शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

'ज्यांनी क्लास मॉनिटरची निवडणूक लढवली नाही ते पक्ष हाताळताहेत'; गौरव वल्लभ यांची जयराम रमेश यांच्यावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 16:00 IST

गौरव वल्लभ यांनी काही दिवसापूर्वीच भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

गौरव वल्लभ यांनी काही दिवसापूर्वीच भाजपामध्ये प्रवेश केला. गौरव वल्लभ यांनी आज काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांच्यावर निशाणा साधला. 'ज्यांनी कधीही क्लास मॉनिटरची निवडणूकही लढवली नाही ते आता पक्ष हाताळत आहेत', अशी टीका गौरव वल्लभ यांनी केली. 

गौरव वल्लभ यांनी सुरुवातीला जयराम रमेश यांचे नाव न घेता टीका केली. "मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा ४२ खासदार होते. नवीन विचारांना चालना मिळेल, या विचाराने मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, पण असे काहीही झाले नाही. गेल्या ३० वर्षांपासून काँग्रेसचा जाहीरनामा हाच आहे. एक व्यक्ती तो तयार करत आहे, जर त्या व्यक्तीचे विचार ठाम असते तर आज पक्षाची ही अवस्था झाली नसती, असा टोलाही गौरव वल्लभ यांनी लगावला.

ओडिशात भाजपाला धक्का, उपाध्यक्ष लेखश्री सामंतसिंघार यांचा बीजेडीमध्ये प्रवेश

काँग्रेसचे माजी प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी सांगितले की, अर्थसंकल्पानंतर पत्रकार परिषद घेण्यास सांगितले होते, पण तसे करण्यास नकार दिला आणि जोपर्यंत काँग्रेसचे सर्वोच्च नेतृत्व अयोध्येतील राम मंदिराला भेट देत नाही, तोपर्यंत पत्रकार परिषद घेणार नसल्याचे सांगितले. 

गौरव वल्लभ म्हणाले की, पक्ष आता माजी केंद्रीय मंत्र्यांचे पीए हाताळत आहेत. पीएला निवडणूक कशी लढवायची हे माहित नाही. उत्तर प्रदेश आणि बिहार ही वेगवेगळी राज्ये आहेत हे त्यांना कदाचित माहीत नसेल. असे त्यांना विचारले तर ते गोंधळून जातील. जर तुम्ही त्यांना जालोरे, सरोही कुठे आहेत असे विचारले तर ते कदाचित मध्य प्रदेश म्हणतील. हे त्यांचे ज्ञान आहे. अशा नेत्यांचे ग्राउंड कनेक्शन खूपच कमकुवत आहे, असंही गौरव वल्लभ म्हणाले.

“मी कॉलेजमध्ये असताना ती व्यक्ती काही वर्षांपूर्वी काँग्रेसची प्रवक्ता होती, आता ती संपर्क कक्षाची प्रमुख आहे. त्यांना काँग्रेसच्या विचारसरणीत रस नाही. त्यांना फक्त त्यांची राज्यसभेची जागा राखण्यात रस आहे, अशी टीकाही गौरव वल्लभ यांनी केली.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस