शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

...तर पुढील वर्षीच मोदी सरकारला जोरदार धक्का; एक निवडणूक ठरणार हुकूमाचा एक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 18:41 IST

विरोधकांचं बैठकांचं सत्र सुरू; निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर गांधी कुटुंबाच्या भेटीला; शरद पवारदेखील सक्रीय

नवी दिल्ली: पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं सत्ताधारी भाजपला मोठा झटका देण्याची तयारी काँग्रेसनं सुरू केल्याचं दिसत आहे. त्यासाठी दिल्लीत जोरदार हालचाली सुरू आहेत. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी कालच गांधी कुटुंबाची भेट घेतली. त्याआधी महिन्याभरात ते तीनदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना भेटले आहेत. त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शरद पवार विरोधकांचे उमेदवार असू शकतात अशी चर्चा सुरू झाली. मात्र खुद्द शरद पवारांनी आपण राष्ट्रपतीपदासाठी उत्सुक नसल्याचं सांगितलं आहे.

एखाद्या निवडणुकीत विजयी होण्याची खात्री नसेल तर ती निवडणूक शरद पवार लढत नाहीत, असं म्हटलं जातं. त्यामुळेच राष्ट्रपतीपदाची निवडणूक विरोधकांसाठी अधिक आव्हानात्मक असल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आमदार, खासदारांची मतं विचारात घेतली जातात. त्यातही प्रत्येक राज्यातील आमदार, खासदारांच्या मतांचं मूल्य वेगळं असतं. हे मूल्य लोकसंख्येनुसार ठरतं. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपला धक्का द्यायचं असल्यास उत्तर प्रदेशची निवडणूक हुकूमाचा एक्का ठरू शकते.राष्ट्रपती पदाबद्दल शरद पवारांचं मोठं विधान; प्रशांत किशोर यांच्या भेटीबद्दलही स्पष्टच बोलले

मतांचं गणित नेमकं काय?राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एकूण १० लाख ९८ हजार ९०३ मतं आहेत. निवडणूक जिंकण्यासाठीचा जादुई आकडा ५ लाख ४९ हजार ४५२ इतका आहे. सध्या भाजपकडे ४ लाख ७४ हजार मतं आहेत. उर्वरित मतांसाठी भाजपला मित्रपक्षांची गरज लागेल. त्यासाठी बिजू जनता दल, एआयडीएमके, टीआरएस, वायएसआर काँग्रेस भाजपला मदत करू शकतात. तशी मदत या पक्षांनी याआधी मोदी सरकारला केली आहे.

उत्तर प्रदेशातील निवडणूक चित्र बदलणार?२०२२ मध्ये उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक होईल. गेल्या निवडणुकीत भाजपनं राज्यात तीनशेहून अधिक जागा जिंकल्या. पुढील वर्षी निवडणुकीत राज्यात भाजपला मोठा फटका बसल्यास राष्ट्रपतीपदाची निवडणूक भाजपासाठी आव्हानात्मक असेल. लोकसंख्या जास्त असल्यानं उत्तर प्रदेशातील आमदारांचं मूल्य अधिक आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपला नुकसान सहन करावं लागल्यास त्याचा परिणाम राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत दिसेल.

शिवसेना आणि मित्रपक्षांची साथ सोडल्याचा काय परिणाम?शिवसेना आणि शिरोमणी अकाली दल या दोन जुन्या मित्रपक्षांनी भाजपची साथ सोडली आहे. गेल्या निवडणुकीत हे दोन्ही पक्ष भाजपसोबत होते. २०१६ मध्ये झालेल्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत रामनाथ कोविंद यांना ६५ टक्के मतं मिळाली. यातील ४० टक्के मतं भाजपची होती. शिवसेनेचे खासदार आणि आमदार यांची संख्या लक्षात घेता निवडणुकीतील त्यांच्या मतांचा प्रभाव दोन ते अडीच टक्क्यांच्या आसपास आहे. अकाली दलाचीही स्थिती सारखीच आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या निवडणूक निकालावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSharad Pawarशरद पवारUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाShiv SenaशिवसेनाPrashant Kishoreप्रशांत किशोरcongressकाँग्रेस