शहरं
Join us  
Trending Stories
1
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
2
"खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
3
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
4
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
5
मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
6
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
7
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
8
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
9
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
10
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
11
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
12
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
13
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
14
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
15
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
16
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
17
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
18
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
19
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
20
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?

"ह्यांना एवढी हाय क्वालिटी नशा मिळते तरी कुठून?"; भाजपा मंत्र्याचा राहुल गांधींना टोला

By सायली शिर्के | Updated: October 9, 2020 13:44 IST

Congress Rahul Gandhi And BJP Narottam Mishra : राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी कृषी कायदा आणि भारत चीन तणावावरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. त्यावरून नरोत्तम मिश्रा राहुल गांधींबाबत वादग्रस्त विधान केलं आहे.

नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी "देशात आज जर युपीएचं सरकार असतं, तर आम्ही चीनला बाहेर फेकून दिलं असतं, त्यासाठी फक्त 15 मिनिटांचाही वेळ आम्हाला लागला असता" असं म्हटलं आहे. राहुल गांधींच्या या विधानावरून भाजपाच्या एका नेत्याने वादग्रस्त विधान केलं आहे. "राहुल गांधींना इतकी हाय क्वालिटी नशा मिळते तरी कुठून?" असं भाजपा नेते आणि मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी म्हटलं आहे. माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी कृषी कायदा आणि भारत चीन तणावावरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. त्यावरून नरोत्तम मिश्रा राहुल गांधींबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. "10 दिवसांत कर्जमाफी, चीनला 15 मिनिटांत बाहेर करणं. ज्यांनी राहुल गांधींना हे शिकवलंय त्यांना मी सॅल्यूट करतो. राहुल गांधी यांनी इतकी हाय क्वालिटी नशा मिळते तरी कुठून?" असं म्हणत नरोत्तम मिश्रा यांनी राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला आहे. 

'आम्ही सत्तेत असतो, तर चीनला 15 मिनिटांत बाहेर फेकून दिलं असतं'

राहुल गांधींनी नव्यानेच बनवलेल्या कृषी कायद्याविरोधात आपली भूमिका मांडली होती. तेथील शेतकऱ्यांच्या बाजुने काँग्रेससह इतरही मित्रपक्ष असल्याचे आश्वासन देत, मोदी सरकारवर टीका केली. मोदी सरकार हे शेतकरी, कामगार व गरिबविरोधी सरकार असून अदानी आणि अंबानींचं हित जोपसणारे असल्याची टीकाही राहुल यांनी केली. हाथरस बलात्कार प्रकरण, कृषी कायदे, लॉकडाऊनमधील समस्या, कोरोनातील अपयश यांसह लडाख सीमारेषेवरील भारत-चीन वादावरही राहुल यांनी भाष्य केले. यावेळी, बोलताना चीनने भारताच्या हद्दीत प्रवेश केला असून मोदी सरकार गप्प असल्याचे ते म्हणाले होते. तसेच, देशात आजमित्तीला युपीएचं सरकार असतं, तर आम्ही चीनला बाहेर फेकून दिलं असतं, त्यासाठी 15 मिनिटांचाही वेळ आम्हाला लागला नसता, असेही राहुल यांनी म्हटलं होतं.  त्यावर आता नरोत्तम मिश्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

'मी मास्क घालत नाही' म्हणणाऱ्या भाजपा नेत्याचा यू-टर्न, म्हणाले...; Video व्हायरल

मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी याआधी मास्क संदर्भात एक विधान केल्याने वाद निर्माण झाला होता. नरोत्तम मिश्रा यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. मात्र त्यावेळी त्यांनी मास्क लावला नव्हता. पत्रकारांनी जेव्हा त्यांना आपण मास्क का लावला नाही असा प्रश्न विचारला त्यावर त्यांनी आपण अशा कार्यक्रमांमध्ये मास्क घालत नाही, त्याने काय होतं? असं उत्तर दिलं होतं. त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. मिश्रा यांच्या विधानानंतर नवा वाद निर्माण झाला असून अनेकांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं. जोरदार टीका झाल्यानंतर मंत्र्यांनी यू-टर्न घेतला. 

"मी माझी चूक स्वीकारली असून आता मास्कचा वापर करणार" 

विरोधकांनी मास्कवरून निशाणा साधल्यावर नरोत्तम मिश्रा यांनी या विधानावर माफी मागितली. ट्विटरवरून त्याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून मिश्रा यांनी "मी माझी चूक स्वीकारली असून आता मास्कचा वापर करणार आहे. तसेच कोरोनाच्या संकटात लोकांनी देखील मास्कचा वापर केला पाहिजे. तसेच सोशल डिस्टंसिंगचं पालन केलं पाहिजे असं मी लोकांना आवाहन करतो" असं म्हटलं होतं. तसेच याबाबतचा एक व्हिडीओही पोस्ट केला होता. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाIndiaभारत