शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मनात भीती, अनिल देशमुखांवर कारवाई केली तर...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 16:04 IST

Param Bir Singh Letter: या एकूण प्रकरणांचे देशभरात पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. सोमवारी लोकसभेतही यावर गदारोळ झाला. भाजपकडून नवनवीन गोष्टींचे दावे आणि खुलासे करण्यात येत आहेत.

ठळक मुद्देपरमबीर सिंग पत्र प्रकरणाचे देशभरात पडसादपरमबीर सिंग पत्र प्रकरणावर भाजपचे नवे दावेदेवेंद्र फडणवीस केंद्रीय गृहसचिवांना भेटणार

नवी दिल्ली :सचिन वाझे प्रकरण, (Sachin Vaze Case) परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर धक्कादायक आरोप करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिलेले पत्र (Param Bir Singh Letter) या एकूण प्रकरणांचे देशभरात पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. सोमवारी लोकसभेतही यावर गदारोळ झाला. भाजपकडून नवनवीन गोष्टींचे दावे आणि खुलासे करण्यात येत आहेत. अशातच भाजप खासदार सुशील कुमार मोदी यांनी आता नवा धक्कादायक दावा केला आहे. (bjp leader sushil kumar modi react on param bir singh letter) 

परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर व धक्कादायक आरोप केले आहेत. तसेच परमबीर सिंग यांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. १३० पानी याचिकेत परमबीर सिंग यांनी आणखीन नवे दावे केले आहेत. परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर नवनवीन दावे, खुलासे होऊनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर एक चकार शब्दही बोललेले नाहीत, यावरूनही विरोधकांनी टीका केली आहे. सुशील कुमार मोदी यांनीही याच मुद्द्यावरून मोठा दावा केला आहे. 

काय म्हणतात सुशील कुमार मोदी?

अराजकता पसरल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे.  संपूर्ण महाविकास आघाडी सरकार अनिल देशमुख यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख यांच्यावर कारवाई केली, तर ते अशी एखादी गोष्ट बोलतील, ज्यामुळे संपूर्ण सरकार अडचणीत येईल, अशी भीती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मनात आहे, असा दावा मोदी यांनी केला आहे. 

अनिल देशमुखांच्या दुकानदारीचे वस्त्रहरण, तर १०० कोटीत प्रत्येकाचा वाटा; भाजप नेत्याचा टोला

देवेंद्र फडणवीस केंद्रीय गृहसचिवांना भेटणार

भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन फोन टॅपिंग प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. पोलीस खात्यांमधील बदल्यासंदर्भातील घोटाळ्याचे पुरावे असतानाही कोणतीही कारवाई मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी केली नाही, असा आरोप करत देवेंद्र फडणवीस यांनी आता हे सर्व पुरावे केंद्रीय गृह सचिवांकडे देऊन CBI चौकशीची मागणी करणार असल्याचे म्हटले आहे. 

सत्ता जाणे हीच भाजपची दुखरी नस, आम्हाला नैतिकता शिकवू नये; शिवसेनेचा पलटवार

दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला बार, रेस्तराँ आणि अन्य आस्थापनांमधून १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा धक्कादायक आरोप त्यांनी या पत्रातून केला आहे. भाजपाने या मुद्यावर आक्रमक भूमिका घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. तर नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भाजपसह रिपाइं, वंचित बहुजन आघाडी आणि अन्य पक्षांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी आग्रही मागणी केली आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणUddhav Thackerayउद्धव ठाकरेParam Bir Singhपरम बीर सिंगsachin Vazeसचिन वाझेAnil Deshmukhअनिल देशमुख