणातून संन्यास घेईन", असे दिनेश सिंह यांनी एका खुल्या पत्राद्वारे गांधी कुटुंबाला आव्हान दिले आहे. 

राज्यमंत्र्यांनी गुरुवारी एक पत्र जारी करून म्हटले आहे की, माझ्यासाठी भारतीय संस्कार आणि संस्कृती असलेली भारतातील प्रत्येक महिला माता भगवती सारखी आहे, परंतु मी प्रियांका गांधी यांचे राहणीमान, आचरण, खाण्याच्या सवयी वगैरे मला भारतीय संस्कृतीला अनुसरून वाटत नाहीत. तसेच, प्रियांका गांधी या केवळ पराभवाच्या भीतीने रायबरेलीतून निवडणूक लढवत नाहीत. हे जरी खरे असले तरी, त्या केवळ वायनाडमधूनच निवडणूक का लढवणार आहेत? कोणाला होणारा विरोध त्यांना वायनाडला घेऊन जात आहे, हे काचेप्रमाणे स्पष्ट आहे. त्यामुळे असा सवाल उपस्थित होत आहे. 

याचबरोबर, 'गांधी' कुटुंब पलायनवादी आहेत, हे खरं आहे. जोपर्यंत सोनिया गांधींना अमेठी आणि रायबरेलीतून अन्नधान्याचा पुरवठा होत होता, तोपर्यंत त्या अमेठी आणि रायबरेलीतच राहिल्या, जेव्हा त्यांना पराभव दिसून येत होता, तेव्हा त्या राजस्थानला पळून गेल्या. तसेच, राहुल गांधी आधी अमेठी सोडून वायनाडल गेले, त्यानंतर त्यांनी रायबरेलीसाठी वायनाड सोडले आणि आता प्रियांका गांधी आपले घर, सासर, रायबरेली, अमेठी सोडून वायनाडला जात आहेत. त्याचप्रमाणे हरल्यानंतर इंदिरा गांधीही रायबरेली सोडून मेडकला (आंध्र प्रदेश) गेल्या होत्या, त्यामुळे असा सवाल उपस्थित होत आहे, असे दिनेश प्रताप सिंह यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीUttar Pradeshउत्तर प्रदेशRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस