शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

पंतप्रधान मोदींना शांततेचं नोबेल मिळणार? नामांकन दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 10:35 IST

आयुष्यमान भारत योजनेसाठी मोदींना नोबेल देण्याची मागणी

बंगळुरु: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नावाची शिफारस नोबेल पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. तामिळनाडू भाजपाच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. तमिलीसाई सुंदरराजन यांनी मोदींच्या नावाची शिफारस शांततेसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी केली आहे. मोदींनी आयुष्यमान भारत योजनेची सुरुवात केली. ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आहे. त्यामुळे मोदींना नोबेल पुरस्कार दिला जावा, असं सुंदरराजन यांनी म्हटलं आहे. डॉ. तमिलीसाई सुंदरराजन यांच्या वतीनं त्यांच्या पतीनं मोदींना नोबेल पुरस्कार मिळावा, यासाठी नामांकन दाखल केलं आहे. सुंदरराजन यांचे पती एका खासगी विद्यापीठात नेफ्रोलॉजी विभागाचे प्रमुख आहेत. मोदींनी 23 सप्टेंबरला आयुष्यमान भारत योजनेचा शुभारंभ केला. या योजनेचा लाभ देशातील 10 कोटींपेक्षा अधिक कुटुंबांना मिळणार आहे. ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आहे. ही योजना लागू केल्याबद्दल मोदींना शांततेचं नोबेल देण्यात यावं, असं सुंदरराजन यांनी नामांकन अर्जात म्हटलं आहे. स्वीडनचे उद्योगपती आणि शास्त्रज्ञ आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नोबेल पुरस्कार दिला जातो. संशोधन, रसायन शास्त्रज्ञ, साहित्य, शांतता या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव नोबेल पुरस्कारानं केला जातो. 1901 मध्ये पहिला नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. आल्फ्रेड नोबेल यांच्या मृत्यूनंतर 5 वर्षांनी हा पुरस्कार देण्यात आला होता. येत्या 10 डिसेंबरला नोबेल पुरस्काराचं वितरण होणार आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाayushman bharatआयुष्मान भारतNobel Prizeनोबेल पुरस्कार