शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
2
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
3
Nashik: "...शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन"; मुंबईत विवाहित मैत्रिणीचे व्हिडीओ काढले, घरी जाऊन केला बलात्कार
4
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान
5
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
6
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
7
"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग
8
"पत्नीची हत्या, १३ वर्षांचा कारावास भोगला; बाहेर येताच त्याने..."; आरोपीचे कारनामे कळल्यावर पोलिसही अवाक्
9
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
10
ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले...
11
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
12
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू
13
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
14
मोदींचा ‘तो’ फोटो शेअर करणाऱ्या मामा पगारेंना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतलं खांद्यावर, केला सत्कार
15
"सत्याने प्रेरीत पण...", 'बॅड्स ऑफ..' वादावर आर्यन खाननं सोडलं मौन; समीर वानखेडे प्रकरणावर म्हणाला...
16
धंगेकरांनी पक्षांतर केले याचे त्यांना भान नाही, ते विसरले आहेत; अजितदादांनी घेतला धंगेकरांचा समाचार
17
पश्चिम बंगाल पुन्हा 'आरजी कर'सारखी घटना; MBBS च्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार...
18
'कबुतरांमुळे महायुतीचं सरकार जाईल', शांतीदूत जनकल्याण पार्टी लढवणार मुंबई महापालिका निवडणूक; जैन मुनींनी केली घोषणा
19
IND vs WI 2nd Test Day 2 Stumps: टीम इंडिया पुन्हा तिसऱ्या दिवशीच कॅरेबियन पाहुण्यांचा 'करेक्ट कार्यक्रम' करणार?
20
Diwali Astro 2025: दिवाळीच्या प्रकाशपर्वात भाग्य उजळणार! राशीनुसार पहा आनंद आणि ऐश्वर्य योग!

लवकरच पंतप्रधान मोदी इम्रान खानसोबत लंडनमध्ये भोजन करतील: भाजप खासदाराचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 12:45 IST

भारत आणि पाकिस्तानमधील व्यापार सुरू होणार असल्याचे म्हटले जात होते. यावरून आता भाजप खासदाराने टोला लगावला आहे.

ठळक मुद्देसुब्रमण्यम स्वामींचा भाजपला घरचा अहेरकाश्मीर व पाकिस्तानबाबतच्या धोरणावर नाराजीलवकरच पंतप्रधान मोदी इम्रान खानसोबत लंडनमध्ये भोजन करतील - स्वामी

नवी दिल्ली: पाकव्याप्त काश्मीर (POK) भारताचाच भाग असून, तो पुन्हा मिळवण्याकरिता प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले जात होते. जम्मू-काश्मीरचे अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर भारत पाकव्याप्त काश्मीरकडे वळवणार असल्याच्या जोरदार चर्चा होत्या. अलीकडेच भारत आणि पाकिस्तानमधील व्यापार सुरू होणार असल्याचे म्हटले जात होते. यावरून आता भाजप खासदाराने टोला लगावला असून, काही दिवसांतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचेपंतप्रधानइम्रान खान लंडनमध्ये सहभोजनाचा आस्वाद घेताना दिसतील, अशी टीका करण्यात आली आहे. (subramanian swamy criticised pm narendra modi)

गेल्या काही दिवसांपासून खासदार स्वामी वारंवार पंतप्रधान मोदी आणि भाजपवर निशाणा साधत आहेत. पाकिस्तानसंदर्भात भारत सरकारच्या धोरणावरून स्वामी यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. एका ट्विटर युझरने काश्मीर प्रश्नी सुब्रमण्यम स्वामींना टॅग केले. त्यावर उत्तर देताना स्वामी यांनी सदर टीका केली आहे. 

“फक्त RSS वाले तेवढे देशभक्त आणि बाकी सगळे देशद्रोही बनलेत”

काय म्हणाले सुब्रमण्यम स्वामी

काश्मीर प्रश्नी शरणागती पत्करली आहे. पीओके आता विसरा. मला खात्री आहे की, काही दिवसांतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान लंडनमध्ये सहभोजनाचा आस्वाद घेताना दिसतील, अशी प्रतिक्रियेचे ट्विट स्वामी यांनी केले आहे. 

POK वर ताबा मिळवणे विसरा

एका ट्विटर युझरने एका मीडिया रिपोर्टचा हवाला देत स्वामी यांना टॅग करत भारत आणि पाकिस्तानमधील सध्याच्या संबंधांवर समाधानी आहात का, अशी विचारणा केली. यावर उत्तर देताना  POK वर ताबा मिळवणे आणि बलुचिस्तान स्वतंत्र्य करणे, हे आता विसरून गेले पाहिजे, असे उत्तर स्वामी यांनी दिले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या युद्धाभ्यासावर स्वामी नाखुश असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे स्वामी यांनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधल्याचे पाहायला मिळत आहे. 

“POK वर ताबा मिळवणे आणि बलुचिस्तान स्वतंत्र्य करणे, हे आता विसरून जा”

दरम्यान, आर्थिक संकटाच्या खाईत असलेला देश आणि वाढत्या महागाईचे संकट आणि मरणासन्न अवस्थेत असलेल्या उद्योगांना वाचवण्यासाठी पाकिस्तान सरकार पुन्हा एकदा भारतासोबत व्यापार सुरू करण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले होते. जम्मू-काश्मीरसह दोन्ही देशांमध्ये प्रलंबित असेलल्या अनेक मुद्यांवर तोडगा काढण्यासाठी परिणामकारक चर्चेसाठी अनुकूल वातावरण निर्मिती आवश्यक असल्याचे म्हटले होते. यावरून स्वामी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळत आहे.  

टॅग्स :PoliticsराजकारणImran Khanइम्रान खानprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीSubramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीBJPभाजपाPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर